शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कल्याणकारी योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:59 IST

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत नोंदणी अभियान सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत राज्यात दुसऱ्या टप्प्यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश करण्यात आला. कामगारांच्या जीवनात उद्याचा आनंद निर्माण करण्यासाठी, त्यांच्या कष्टाचा सन्मान करण्यासाठी बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात कष्ट उपसणाऱ्या कामगारांसाठी शासनाने सुरू केलेली ही योजना लाभदायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील या क्षेत्राशी संबंधित कामगारांनी आपली नोंदणी या विशेष अभियानात करून घ्यावी. नोंदणीकृत कामगारांनी या योजनेसह विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव व कामगार कल्याण मंडळ कामगार विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० ठिकाणी २३ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत बांधकाम व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची सुरूवात सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपयार्ड नवेगावबांध येथे करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सभापती अरविंद शिवणकर, जि.प. सदस्य रचना गहाणे, सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, पं.स. सदस्य होमराज कोरेटी, विजया कापगते, केवलराम पुस्तोडे, अण्णा डोंगरवार, कान्होलीचे सरपंच संजय खरवडे, विजय अरोरा, उमाकांत ढेंगे, मसराम, हरिशचंद्र उईके, तहसीलदार धनंजय देशमुख, प्रभारी उपविभागीय अधिकारी कोरूडे, पालकमंत्र्यांचे स्वीय सहायक समीर बन्सोड, कृउबासचे सभापती कासिम जमा कुरेशी उपस्थित होते.या वेळी कृउबासचे सभापती कुरेशी हे हज यात्रेला जाणार आहेत, त्याबद्दल पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी अनूपकुमार भावे यांनी केले. आभार अशोक परशुरामकर यांनी मानले. कार्यक्रमात कामगार व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.पॉलिथीनबंदीचा अधिकाऱ्यांना विसरपालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पॉलिथीनचा सर्रास वापर करण्यात आला. राज्यात पॉलिथीनबंदी झाली आहे. याचा जणू विसरच अधिकाऱ्यांना पडला होता. पॉलिथीनचे वेस्टन लावलेल्या पुष्पगुच्छांचा वापर स्वागत करताना करण्यात आला, अशी कुजबूज उपस्थितांमध्ये होती.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले