शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मायदेशी परतण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 07:10 IST

Gondia News युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे.

ठळक मुद्देएअर लिफ्ट करण्याची केली मागणीकुटुंबीयांची होतेय घालमेल

अंकुश गुंडावार

गोंदिया : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाचे ढग अधिक गडद झाले आहेत. त्यातच गुरुवारपासूनच युक्रेनमधील हवाई वाहतूकसुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे तेथे अडकलेल्या गोंदिया जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची आपल्या मायदेशी परतण्यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून धडपड सुरू आहे. यासाठी राज्य सरकार तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदारांशी संपर्क साधून त्यांनी मदतीची मागणी केली; पण त्यांना अद्याप कुठूनच मदत न मिळाल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील पवन मेश्राम, गोरेगाव तालुक्यातील उमेंद्र अशोक भोयर, मयूर मुनालाल नागोसे हे तिन्ही विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी शिष्यवृत्तीवर युक्रेन येथे शिकायला गेले आहेत. तिघेही एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत आहेत. मागील दोन वर्षांपासून सर्व सुरळीत सुरू असतानाच रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्धाचे ढग गडद झाले. रशियाने युक्रेनवर हल्ला करीत युद्धाला प्रारंभ करण्याचाच इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण जगसुध्दा चिंतेत आहे. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू करण्यात आले होते. मात्र, एअरपोर्ट बंद झाल्याने तेथे अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. जिल्ह्यातील तीन विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून, मायदेशी परतण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यांनी आपले कुटुंबीय आणि मित्र परिवाराशी सुध्दा संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यांच्या कुटुंबीयांनी खा. प्रफुल्ल पटेल, आ. विनोद अग्रवाल आणि अन्य लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूृन आपल्याला येथून एअर लिफ्ट करा, अशी विनंती केली. मात्र, अद्यापही त्यांना कुठलीच मदत मिळालेली नाही, त्यातच आता तेथील विमानसेवा सुद्धा बंद झाल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

पैसेही संपले, राहण्याचा प्रश्न

युक्रेनमध्ये युद्ध सुरू होण्याच्या भीतीने तेथील नागरिकसुद्धा शहर सोडून जात आहेत. कुटुंबीयांनी पाठविलेले पैसेसुद्धा ट्रान्सफर होत नसून जवळचे खाण्या-पिण्याचे साहित्यसुद्धा संपत आले आहे. येथील वीज आणि पाणी पुरवठासुद्धा बंद करण्याचा इशारा दिला आहे. अशा स्थितीत आम्ही येथे राहायचे कसे, असा बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याचे पवन मेश्राम याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

काहीही करा; पण आमच्या मुलांना सुखरूप आणा

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. कधी एकदा आपली मुले सुखरूप घरी परततात, याची चिंता कुटुंबीयांना सतावत आहे.

टॅग्स :warयुद्ध