शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

मोबाईल टॉवर बंद झाल्यामुळे विद्यार्थी व नागरिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

इंदोरा बुज : तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी खुर्द येथील रिलायन्स जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर मागील २० दिवसांपासून बंद असल्यामुळे ...

इंदोरा बुज : तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी खुर्द येथील रिलायन्स जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर मागील २० दिवसांपासून बंद असल्यामुळे या गावातील विद्यार्थी व नागरिक अडचणीत आले आहेत. विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे त्यांचे पेपर होऊच शकत नाही. टॉवर बंद केल्यामुळे या गावातील नागरिकांचे जिओचे मोबाईल बंद झाले असून, नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे या गावातील सर्वच विद्यार्थी अडचणीमध्ये आले असून, परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

येथील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार मागील एक वर्षापूर्वीपासून ग्राम करटी खुर्द येथे जिओ कंपनीच्या व्यवस्थापकांनी याच गावातील शेतकरी किशोर ठाकरे यांच्या शेतामध्ये गावातच टॉवर उभा केला. टॉवरचे काम पूर्ण होऊन मोबाईल नेटवर्कची सेवासुद्धा उपलब्ध झाली. गावातच टॉवर झाल्यामुळे गावातील प्रत्येकाने जिओ कंपनीचे सीमकार्ड घेऊन मोबाईलचा वापर करू लागले. गावामध्येच मोबाईल टॉवर असल्याने ऑनलाईन कामे व्यवस्थित सुरू होती. यातच जेव्हापासून गावामध्ये टॉवर लावण्यात आले, त्यावेळी कंपनीच्या व्यवस्थापकांनी ग्रामपंचायत करटी खुर्दची कुठलीच परवानगी घेतली नाही. फक्त शेतमालकाला विचारून टॉवर उभा करण्यात आला. मागील एक वर्षापासून टॉवर सुरू असताना ग्रामपंचायतीने कर आकारणी केली. मागील तीन महिन्यांपासून कंपनीच्या व्यवस्थापकाला ग्रामपंचायतचे ६० हजार रुपये भरण्यासाठी मागणी बिल दिले; परंतु कंपनीने कर भरले नाही. सरपंच, ग्रामसेवक यांनी वारंवार टॅक्स भरण्यासंबंधी नोटीस दिल्या; परंतु कंपनी याकडे डोळेझाक करीत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. ग्रामपंचायत कमिटीने ठराव घेऊन टॉवर पंधरा दिवसांपूर्वी सील केला आहे. तरीसुद्धा या कंपनीच्या व्यवस्थापकाने अजूनपर्यंत कुठलीच दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी व व पंचायत समिती स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन टॉवर सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

........

परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता

मागील पंधरा दिवसांपासून टॉवर बंद असल्यामुळे गावातील सर्वाचे जिओचे नेटवर्क बंद झाले. सर्वत्र कोविड-१९ चा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. एप्रिल महिना हा परीक्षेचा असल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचे पेपर हे ऑनलाईन सुरू आहेत. अनेक विद्यार्थी कुठल्या न कुठल्या परीक्षेला बसले आहेत. या गावात नेटवर्क नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होणार आहेत.

........

‘टाॅवर व्यवस्थापकाला ग्रा.पं.चे कर भरण्यासाठी वारंवार नोटीस देऊन ऐकत नाही आणि टाॅवर लावताना ग्रा.पं.ची कुठलीच परवानगी घेतली नाही. ग्रा.पं.नी कायद्यानुसार कर आकारणी करून मागणी केली आहे. ६० हजार रुपये थकीत असल्यामुळे टॉवरला रीतसर सील केले आहे.

- वर्षा मालाधारी, सरपंच