शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा

By admin | Updated: December 16, 2015 02:04 IST

आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे.

धोटे : चमत्कारांवर विश्वास ठेवू नकाबोंडगावदेवी : आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना विद्यार्थ्यांनी सत्याच्या कसोटीवर उतरणे अति गरजेचे आहे. दैनंदिन जीवनातील कोणत्याही घटनेला कारण असते. त्या कारणाचा शोध घेवून सत्य ओळखण्याची जिज्ञासा अंगी बाळगावे. अज्ञानामुळे काही गोष्टी नकळत घडत असतात. त्याचे दुष्परिणाम म्हणून समाजात जादूटोणा, भानामती, अंगामध्ये देवी संचरणे, यासारख्या विचित्र व चमत्कारिक घटनांवर समाजमन विश्वास ठेवतो. अशा अपप्रवृत्तींच्या बाबींनी आपण अधोगतीकडे वाटचाल करतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक डॉ. प्रकाश धोटे यांनी व्यक्त केले. चान्नाबाक्टी येथील मिलिंद विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक तथा सेवानिवृत्त प्राचार्य मधू रामटेके होते. अतिथी म्हणून अर्जुनी-मोरगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप भानसे, प्राचार्य लता मेश्राम, प्रा. गिरिश बोरकर, हेमंत राजगिरे, आर.डब्ल्यू. बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.डॉ. धोटे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी भानामती, भूतबाधा या भ्रामक कल्पनांवर कदापी विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धेच्या आहारी जावू नये, असे सांगत त्यांनी अंधश्रद्धांवर कडाडून प्रहार केला. डॉ. प्रदीप भानसे म्हणाले, भारतीय संविधानातील ५१ (क) कलमाचा आधार घेऊन मूलभूत कर्तव्याविषयी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे आवश्यक आहे. अंगामध्ये जिद्द, चिकाटी ठेवूनच ध्येयाच्या शिखरापर्यंत मजल गाठणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. सर्वप्रथम संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांसमोर दीप प्रज्ज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. संचालन जयेश भोवते यांनी केले. आभार प्रा. तारक माटे यांनी मानले. (वार्ताहर)