शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

युती सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना ...

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : भंडगा येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना नवीन पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. तर अकाली पावसामुळे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.केंद्र व राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने केवळ शेतकऱ्यांना मोठी आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. हे सरकार शेतकरी हिताचे नसून उद्योजकांच्या हिताचे आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला जनतेनेच धडा शिकवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.तालुक्यातील भंडगा येथे आयोजित नाटकाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, डुमेश चौरागडे,अविनाश बिसेन, लक्ष्मण चंद्रिकापुरे, शिवाजी ईश्वार, राकेश बघेले, सरपंच सोमेश रहांगडाले,संजूबाई बडोले, रजनी दमाहे, एन.के. बघेले, खोमेश टेंभरे उपस्थित होते.चंद्रिकापुरे म्हणाले, राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात कुठेही सिंचनाची सोय उपलब्ध करु न देण्यात आली नाही.युवकांना वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देवून सुद्धा आतापर्यंत केवळ ६ लाख युवकांना रोजगार देण्यात आला. प्रत्यक्षात ८ कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतकरी आपल्या तरु ण मुलांना शिक्षण देण्यासाठी जिवाचे रान करतात व त्यांच्या वृद्धपकाळात मदत होईल असे स्वप्न बघतात.मात्र मोदी सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी त्यांचा रोजगार हिरावण्याचे काम करीत आहे.त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.संचालन उमाकांत मोटघरे यांनी केले तर आभार दिलिप खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन शरणागत, भरत दमाहे, लालचंद खोब्रागडे, मीताराम कवास, भरत भोयर, राकेश मस्करे,गुन्नीलाल नंदेश्वर देवाजी मांढरे, राकेश मस्करे व मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जNCPराष्ट्रवादी काँग्रेस