शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

अभ्यासक्रमातच सोशल मीडिया असावे

By admin | Updated: June 14, 2014 23:39 IST

इंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न सर्वव्यापी होत आहे. वास्तविक यातील अर्धवट ज्ञानामुळेच

तज्ज्ञांचा सूर : कायद्याची अंमलबजावणी व इंटरनेट साक्षरतेवर भर, पालक व मुलांना लोकशिक्षणाची गरजमनोज ताजने/नरेश रहिले - गोंदियाइंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न सध्या सर्वत्र निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न सर्वव्यापी होत आहे. वास्तविक यातील अर्धवट ज्ञानामुळेच जास्त समस्या निर्माण होतात. त्यामुळे याला एक सामाजिक समस्या समजून याबाबतचे योग्य ज्ञान देणारी माहिती अभ्यासक्रमातच समाविष्ठ करावी, अशी सूचना मान्यवरांनी ‘लोकमत’ परिचर्चेत केली.‘सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापर‘ यावर लोकमतने परिचर्चा घडवून आणली. समाजविघातक ठरू शकणाऱ्या बाबीवर प्रतिबंध घालणे शक्य आहे, मात्र पालकांनी इंटरनेट, मोबाईलचा वापर आपला पाल्य नेमका कशासाठी करतो आहे यावर लक्ष ठेवणे जास्त गरजेचे आहे. केवळ कौतुक म्हणून मुलांच्या हाती स्मार्ट फोन न देता त्यांना त्याची खरच गरज आहे हे पालकांनी तपासले पाहीजे, असा सूर लोकमत परिचर्चेत वक्त्यांनी मांडला.गुन्हेगारी ही वृत्ती असून ही वृत्ती घालविण्यासाठी समाजमनाचे प्रबोधन करावे लागणार आहे. कायद्याचे सातत्याने पुनर्विलोकन, कठोर अंमलबजावणी व शिक्षा होणे आवश्यक असल्याबद्दल सर्वांचेच एकमत होताना दिसते. गोंदियासारख्या ठिकाणी सायबर क्राईमचे गुन्हे नोंदविण्यासाठी स्वतंत्र सेल नाही. कारण या प्रकारचे गुन्हे कसे होतात याची माहितीच अनेकांना नाही. परंतू भविष्यात सर्व ठिकाणी त्याची गरज पडणार आहे. सोशल मीडियात अभिव्यक्तीचा हुंकार सहजपणे व्यक्त होतो. त्याला कोणताही आडपडदा नाही, की कुणी सेन्सॉर नाही. तो आपल्या मनात सुरू असलेली घालमेल, भावभावनांची आंदोलने क्षणार्धात जगाच्या कॅन्व्हॉसवर उमटवू शकतो. त्याच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही मिळतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असतो. या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली. संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती या माध्यमात असल्याचे दिसून येते. याचा सकारात्मक उपयोग करायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकाने या तंत्रज्ञानाच्या बाबतीत किमान ज्ञान मिळविणेही गरजेचे असल्याचा सूर या परिचर्चेत उमटला.