शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ काहीच दिवस शिल्लक असताना अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरीपीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शासनाने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आत्तापर्यंत केवळ ८३ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारीवर नजर टाकल्यास केवळ ३०.७१ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही याबाबत शंका आहे.शेतकरी खरीप हंगामात आर्थिक चणचण भासू नये, त्यांच्यावर सावकार किंवा व्यापाऱ्यांच्या दारात जावून व्याजाने पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पीक कर्जाचे वाटप केले जाते. नाबार्ड आणि शासनाकडून दरवर्षी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते.यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना बँकांकडून केवळ ३० टक्के पीक कर्ज वाटप झाले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अजूनही पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहे. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत बँकांना अद्यापही शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यात यश आलेले नाही. राष्ट्रीयकृत बँकातून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे.वांरवार चकरा मारुन सुध्दा पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात. तर जिल्हा बँकेची प्रक्रिया त्या तुलनेत बरीच सुलभ आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ही बँक आपली वाटत असल्याने शेतकरी सुध्दा याच बँकेतून अधिक पीक कर्जाची सर्वाधिक उचल करतात. त्यामुळेच आतापर्यंत जिल्हा बँकेने सर्वाधिक ६६ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.कोरोनामुळे पीक कर्ज मेळाव्यांवर संकटमागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी तालुका स्तरावर कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले जात होते. मात्र यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करणे कठीण आहे.अशा स्थितीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी