शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

गणेशनगरवासीयांचा गुदमरतोय श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेकडे डम्पिंग यार्ड नसल्याने शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. हा प्रकार एवढ्यावरच संपला नसून त्या कचऱ्याला कुणीतरी दररोज आग लावत असल्याने निघणाऱ्या धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण झाले आहे. अशात आता जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना यावर काही तोडगा काढावा, अशी मागणी गणेशनगरवासीयांनी केली आहे.शहरातील २१ प्रभागांतून दररोज सुमारे ६० टन कचरा निघत असून, तो सर्व कचरा शहरातील मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. परिणामी मोक्षधाम परिसरच आता नगर परिषदेचे डम्पिंग यार्ड झाले आहे. तेथे सध्या कचऱ्याचे डोंगरच तयार झाले आहेत. टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात कपडे, प्लास्टिक, चामडे आदींचा समावेश राहतो. अशात अज्ञात व्यक्तींकडून त्या कचऱ्याला दररोज सायंकाळी आग लावली जाते. या आगीमुळे कचऱ्यातून निघणारा हा विषारी धूर गणेशनगर परिसरात पसरत आहे. परिणामी राणी सती मंदिर, बालाजी मंदिर, स्टेट बँक कॉलनी, सेल्सटॅक्स कॉलनी, गौरीनगर, सर्कस मैदान, बिडवाईकर चॉल, सुबोध चौक, अशोक कॉलनी यांसह अन्य परिसरातील नागरिकांना दारे-खिडक्या बंद करून राहावे लागत आहे. कचऱ्यात असलेल्या कपडे, प्लॉस्टिक, चामडे यांसह अन्य रासायनिक वस्तूंपासून तयार झालेला हा धूर विषारी असतो. अशा विषारी धुरामुळे गणेशनगरवासीयांना आता श्वास घेणे कठीण होत आहे. यामुळे मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद करून कचऱ्याला आग लावणाऱ्याला पकडण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

गणेशनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात- सध्या दिल्लीतील प्रदूषणाचा विषय चांगलाच गाजत असून, दिल्लीत लॉकडाऊनची गरज असल्याचे बोलले जात आहे. अशाच परिस्थितीत गणेशनगरवासी जगत असून धुरामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. विविध प्रकारच्या वस्तूंपासून निघणारा किती विषारी असणार यावरून आता गणेशनगरवासी चांगलेच संतप्त आहेत. यामुळे आता हे प्रकरण काय वळण घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळीचा त्रास वाढला- एरवी निघणारा धूर हवेतून उडून जातो. मात्र, हिवाळ्यात धुक्यामुळे हवेतच असतो व त्यामुळे त्रास अधिकच वाढतो. त्यात गणेशनगर परिसरातील नागरिकांकडून खोकला, दमा, छाती व डोळ्यांत जळजळ आदी समस्या वाढत असल्याचे सांगितले जात आहे.  जिल्हा व शहर प्रशासनाकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

१०० वर्षांनंतर घनकचरा प्रकल्प नाही- गोंदिया नगर परिषदेच्या स्थापनेला १०० वर्षांचा काळ लोटला असूनही आतापर्यंत नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. शोकांतिका म्हणजे प्रकल्प तर सोडाच, प्रकल्पासाठी आतापर्यंत जागा मिळविण्यातही नगर परिषदेला यश आलेले नाही. मध्यंतरी ग्राम सोनपुरी येथे जागा घेतल्याचे सांगितले जात होते. मात्र, गावकऱ्यांनी त्याला विरोध केल्याने ही जागादेखील आता हातून गेल्यातच आहे. अशात आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही तरी पावले उचलण्याची गरज आहे.

 

टॅग्स :dumpingकचरा