शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

स्वाध्याय माला उपक्रमात जिल्हा राज्यात टाॅप टेनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी भाषा आणि गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका प्राप्त होते.

ठळक मुद्दे१९ हजार विद्यार्थ्यांनी घेतले ऑनलाईन शिक्षण : नेटवर्कच्या समस्येवर केली मात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या संक्रमणामुळे मागील सात आ- महिन्यापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. याच अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वाध्याय उपक्रमात गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.विद्यार्थ्यांनी स्वत:चे मूल्यांकन करावे यासाठी स्वाध्यायच्या माध्यमातून सराव करण्यात येत आहे. याचा गोंदिया जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थी लाभ घेत आहेत. हा उपक्रम व्हॉटस्ॲप बेस असून पहिली ते दहावी या वर्गासाठी या उपक्रमाची सुरुवात ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. प्रश्नमंजूषेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांना दर शनिवारी भाषा आणि गणिताचे १० प्रश्न देण्यात येतात. मुलांनी प्रश्न सोडविल्यानंतर लगेच उत्तरपत्रिका प्राप्त होते. त्यातील कोणते प्रश्न चूक आणि बरोबर याची माहिती विद्यार्थ्यांना मिळते. आतापर्यंत सहा स्वाध्याय झाले आहेत. एकाच मोबाईलवर अनेक विद्यार्थ्यांना स्वाध्याय सोडविता येत असल्याने ही बाब विद्यार्थ्यांसाठी सोयीची आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाला राज्यात विदर्भात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वाधिक ७८ हजार ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी चंद्रपूर जिल्ह्याने केली आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, काही अडचणी आल्यास त्या त्वरित सोडविता याव्यात यासाठी जिल्हा संपर्क अधिकारी नेमण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यासाठी रवींद्र रहमतकर यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमामध्ये राज्यातील पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्हाचा समावेश असून यासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, डायटचे प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

स्मार्ट फोनची समस्या नाही ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्ट फोन नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत होते. शिवाय याचा विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवरसुद्धा परिणाम होत होता. मात्र स्वाध्याय माला उपक्रमात एकाच मोबाईलवर अनेक विद्यार्थ्यांना चाचणी देता येत असल्याने स्मार्ट फोनची समस्या नाही. कव्हरेज अडचण तरी नो प्राब्लेम जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा फटका बसत आहे. मात्र या अडचणीतसुद्धा जिल्ह्यातील १९ हजार १५९ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला ही सुद्धा कौतुकाची बाब आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षण