शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

स्वाध्याय माला उपक्रमात जिल्हा राज्यात टाॅप टेनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी भाषा आणि गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका प्राप्त होते.

ठळक मुद्दे१९ हजार विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण : नेटवर्कच्या समस्येवर केली मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील सात आ- महिन्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. याच अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वाध्याय उपक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी भाषा आणि गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका प्राप्त होते. त्यातील कोणते प्रश्न चूक आणि बरोबर याची माहिती विद्यार्थ्यांना मिळते. आतापर्यंत सहा स्वाध्याय झाले आहेत. एकाच मोबाईलवर अनेक विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविता येत असल्याने ही बाब विद्यार्थ्यांसाठी सोयीची आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला राज्यात विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक ७८ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी चंद्रपूर जिल्ह्याने केली आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, काही अडचणी आल्यास त्या त्वरित सोडविता याव्यात यासाठी जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी रवींद्र रहमतकर यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्हाचा समावेश असून यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, डायटचे प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

स्मार्ट फोनची समस्या नाही ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्ट फोन नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. शिवाय याचा विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवरसुद्धा परिणाम होत होता. मात्र स्वाध्याय माला उपक्रमात एकाच मोबाईलवर अनेक विद्यार्थ्यांना चाचणी देता येत असल्याने स्मार्ट फोनची समस्या नाही. कव्हरेज अडचण तरी नो प्राब्लेम जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फटका बसत आहे. मात्र या अडचणीतसुद्धा जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला ही सुद्धा कौतुकाची बाब आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षण