शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

गणवेशाविना पहिल्या दिवशी विद्यार्थी जाणार शाळेत

By admin | Updated: June 8, 2014 00:01 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करा, गणवेश मिळेल अशी व्यवस्था करा, खाऊ द्या, असे अनेक उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात येतात. मात्र, त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेकडून

निधीची मागणी : सव्वातीन कोटी रूपये मिळाले नाहीगोंदिया : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करा, गणवेश मिळेल अशी व्यवस्था करा, खाऊ द्या, असे अनेक उपक्रम राबविण्याचे निर्देश शासनस्तरावरून देण्यात येतात. मात्र, त्याकरिता प्रशासकीय यंत्रणेकडून वेळेत निधीच मिळत नाही. हा प्रकार दरवर्षीचाच झाला. २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. वारंवार सर्वशिक्षा अभियान आपल्या विभागाकडे पत्रव्यवहार करते, परंतु ३ कोटी २६ लाख २५ हजार ६00 रुपयांचा निधी अजूनही प्राप्त झाला नाही. त्यामुळे या शैक्षणिक सत्राची सुरूवात विद्यार्थ्याना फाटक्या गणवेशातच करावी लागणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून गणवेश देण्यात येतो. विद्यार्थ्यांमधील गरीब-श्रीमंत हा भेद दूर होऊन त्यांच्यात एकता दिसावी, याचबरोबर त्यांच्यात शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शासनाने गणवेश देण्याची योजना सुरू केली. २६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. सर्वशिक्षा अभियानाने ९१ हजार ८११ विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गणवेश मिळावा, याकरिता महिन्याभराआधी जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाने राज्य सरकारकडे ३ कोटी २६ लाख २५ हजार ६00 रुपये निधी मागणीचा प्रस्ताव पाठविला. परंतु अद्याप जिल्हा परिषदेला निधी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा पाठपुरावा करण्यात आला. शाळा सुरू होण्याकरिता काही दिवस शिल्लक राहिलेत. त्यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळणार नाहीत, हे आता स्पष्ट होऊ लागले. गतवर्षीदेखील ७५ टक्केच निधी देण्यात आला. त्यानंतर खूप उशिराने उर्वरित निधी मिळाला. जिल्हा परिषदेने स्थानिक पातळीवर गणवेश खरेदी करा, आम्ही निधी देऊ, असे फर्मान सोडले. शाळा व्यवस्थापन समित्यांनी कापड खरेदी करून विद्यार्थ्यांना दिले. तब्बल तीन महिन्यानंतर समित्यांना पैसे देण्यात आले. यावर्षीदेखील तोच प्रकार घडणार असल्याचे दिसून येते. गणवेश खरेदी करताना सबंधित तीन कापड विक्रेत्यांकडून दरपत्रक मागविण्यात यावे. तीन शिप्यांकडून गणवेश शिलाईचा प्रस्ताव मागवून त्यातून सर्वात कमी रक्कम असलेला विक्रेता आणि शिंप्याला कंत्राट देण्यात यावे, असे नियम आहेत. परंतु, कित्येक तालुक्यांमध्ये राजकारणी मंडळी हस्तक्षेप करून बल्क खरेदीच्या माध्यमातून कापड पुरवित असल्याच्या अनेक घटना यापुर्वी उघड झाले. त्यामुळे हा प्रकार रोखण्यात जिल्हा प्रशासन यावर्षी किती  यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)