शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

मतदार ओळखपत्राला आधारची लिंक

By admin | Updated: April 29, 2015 00:04 IST

निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडण्याची मोहिम सर्वत्र सुरू केली आहे.

बीएलओ लागले कामाला : आॅनलाईन सुविधा उपलब्ध गोंदिया : निवडणूक विभागाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडण्याची मोहिम सर्वत्र सुरू केली आहे. यांतर्गत रविवारी सुटीच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांचा मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक बीएलओ रजिस्टरवर नोंद करून घेत आहेत. मतदाराची ओळख करून देणारे मतदार ओळखपत्र निवडणुकीच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाचे दस्तावेज मानले जाते. हे मतदार ओळखपत्र विना अडथळा मतदानाचा हक्क बजविण्यास मदत करते. मात्र दूरूपयोग व राजकीय स्वार्थ साधणाऱ्या काही राजकीय नागरिकांनी मात्र याचा दूरूपयोग करून दोन ते तीन ओळखपत्र तयार करवून घेतल्याचे कळते. गणातील आरक्षण बघता याच मतदान ओळखपत्रांचा वापर करण्यासाठी शक्कल लढवून मतदार ओळखपत्र त्यांचेसाठी फायद्याचे ठरत असले तरी शासकीय यंत्रणेला डोकेदुखीचा विषय बनला आहे.व्यक्ती ज्याठिकाणी बदली घेवून जातात त्या ठिकाणचे मतदार ओळखपत्र तयार करतात, असे मतदार दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करीत असल्याच्या घटनाही उजेडात आल्या आहेत. मात्र मतदार यादीत नाव आहे. त्याचबरोबर ओळखपत्र असल्याने निवडणूक विभागही कोणतीच कारवाई करू शकत नाही. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्ड जोडण्याची मोहिम जिल्हाभर सुरू आहे. तालुकास्तरावर जिल्हा निवडणूक विभागाने ब्लॉक लेव्हल आॅफीसरकडे (बीएलओ) हे काम सोपविले आहे. यात एका रजिस्टरमध्ये मतदार ओळखपत्रांचे क्रमांक व मतदारांचे नाव देण्यात आले आहे. त्यासमोर मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाचा स्वतंत्र रकाना तयार करण्यात आला आहे. हे दोन रकाने ब्लॉक लेव्हल आॅफीसर केंद्रावर जावून संबंधीतांकडून भरून घेत आहेत.पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान संभाव्य चूका किंवा बोगस मतदान होवू नये ही बाब लक्षात घेत सर्व मतदार ओळखपत्र आधार कार्डने जोडण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. मतदार कार्डाला आधार कार्ड जोडल्या बरोबर संबंधित व्यक्तीचे नाव दोन जिल्ह्यांच्या निवडणूक यादीत किंवा दोन गावांच्या निवडणूक यादीत असल्यास ते लक्षात घेवून जिल्ह्याच्या मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यात मदत होईल. (शहर प्रतिनिधी)मोहीम ३१ जुलैपर्यंत मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड क्रमांक लींक करण्याची ही मोहीम येत्या ३१ जुलै पर्यंत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत महिन्याच्या दुसऱ्या रविवारी विशेष अभियान घेतले जात आहे. त्यानुसार येत्या १७ मे रोजी हे अभियान राबविले जाणार. यासाठी बीएलओंकडे जबाबदारी असून त्यांना मतदान केंद्रांवर सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत काम करायचे असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी सांगितले.