शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

शहरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:21 IST

राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्दे३० पेक्षा अधिक हॅँडपंप नादुरूस्त : दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.शहरात बघितल्यास ७०० हून जास्त सार्वजनिक हँडपंप आहेत. यात खासगी हँडपंपांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र ७०० मधील बहुतांश हँडपंप नादुरूस्त आहेत. नगर परिषद अभियंता उमेश शेंडे यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २५-३० हँडपंप नादुरूस्त आहेत. एवढ्यावरही या हँडपंप दुरूस्तीसाठी पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. या हँडपंप दुरूस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे दिसते. अशात ज्या ठिकाणी गरज आहे तेथे टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.शहरात नगर परिषदेचे ६० पंप हाऊस आहेत. या पंप हाऊसच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पूर्तता केली जाते. मात्र या पंप हाऊसमधील पाणी पिण्यासाठी नव्हे तर कपडे धुण्यासाठी केला जात असल्याचे बोलले जाते. त्यातही शहरातील काही भागांत पंप हाऊसने पाणी पुरवठा होत नाही. कारण, नादुरूस्त किंवा तुटफुट झालेले आहेत.सायंकाळी पाणी पुरवठा नाहीवैनगंग नदीतील पाणी संपल्यामुळे डांगोरली घाटातून पर्याप्त पाणी गोंदिया शहरापर्यंत नाही येत आहे. शहरात सुमारे १५ हजार नळ कनेक्शन आहेत. अशात पाण्याची टंचाई बघता शहराल फक्त सकाळीच पाणी दिले जात आहे. आता ९० किमी अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरलीपर्यंत पाणी आणले आहे. मात्र सायंकाळी पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी, याबाबत काही सांगता येत नसल्याचे सांगीतले. तर मजिप्राचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांनी, अगोदर वैनगंगा नदीतील बंधारा भरण्याची वाट बघितली जाणार. त्यानंतर नदीत आणलेल्या पाण्याची पातळी स्थायी राहणार असल्याचे बघूनच त्यानंतर याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे सांगीतले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक