शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

तंटामुक्त समितीचा कार्यकाळ ५ वर्षांचा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:42 IST

महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा तंटामुक्त संघटनेची मागणी : आमदार रहांगडाले यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले. ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून संघटनेच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार रहांगडाले यांनी संघटनेच्या पदाधिकाºयांना दिले.१५ आगस्ट २००७ रोजी संपुर्ण महाराष्ट्रात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावात शांतता निर्माण करून व गावातील भांडणे गावातच सोडविता यावी. जेणेकरून जनतेचा पैसा व वेळेची बचत होईल या उद्देशातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव ही योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून त्यांचे उद्दीष्ट पूर्ण झाले. परंतु समितीला काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्यामुळे शासनाला आता तंटामुक्त समित्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.अशात तंटामुक्त समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश तायवाडे यांच्या अध्यक्षतेत आमदार विजय रहांगडाले यांना देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष श्रावण बरियेकर, सचिव मुमताज अल्ली सैय्यद, कार्यकारी अध्यक्ष हमजा शेख, कोषाध्यक्ष विनोद बरेकर, सदस्य चुन्नीलाल बिसेन, माजी सैनिक सुरेश भगत, विष्णू दयाल बिसेन, जितेंद्र कावळे तेजराम पटले महाराज व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.या आहेत समितीच्या मागण्यापुरस्कार निधी खर्च करण्याचा अधिकार समितीला देण्यात यावा, समितीच्या अध्यक्षांना सरपंच प्रमाणे अधिकार देण्यात यावे, अध्यक्षांना दर महिन्याला तीन हजार व सदस्यांना एक हजार रु पये मानधन देण्यात यावे, समितीला कार्यालयीन खर्चासाठी वार्षिक १२ हजार रु पये देण्यात यावे, तंट्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र इमारत ग्रामपंचायतने उपलब्ध करु न देण्यात यावी, समितीला वर्षातून एकदा आमसभा घेण्याचे अधिकार देण्यात यावे, ग्राम सुरक्षा दल अध्यक्षांना तीन हजार रु पये व सदस्यांना एक हजार रु पये दर महिन्याला मानधन देण्यात यावे, ग्राम सुरक्षा दल सदस्यांना सुरक्षाच्या दुष्टीने साहित्य खरेदी करून देण्यात यावे या मागण्यांना समावेश आहे.