शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

तालुक्यात तापाची साथ

By admin | Updated: September 9, 2014 23:47 IST

तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात तापाच्या साथीमुळे सध्या रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे.

सडक/अर्जुनी : तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात तापाच्या साथीमुळे सध्या रुग्णांची गर्दी पाहावयास मिळत आहे.सध्या ताप, विषमज्वर, खोकला, मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांनी तालुक्यातील गावे फनफनत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज २९५ रुग्णांची तपासणी केली जात आहे. या रुग्णालयात तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीसी कॉन्टर मशीनद्वारे रुग्णांची तपासणी केली जात आहे. ही सीबीसी मशीन गोंदिया जिल्ह्यात फक्त दोन ठिकाणी असल्याची माहिती प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी दिली. ही मशिन गोंदिया व सडक/अर्जुनी या दोनच तालुक्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांची वेळीच तपासणी करण्यासाठी सोयिस्कर होत आहे.सडक/अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात ईसीजी मशीन नसल्यामुळे रुग्णांना साकोली, गोंदिया, नागपूर यासारख्या ठिकाणी जावून तपासणी करावी लागत आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करणे बंद असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. रुग्णालयाचे जबाबदार डॉ. नंदेश्वर यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, यावर्षी फक्त पाच शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात सडक/अजुनीचे ग्रामीण रुग्णालय जिल्ह्यात मागे असल्याचे ते म्हणाले. दररोज ११५ ते १२० रुग्णांची मलेरिया व ५० ते ६० रुग्णांची विषमज्वर या आजाराची रक्त तपासणी केल्या जात आहे. सदर रक्त तपासणीसाठी १२० ते १०० रुपये घेतले जात आहेत. या ग्रामीण रुग्णालयात काही वर्षापासून असलेले कर्मचारी आलेल्या रुग्णांशी असभ्य वर्तणूक करताना दिसतात. त्या कर्मचाऱ्यांनी सभ्यतेने वागावे यासाठी संबंधित डॉक्टरांनी लक्ष देऊन कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणे तेवढेच गरजेचे आहे. सध्या वातावरण खराब असल्यामुळे अनेक गावातील घराघरांत तापाची साथ पहावयास मिळत आहे.तालुक्यातील बकी, पिपरी, राका, चिखली, खोबा या गावात डेंगूचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे. पण आरोग्य विभागाने पाहिजे तशी उपाययोजना केल्याचे दिसत नाही. तरी जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्यचिकित्सकांनी लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. तालुक्यातील १०८ गावांचे मुख्य ग्रामीण रुग्णालय आहे. पण या ठिकाणी एक्स-रे मशीन नाही. रुग्णालयाच्या बाजूला रुग्णांनी केलेली घान नेहमीच पहावयास मिळते. जेवणाचे उर्वरित अन्न व खराब रिकाम्या पॉलिथिन या सडक्या स्थितीत पडल्या आहेत. पण संबंधित डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. ग्रामीण रुग्णालय परिसर हा स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य चांगले राहू शकेल. येथील अस्वच्छतेविषयी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी परिसर स्वच्छ करण्याची तंबी कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी सुटीवर गेल्याने तेथील परिसरातील रुग्णांची गैरसोय होताना दिसत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अशास्थितीत अधिक दिवसांची सुटी कशी दिली, असा प्रश्न उभा आहे. (शहर प्रतिनिधी)