शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास टँकरमुक्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:54 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.

ठळक मुद्देजलस्रोतांनी गाठली धोक्याची पातळी : तलावांच्या जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन, शासन आणि जनतेच्या मदतीने मराठवाड्यासह, दुष्काळी भागात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यासाठी लोकचळवळ सुरु आहे. सरकारच्या मदतीने जनता काम करीत आहेत. भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय जलस्त्रोतांमध्ये वाढ होणार नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न होत असले तरी जिल्हावासीयांकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आताही मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व वृक्ष लागवडीसाठी अनेक सामाजिक संस्था, डॉक्टर, विद्यार्थी व शाळा कॉलेजासह सर्वसामान्य जनतेने यासाठी दृढसंकल्प करणे गरजेचे आहे.अनेक वर्षांपासून शासन जलसंधारणाचे काम करीत आहे. मात्र अद्यापही पाणी टंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळे ही जनचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने अनेक सामाजिक संस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणासाठी नदी-नाले, तळे खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. जी गावे पाण्यासाठी एकी दाखवून एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहराच बदलून गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाणी फाऊंडेशन, वॉटर कप स्पर्धेतून अनेक तालुक्यांमध्ये ओढे, नाले, तळी यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.पाण्यासाठीची ही चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी असलेला दुष्काळाचा (पाण्याचा) कलंक पुसला जाईल. जलयुक्त शिवारची कामे झाल्यास आज बोअरवेलची वाढणारी स्पर्धा, जिल्ह्यात असणाºया विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्याचा फायदा पिकांना झाल्यास शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. जलसाठ्याचे रुंदीकरण, खोलीकरण झाल्यास पाणी पावसाळ्यात वाहून न जाता जलसाठ्यात साठून राहणार आहे. याचा फायदा निश्चितच आसपासच्या शिवारातील लोकांना होणार आहे.पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. खंड पडणाºया पावसामुळे रोवणीचा हंगाम लोटला तरी रोवणीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार योजनेत आहे. फक्त या योजनेसाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास श्रमदानामुळे गावे पाणीदार होतील. त्यामुळे दुष्काळाची चिंता जाणवणार नाही. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास शहराजवळील ओढे, नाले, तलाव व विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण करुन पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास शहराला भेडसावणाºया पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. पाणी पातळीत वाढ होईल. शहरवासीयांची पाणी समस्या मिटविण्यासाठी नगरपरिषदेसह, शहरवासीयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पण आता ही मानसिकता बदलून पाण्यासाठी एकवटलेच पाहिजे अन्यथा भविष्यात पाण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल.