शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:59 IST

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत नोंदणी अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील या क्षेत्राशी संबंधित कामगारांनी आपली नोंदणी या विशेष अभियानात करून घ्यावी. नोंदणीकृत कामगारांनी या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव व कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० ठिकाणी २३ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरूवात सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपयार्ड नवेगावबांध येथे करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य होमराज कोरेटी, विजया कापगते, केवलराम पुस्तोडे, अण्णा डोंगरवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, विजय अरोरा, उमाकांत ढेंगे, मसराम, हरिशचंद्र उईके, तहसीलदार धनंजय देशमुख, प्रभारी उपविभागीय अधिकारी कोरूडे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बन्सोड, कृउबासचे सभापती कासिम जमा कुरेशी उपस्थित होते.या वेळी कृउबासचे सभापती कुरेशी हे हज यात्रेला जाणार आहेत, त्याबद्दल पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी केले. आभार अशोक परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमात कामगार व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.पॉलिथीनबंदीचा अधिकाऱ्यांना विसरपालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पॉलिथीनचा सर्रास वापर करण्यात आला. राज्यात पॉलिथीनबंदी झाली आहे. याचा जणू विसरच अधिकाऱ्यांना पडला होता. पॉलिथीनचे वेस्टन लावलेल्या पुष्पगुच्छांचा वापर स्वागत करताना करण्यात आला, अशी कुजबूज उपस्थितांमध्ये होती.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले