शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

भविष्य निर्वाह निधीची कपात करणाऱ्या लिपिकावर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

देवरी : कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा खात्रीलायक स्रोत म्हणून भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला ...

देवरी : कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या उदरनिर्वाह करण्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा खात्रीलायक स्रोत म्हणून भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) हा कर्मचाऱ्यांसाठी असलेला एक प्रकारचा निवृत्ती निधी आहे. परंतु या स्वत:च्या हक्काच्या पैशातून कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून २४,३२१ रुपये कपात करण्याचा धक्कादायक प्रकार देवरी येथील सहायक आयुक्त पशुसंवर्धन कार्यालयातील लिपिकाने केला आहे. या लिपिकावर कारवाई करण्याची मागणी सेवानिवृत्त परिचर एकनाथ गणवीर यांनी लोकायुक्त मुंबई यांच्याकडे केली आहे.

लोकायुक्तांकडे केलेल्या तक्रारीत सेवानिवृत्त परिचर एकनाथ गणवीर यांनी ते ३१ जानेवारी २०१६ला सेवानिवृत्त झाले. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागला. या सातव्या वेतन आयोगाचा फायदा मला देण्यात आला आहे. परंतु माझ्या रजा रोखीकरणाचे बिल २४८१० रुपयातून २०,००० रुपये कपात करण्यात आले. तसेच महालेखाकार नागपूर यांनी पाठविलेली सेवानिवृत्ती, मृत्यू उपदान २,७६,६७५ रुपयांमधून ४३२१ असे एकूण २४,३२१ रुपये कोणतीही सूचना किंवा नोटीस न देता कपात करण्यात आले आहे. भ.नि.निधी जीपीएफमधून पैसे काढणे व कपात करणे हे बाबूचे काम असते त्याला तेच जबाबदार आहेत. तेव्हा गणवीर सेवानिवृत्त झाले त्या कार्यालयाकडून ना देय प्रमाणपत्र देण्यात आले आहे व त्यात लिहिले आहे की वसुली न घेणे संबंधी महाराष्ट्र शासनाचे १० ऑगस्ट २०२०चे परिपत्रक काढले असून, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असा निकाल दिला आहे. एवढेच नव्हे तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना चुकीने दिल्या गेलेल्या पैशाची केव्हाही व कोणत्याही कारणासाठी वसुली करणे कायद्याला धरून ठरणार नाही, असेही न्यायालयाने जाहीर केले आहे. असे असताना सुद्धा सहायक आयुक्त पशुसंवर्धन तालुका कार्यालयातील लिपिकाच्या चुकीमुळे गणवीर यांच्या भविष्य निर्वाह निधीतून २४,३२१ रुपयांची कपात करण्यात आल्याचा आरोप गणवीर यांनी केलेला आहे. ज्याविषयी त्यांनी लोकायुक्ताकडे तक्रार करून दाद मागितली आहे. याबद्दल पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त एस. पी. गायगवळी यांना विचारले असता ते म्हणाले की असा प्रकारचा जीआर असल्याची माहिती मला नाही. परंतु जर कपात न करण्याचे शासनाचे परिपत्रक असेल तर त्यांना उर्वरित रक्कम देण्यात येईल. याबाबत पशुसंवर्धन विभागाचे लिपिकाशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलणे टाळले.