शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

स्वच्छ भारत अभियानाची केंद्रीय समितीद्वारे पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:57 IST

शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात

ठळक मुद्देजिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : शहर पूर्ण हागणदारीमुक्त झाले असून जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांकडून शहराला हागणदारीमुक्त व स्वच्छ शहर घोषित करण्यात आले. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या त्रयस्त अशा क्यूसीआय या संस्थेमार्फत देवरी शहराची ओडीएफ व स्वच्छतेसंदर्भात पाहणी करण्याकरिता शुक्रवारी (दि.२२) व शनिवारी (दि.२३) रोजी क्यूसीआय समितीने भेट देऊन पाहणी केली.या वेळी या समितीने देवरी शहरातील ओडीएफ स्पॉट, सार्वजनिक शौचालय व त्यांचा वापर, सोईसुविधा, शहर सौंदर्यीकरण याबाबतीचा आढावा घेतला.या समितीमध्ये पर्यवेक्षक गोविंद चव्हाण व ऋषीराज रॉय यांचा समावेश होता. त्यांच्या भेटीदरम्यान नगराध्यक्ष सुमन बिसेन, उपाध्यक्ष ओमप्रकाश, बांधकाम सभापती आफताब उर्फ अन्नूभाई शेख, गटनेते संतोष तिवारी, नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.क्यूसीआय पथकाने शुक्रवारी (दि.२२) देवरी शहरात आगमन झाल्यानंतर प्रथम त्यांनी मनोहरभाई पटेल हायस्कूल संलग्न कनिष्ठ महाविद्यालय, राणी दुर्गावती चौक मार्केट परिसर, बाजार चौक, पटाची दान, केशोरी तलाव व चिचगड रोड येथील सार्वजनिक शौचालय, बस स्टॅन्ड आणि माँ धुकेश्वरी मंदीर परिसरातील शौचालयविषयक सुविधा व स्वच्छतेसंदर्भात संपूर्ण आढावा घेतला. जीपीएस पध्दतीने जीओटॉग फोटो व आपला अहवाल आॅनलाईन दिल्लीला पाठविला.याप्रसंगी मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांना या बाबतीत समितीने विचारले असता त्यांनी सांगितले की, शहर संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहे. प्रत्येक घरी शौचालय असल्याने कोणताही नागरिक उघड्यावर शौचास जात नाही. तसेच बाहेरुन येणाºया लोकांकरिता, व्यापारी वर्गाकरिता शहरात विविध ठिकाणी दहा सार्वजनिक शौचालये व स्वच्छतागृह बांधून पूर्ण झाले आहेत. तेथे पाणी व विजेची सुविधा आहे. त्यामुळे क्यूसीआय पाहणीत सकारात्मक परिणाम प्राप्त होऊन देवरी शहराला पुन्हा एक सन्मान मिळण्याची शक्यता आहे. देवरी नगरी क्यूसीआय समितीच्या पाहणीला समोर जाणारी नागपूर विभागातील नवनिर्मित नगर पंचायतमधील एकमेव पहिली नगर पंचायत आहे, ही बाब देखील विशेष महत्त्वाची आहे. या वेळी नगराध्यक्ष सुमन बिसेन यांनी नगर पंचायतने अतिशय नियोजनपूर्वक आखणी करुन कठोर मेहनत घेतल्याने हे शक्य झाले, असे बोलून दाखविले. यात मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी सुरूवातीपासून शौचालय बांधणे व उघड्यावर बसू नये, याकरिता विशेष प्रयत्न केल्याने व नागरिकांनी या अभियानात सहकार्य दिल्याने देवरी शहर संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकले. तसेच या कामात नगर पंचायतच्या कर्मचाºयांना सुद्धा याचे श्रेय दिले आहे.