शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 07:10 IST

Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देएअर लिफ्ट करण्याची केली मागणीकुटुंबीयांची होतेय घालमेल

अंकुश गुंडावार

गोंदिया : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. त्यातच गुरुवारपासूनच युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. यासाठी राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी संपर्क साधून त्यांनी मदतीची मागणी केली; पण त्यांना अद्याप कुठूनच मदत न मिळाल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील पवन मेश्राम, गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र अशोक भोयर, मयूर मुनालाल नागोसे हे तिन्ही विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी शिष्यवृत्तीवर युक्रेन येथे शिकायला गेले आहेत. तिघेही एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत. मागील दोन वर्षांपासून सर्व सुरळीत सुरू असतानाच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचे ढग गडद झाले. रशियाने युक्रेनवर हल्ला करीत युद्धाला प्रारंभ करण्याचाच इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण जगसुध्दा चिंतेत आहे. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट बंद झाल्याने तेथे अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, मायदेशी परतण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र परिवाराशी सुध्दा संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यांच्या कुटुंबीयांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल आणि अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूृन आपल्याला येथून एअर लिफ्ट करा, अशी विनंती केली. मात्र, अद्यापही त्यांना कुठलीच मदत मिळालेली नाही, त्यातच आता तेथील विमानसेवा सुद्धा बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

पैसेही संपले, राहण्याचा प्रश्न

युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्याच्या भीतीने तेथील नागरिकसुद्धा शहर सोडून जात आहेत. कुटुंबीयांनी पाठविलेले पैसेसुद्धा ट्रान्सफर होत नसून जवळचे खाण्या-पिण्याचे साहित्यसुद्धा संपत आले आहे. येथील वीज आणि पाणी पुरवठासुद्धा बंद करण्याचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत आम्ही येथे राहायचे कसे, असा बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याचे पवन मेश्राम याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

काहीही करा; पण आमच्या मुलांना सुखरूप आणा

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कधी एकदा आपली मुले सुखरूप घरी परततात, याची चिंता कुटुंबीयांना सतावत आहे.

टॅग्स :warयुद्ध