शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:59 IST

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत नोंदणी अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील या क्षेत्राशी संबंधित कामगारांनी आपली नोंदणी या विशेष अभियानात करून घ्यावी. नोंदणीकृत कामगारांनी या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव व कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० ठिकाणी २३ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरूवात सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपयार्ड नवेगावबांध येथे करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य होमराज कोरेटी, विजया कापगते, केवलराम पुस्तोडे, अण्णा डोंगरवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, विजय अरोरा, उमाकांत ढेंगे, मसराम, हरिशचंद्र उईके, तहसीलदार धनंजय देशमुख, प्रभारी उपविभागीय अधिकारी कोरूडे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बन्सोड, कृउबासचे सभापती कासिम जमा कुरेशी उपस्थित होते.या वेळी कृउबासचे सभापती कुरेशी हे हज यात्रेला जाणार आहेत, त्याबद्दल पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी केले. आभार अशोक परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमात कामगार व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.पॉलिथीनबंदीचा अधिकाऱ्यांना विसरपालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पॉलिथीनचा सर्रास वापर करण्यात आला. राज्यात पॉलिथीनबंदी झाली आहे. याचा जणू विसरच अधिकाऱ्यांना पडला होता. पॉलिथीनचे वेस्टन लावलेल्या पुष्पगुच्छांचा वापर स्वागत करताना करण्यात आला, अशी कुजबूज उपस्थितांमध्ये होती.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले