शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास टँकरमुक्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:54 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.

ठळक मुद्देजलस्रोतांनी गाठली धोक्याची पातळी : तलावांच्या जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन, शासन आणि जनतेच्या मदतीने मराठवाड्यासह, दुष्काळी भागात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यासाठी लोकचळवळ सुरु आहे. सरकारच्या मदतीने जनता काम करीत आहेत. भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय जलस्त्रोतांमध्ये वाढ होणार नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न होत असले तरी जिल्हावासीयांकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आताही मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व वृक्ष लागवडीसाठी अनेक सामाजिक संस्था, डॉक्टर, विद्यार्थी व शाळा कॉलेजासह सर्वसामान्य जनतेने यासाठी दृढसंकल्प करणे गरजेचे आहे.अनेक वर्षांपासून शासन जलसंधारणाचे काम करीत आहे. मात्र अद्यापही पाणी टंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळे ही जनचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने अनेक सामाजिक संस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणासाठी नदी-नाले, तळे खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. जी गावे पाण्यासाठी एकी दाखवून एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहराच बदलून गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाणी फाऊंडेशन, वॉटर कप स्पर्धेतून अनेक तालुक्यांमध्ये ओढे, नाले, तळी यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.पाण्यासाठीची ही चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी असलेला दुष्काळाचा (पाण्याचा) कलंक पुसला जाईल. जलयुक्त शिवारची कामे झाल्यास आज बोअरवेलची वाढणारी स्पर्धा, जिल्ह्यात असणाºया विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्याचा फायदा पिकांना झाल्यास शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. जलसाठ्याचे रुंदीकरण, खोलीकरण झाल्यास पाणी पावसाळ्यात वाहून न जाता जलसाठ्यात साठून राहणार आहे. याचा फायदा निश्चितच आसपासच्या शिवारातील लोकांना होणार आहे.पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. खंड पडणाºया पावसामुळे रोवणीचा हंगाम लोटला तरी रोवणीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार योजनेत आहे. फक्त या योजनेसाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास श्रमदानामुळे गावे पाणीदार होतील. त्यामुळे दुष्काळाची चिंता जाणवणार नाही. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास शहराजवळील ओढे, नाले, तलाव व विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण करुन पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास शहराला भेडसावणाºया पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. पाणी पातळीत वाढ होईल. शहरवासीयांची पाणी समस्या मिटविण्यासाठी नगरपरिषदेसह, शहरवासीयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पण आता ही मानसिकता बदलून पाण्यासाठी एकवटलेच पाहिजे अन्यथा भविष्यात पाण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल.