शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरात टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:21 IST

राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

ठळक मुद्दे३० पेक्षा अधिक हॅँडपंप नादुरूस्त : दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.शहरात बघितल्यास ७०० हून जास्त सार्वजनिक हँडपंप आहेत. यात खासगी हँडपंपांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र ७०० मधील बहुतांश हँडपंप नादुरूस्त आहेत. नगर परिषद अभियंता उमेश शेंडे यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २५-३० हँडपंप नादुरूस्त आहेत. एवढ्यावरही या हँडपंप दुरूस्तीसाठी पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. या हँडपंप दुरूस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे दिसते. अशात ज्या ठिकाणी गरज आहे तेथे टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.शहरात नगर परिषदेचे ६० पंप हाऊस आहेत. या पंप हाऊसच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पूर्तता केली जाते. मात्र या पंप हाऊसमधील पाणी पिण्यासाठी नव्हे तर कपडे धुण्यासाठी केला जात असल्याचे बोलले जाते. त्यातही शहरातील काही भागांत पंप हाऊसने पाणी पुरवठा होत नाही. कारण, नादुरूस्त किंवा तुटफुट झालेले आहेत.सायंकाळी पाणी पुरवठा नाहीवैनगंग नदीतील पाणी संपल्यामुळे डांगोरली घाटातून पर्याप्त पाणी गोंदिया शहरापर्यंत नाही येत आहे. शहरात सुमारे १५ हजार नळ कनेक्शन आहेत. अशात पाण्याची टंचाई बघता शहराल फक्त सकाळीच पाणी दिले जात आहे. आता ९० किमी अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरलीपर्यंत पाणी आणले आहे. मात्र सायंकाळी पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी, याबाबत काही सांगता येत नसल्याचे सांगीतले. तर मजिप्राचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांनी, अगोदर वैनगंगा नदीतील बंधारा भरण्याची वाट बघितली जाणार. त्यानंतर नदीत आणलेल्या पाण्याची पातळी स्थायी राहणार असल्याचे बघूनच त्यानंतर याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे सांगीतले.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक