शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

गणेशनगरवासीयांचा गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेकडे डम्पिंग यार्ड नसल्याने शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच संपला नसून त्या कचऱ्याला कुणीतरी दररोज आग लावत असल्याने निघणाऱ्या धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण झाले आहे. अशात आता जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना यावर काही तोडगा काढावा, अशी मागणी गणेशनगरवासीयांनी केली आहे.शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे. परिणामी राणी सती मंदिर, बालाजी मंदिर, स्टेट बँक कॉलनी, सेल्सटॅक्स कॉलनी, गौरीनगर, सर्कस मैदान, बिडवाईकर चॉल, सुबोध चौक, अशोक कॉलनी यांसह अन्य परिसरातील नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. कचऱ्यात असलेल्या कपडे, प्लॉस्टिक, चामडे यांसह अन्य रासायनिक वस्तूंपासून तयार झालेला हा धूर विषारी असतो. अशा विषारी धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण होत आहे. यामुळे मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद करून कचऱ्याला आग लावणाऱ्याला पकडण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

गणेशनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात- सध्या दिल्लीतील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजत असून, दिल्लीत लॉकडाऊनची गरज असल्याचे बोलले जात आहे. अशाच परिस्थितीत गणेशनगरवासी जगत असून धुरामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विविध प्रकारच्या वस्तूंपासून निघणारा किती विषारी असणार यावरून आता गणेशनगरवासी चांगलेच संतप्त आहेत. यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळीचा त्रास वाढला- एरवी निघणारा धूर हवेतून उडून जातो. मात्र, हिवाळ्यात धुक्यामुळे हवेतच असतो व त्यामुळे त्रास अधिकच वाढतो. त्यात गणेशनगर परिसरातील नागरिकांकडून खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळ आदी समस्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.  जिल्हा व शहर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

१०० वर्षांनंतर घनकचरा प्रकल्प नाही- गोंदिया नगर परिषदेच्या स्थापनेला १०० वर्षांचा काळ लोटला असूनही आतापर्यंत नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. शोकांतिका म्हणजे प्रकल्प तर सोडाच, प्रकल्पासाठी आतापर्यंत जागा मिळविण्यातही नगर परिषदेला यश आलेले नाही. मध्यंतरी ग्राम सोनपुरी येथे जागा घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, गावकऱ्यांनी त्याला विरोध केल्याने ही जागादेखील आता हातून गेल्यातच आहे. अशात आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही तरी पावले उचलण्याची गरज आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा