शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ काहीच दिवस शिल्लक असताना अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरीपीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शासनाने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आत्तापर्यंत केवळ ८३ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारीवर नजर टाकल्यास केवळ ३०.७१ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही याबाबत शंका आहे.शेतकरी खरीप हंगामात आर्थिक चणचण भासू नये, त्यांच्यावर सावकार किंवा व्यापाऱ्यांच्या दारात जावून व्याजाने पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पीक कर्जाचे वाटप केले जाते. नाबार्ड आणि शासनाकडून दरवर्षी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते.यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना बँकांकडून केवळ ३० टक्के पीक कर्ज वाटप झाले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अजूनही पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहे. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत बँकांना अद्यापही शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यात यश आलेले नाही. राष्ट्रीयकृत बँकातून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे.वांरवार चकरा मारुन सुध्दा पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात. तर जिल्हा बँकेची प्रक्रिया त्या तुलनेत बरीच सुलभ आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ही बँक आपली वाटत असल्याने शेतकरी सुध्दा याच बँकेतून अधिक पीक कर्जाची सर्वाधिक उचल करतात. त्यामुळेच आतापर्यंत जिल्हा बँकेने सर्वाधिक ६६ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.कोरोनामुळे पीक कर्ज मेळाव्यांवर संकटमागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी तालुका स्तरावर कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले जात होते. मात्र यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करणे कठीण आहे.अशा स्थितीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी