शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 07:10 IST

Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देएअर लिफ्ट करण्याची केली मागणीकुटुंबीयांची होतेय घालमेल

अंकुश गुंडावार

गोंदिया : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. त्यातच गुरुवारपासूनच युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. यासाठी राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी संपर्क साधून त्यांनी मदतीची मागणी केली; पण त्यांना अद्याप कुठूनच मदत न मिळाल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील पवन मेश्राम, गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र अशोक भोयर, मयूर मुनालाल नागोसे हे तिन्ही विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी शिष्यवृत्तीवर युक्रेन येथे शिकायला गेले आहेत. तिघेही एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत. मागील दोन वर्षांपासून सर्व सुरळीत सुरू असतानाच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचे ढग गडद झाले. रशियाने युक्रेनवर हल्ला करीत युद्धाला प्रारंभ करण्याचाच इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण जगसुध्दा चिंतेत आहे. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट बंद झाल्याने तेथे अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, मायदेशी परतण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र परिवाराशी सुध्दा संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यांच्या कुटुंबीयांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल आणि अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूृन आपल्याला येथून एअर लिफ्ट करा, अशी विनंती केली. मात्र, अद्यापही त्यांना कुठलीच मदत मिळालेली नाही, त्यातच आता तेथील विमानसेवा सुद्धा बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

पैसेही संपले, राहण्याचा प्रश्न

युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्याच्या भीतीने तेथील नागरिकसुद्धा शहर सोडून जात आहेत. कुटुंबीयांनी पाठविलेले पैसेसुद्धा ट्रान्सफर होत नसून जवळचे खाण्या-पिण्याचे साहित्यसुद्धा संपत आले आहे. येथील वीज आणि पाणी पुरवठासुद्धा बंद करण्याचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत आम्ही येथे राहायचे कसे, असा बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याचे पवन मेश्राम याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

काहीही करा; पण आमच्या मुलांना सुखरूप आणा

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कधी एकदा आपली मुले सुखरूप घरी परततात, याची चिंता कुटुंबीयांना सतावत आहे.

टॅग्स :warयुद्ध