शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

एसटीचे चालक, वाहक म्हणतात मुंबईची ड्यूटी नको रे बाबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

गोंदिया : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्टसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध ...

गोंदिया : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई येथील बेस्टसेवा विस्कळीत झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या विविध विभागांतील चालक- वाहकांना मुंबई बेस्टसेवेसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोंदिया जिल्ह्यातील अनेक चालक- वाहक मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणत नकार देत आहेत.

सुदैवाने गोंदिया आगारातील एकाही चालक, वाहकाची गतवर्षी मुंबई येथील बेस्ट बससेवेसाठी ड्यूटी लागली नव्हती. राज्यातील महामंडळाच्या इतर विभागांतील पुणे, सातारा, कोल्हापूर, धुळे, नांदेड, लातूर, जालना, तसेच विदर्भातील अमरावती, अकोला असे इतर जिल्ह्यांतील अनेक चालक- वाहकांची मुंबई बेस्टसेवेसाठी ड्यूटी लागली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने मुंबई कार्यालयातून चालक- वाहकांना मुंबईला पाठविण्याचा आदेश निघणार असल्याची माहिती आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी या बेस्टबस सेवेबद्दल चिंता व्यक्त केली असून, अनेक जण नापसंती दर्शवत आहेत. अजून प्रत्यक्षात गोंदिया आगाराला आदेश प्राप्त झाला नाही. मात्र, असा आदेश लवकरच मिळणार असल्याची माहिती आहे. मुंबई येथील आदेश निघणार असल्याच्या माहितीने कर्मचारी संघटनेमध्ये चर्चा सुरू आहे. आजही एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह शासनाच्या इतर सुविधा मिळत नसल्याने कर्मचारी संतप्त आहेत. त्यातच शासनाने मुंबई येथील बससेवेसाठी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचा आदेश दिल्यास कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारीही शासनाने घेण्याची गरज आहे. यासोबतच चालक, वाहकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यानंतरही कर्मचारी मात्र मुंबईचे नाव ऐकताच नाहीच म्हणत आहेत.

-----------------------

-गतवर्षी गोंदिया जिल्ह्यातील किती चालकांनी परराज्यात कर्तव्य निभावले- ००

- परत आल्यानंतर किती जण पॉझिटिव्ह निघाले- ००

----------------------

यावर्षी अद्यापतरी कर्मचाऱ्यांना पाठविण्याचे आदेश नाही

परराज्यातील मजुरांना सोडताना झाला होता त्रास

मुंबईला कर्तव्यासाठी गेल्यावर आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे अनेक जण मुंबईची ड्यूटी नको रे बाबा, असे म्हणू लागले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यांतील ज्या एसटीच्या चालक- वाहकांनी मुंबईला बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावले त्यातील अनेकांना कोरोनाने ग्रासले होते. आजही त्यांचे कुटुंबीय मदतीपासून वंचित असल्याची माहिती आहे.

---------------------------

चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया

एकीकडे सरकार मुंबईला कर्तव्यासाठी बोलावत आहे; पण दुसरीकडे त्याच चालक- वाहकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांची जबाबदारी एसटी किंवा शासन घेत नाही. शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईही मिळत नसल्याने शासनाने चालक- वाहकांचा विचार करण्याची गरज आहे.

-वाहक, गोंदिया आगार

--------------------------

गतवर्षी कोरोनाकाळात इतर राज्यांतील मजुरांना सोडण्याचे कर्तव्य निभावले. सुदैवाने मुंबईला जावे लागले नाही. मात्र, आता वय वाढत चालल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती वाटत आहे. ५० व यापुढील कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नये, अशी आमची चालक- वाहक संघटनेची शासनाकडे मागणी आहे.

-चालक, गोंदिया आगार

------------------------

सुदैवाने जिल्ह्यातील एकाचीही मुंबईला ड्यूटी लागलीच नाही

मागील लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील अनेक चालक- वाहकांनी स्थलांतरित परराज्यातील मजुरांना सोडण्यासाठी कर्तव्य निभावले होते. यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्यापासून घरी पोहोचेपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मात्र, सुदैवाने जिल्ह्यातील एकाही चालक- वाहकाला मुंबई येथील बेस्टसेवेसाठी कर्तव्य निभावण्यासाठी जावेच लागले नसल्याने कर्मचारी निश्चिंत होते. मात्र, आता पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून विविध विभागांतील चालक- वाहकांची नावे मागविण्यात येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चिंता सतावू लागली आहे.