शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

मिठाई व गुपचूपने ३४६ जणांना बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 02:03 IST

येथील मंडई प्रसिद्ध असून त्यात विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील जनसमुदाय एकत्रित येतो.

 ककोडीच्या मंडईतील प्रकार : वैद्यकीय चमूच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणातककोडी : येथील मंडई प्रसिद्ध असून त्यात विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी परिसरातील जनसमुदाय एकत्रित येतो. मंगळवारी १५ मार्च रोजी भरलेल्या मंडईत दुकानांमधील मिठाई व गुपचूपच्या सेवनाने तब्बल ३४६ नागरिकांची प्रकृती बिघडली. त्यांना ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आल्या. वेळीच उपचार मिळाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. ककोडी येथील मंडईत महाराष्ट्रासह छत्तीसगड येथील दुकाने लागले होते. यात २५ ते ३० मिठाईची दुकाने व तीन ते चार गुपचूपचे ठेले होते. रात्रभर विविध कार्यक्रम सुरू असल्याने नागरिक व पाहुणे मंडळींना रात्रभराचे जागरण झाले होते. शिवाय वातावरणातील बदल हासुद्धा नागरिकांची प्रकृती बिघडण्यास एक कारण ठरला. मंगळवारी मंडईनिमित्त आलेल्या पाहुणे मंडळी व गावकऱ्यांनी मिठाई व गुपचूप सेवन केल्यापासून त्यांना तीव्र ताप, शौच, उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यात लहान मुले-मुली, तरूण-तरूणींचाही समावेश आहे.सदर आजार आटोक्यात आला असून गुरूवारच्या सायंकाळपर्यंत ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ तीन ते चार रूग्ण शिल्लक असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)खासगी डॉक्टर व पदाधिकाऱ्यांची मदतबुधवारी रात्री तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हुमणे यांनी ग्रामीण रूग्णालय चिचगड येथील वैद्यकीय चमूसह ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. गुरूवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर यांनी भेट देवून प्रकरणाची शहानिशा केली. याप्रसंगी गावातील खासगी डॉक्टरांनीही मोलाची मदत करून सदर आजार आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य केले. सरपंच रियाज खान, पंचायत समिती सदस्य गणेश सोनबोईर, चैनसिंग मडावी, कोटवार यांनी रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यासाठी मदत केली. दोन-तीन तासात सुटीबुधवार व गुरूवारी या दोन्ही दिवशी तब्बल ३४६ रूग्णांवर ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. हे रूग्ण चिल्हाटी, ककोडी, धवलखेडी, गणूटोला, मूरमाडी, तुंबीकसा येथील रहिवासी आहेत. जागेअभावी प्रत्येक रूग्णास जवळपास दोन ते तीन तास उपचार करून नंतर सुटी देण्यात येत होती. वैद्यकीय अधिकारी जी.एस.काळे यांनी रूग्णांना ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून दिल्याने मोठे सहकार्य मिळाले. जनचर्चेनुसार मिठाई व गुपचूपच्या सेवनानेच मंडईतील लोकांना प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे.