शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:21 IST

राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्दे३० पेक्षा अधिक हॅँडपंप नादुरूस्त : दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.शहरात बघितल्यास ७०० हून जास्त सार्वजनिक हँडपंप आहेत. यात खासगी हँडपंपांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र ७०० मधील बहुतांश हँडपंप नादुरूस्त आहेत. नगर परिषद अभियंता उमेश शेंडे यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २५-३० हँडपंप नादुरूस्त आहेत. एवढ्यावरही या हँडपंप दुरूस्तीसाठी पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. या हँडपंप दुरूस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे दिसते. अशात ज्या ठिकाणी गरज आहे तेथे टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.शहरात नगर परिषदेचे ६० पंप हाऊस आहेत. या पंप हाऊसच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पूर्तता केली जाते. मात्र या पंप हाऊसमधील पाणी पिण्यासाठी नव्हे तर कपडे धुण्यासाठी केला जात असल्याचे बोलले जाते. त्यातही शहरातील काही भागांत पंप हाऊसने पाणी पुरवठा होत नाही. कारण, नादुरूस्त किंवा तुटफुट झालेले आहेत.सायंकाळी पाणी पुरवठा नाहीवैनगंग नदीतील पाणी संपल्यामुळे डांगोरली घाटातून पर्याप्त पाणी गोंदिया शहरापर्यंत नाही येत आहे. शहरात सुमारे १५ हजार नळ कनेक्शन आहेत. अशात पाण्याची टंचाई बघता शहराल फक्त सकाळीच पाणी दिले जात आहे. आता ९० किमी अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरलीपर्यंत पाणी आणले आहे. मात्र सायंकाळी पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी, याबाबत काही सांगता येत नसल्याचे सांगीतले. तर मजिप्राचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांनी, अगोदर वैनगंगा नदीतील बंधारा भरण्याची वाट बघितली जाणार. त्यानंतर नदीत आणलेल्या पाण्याची पातळी स्थायी राहणार असल्याचे बघूनच त्यानंतर याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे सांगीतले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक