शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा

By admin | Updated: December 16, 2015 02:04 IST

आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे.

धोटे : चमत्कारांवर विश्वास ठेवू नकाबोंडगावदेवी : आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील कोणत्याही घटनेला कारण असते. त्या कारणाचा शोध घेवून सत्य ओळखण्याची जिज्ञासा अंगी बाळगावे. अज्ञानामुळे काही गोष्टी नकळत घडत असतात. त्याचे दुष्परिणाम म्हणून समाजात जादूटोणा, भानामती, अंगामध्ये देवी संचरणे, यासारख्या विचित्र व चमत्कारिक घटनांवर समाजमन विश्वास ठेवतो. अशा अपप्रवृत्तींच्या बाबींनी आपण अधोगतीकडे वाटचाल करतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी व्यक्त केले. चान्नाबाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त प्राचार्य मधू रामटेके होते. अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भानसे, प्राचार्य लता मेश्राम, प्रा. गिरिश बोरकर, हेमंत राजगिरे, आर.डब्ल्यू. बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. धोटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी भानामती, भूतबाधा या भ्रामक कल्पनांवर कदापी विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धेच्या आहारी जावू नये, असे सांगत त्यांनी अंधश्रद्धांवर कडाडून प्रहार केला. डॉ. प्रदीप भानसे म्हणाले, भारतीय संविधानातील ५१ (क) कलमाचा आधार घेऊन मूलभूत कर्तव्याविषयी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे आवश्यक आहे. अंगामध्ये जिद्द, चिकाटी ठेवूनच ध्येयाच्या शिखरापर्यंत मजल गाठणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. सर्वप्रथम संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्ज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. संचालन जयेश भोवते यांनी केले. आभार प्रा. तारक माटे यांनी मानले. (वार्ताहर)