शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

विद्यार्थी बसतात बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 22:33 IST

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे.

ठळक मुद्देअपघाताचाही शक्यता : पालकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामध्येच देवरी पं.स. अंतर्गत येणाऱ्या नवाटोला येथील १२ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळासुध्दा बंद झाली आहे. परंतु तेथील विद्यार्थ्यांची सोय न करण्यात आल्यामुळे तेथील विद्यार्थी सदर बंद शाळेच्या वऱ्हांड्यातच बसून असतात.नवाटोला हे गाव राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना देवरी येथील शाळेत ये-जा करणे धोक्याचे आहे. सत्र संपण्यासाठी थोडाच कालावधी बाकी असताना शाळा बंद पडल्याने पालकवर्ग चिंतेत सापडला आहे.या वर्षीचे सत्र संपण्याकरिता दोन ते तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. चालू सत्राचे शिक्षण गावच्या शाळेत पूर्ण होऊ द्यावे. पटसंख्या वाढीसाठी पालक वर्ग प्रयत्नशील आहेत. शाळा गावातच रहावी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांना पं.स. देवरी येथे निवेदन देण्यात आले. सीईओ यांनी सुध्दा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे आश्वासन पालक वर्गाला दिले. पालकांसोबत आलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत मनमोकळी चर्चा करुन त्यांच्या वेदना ऐकून घेतल्या. तसेच विद्यार्थ्यांसोबत न्याय होईल, अशी ग्वाही दिली.या वेळी सभापती सुनंदा बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, सरपंच विद्या खोटेले, पं.स. मेहतर, कोराम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा