शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
2
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
3
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
4
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
5
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
6
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
7
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
8
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
9
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
10
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
11
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
12
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
13
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
14
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
15
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
16
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
17
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
18
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
19
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
20
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक

केशोरी तालुका निर्मितीसाठी दोन दशकापासून संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून केशोरी या गावाची जिल्ह्यात ओळख आहे. तालुका निर्मितीसाठी आवश्यक असलेला ...

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग म्हणून केशोरी या गावाची जिल्ह्यात ओळख आहे. तालुका निर्मितीसाठी आवश्यक असलेला परिसर व लोकसंख्या तथा भौगौलिक परिस्थिती तालुका निर्मितीच्या निकषाची पूर्तता करीत आहे. यामुळे तालुका निर्मिती व्हावी यासाठी गेल्या दोन दशकांपासून सतत तालुका निर्मिती संघर्ष समितीचा शासनाकडे लढा सुरू आहे. परंतु जे शासन सत्तेवर येते ते आश्वासनाच्या लालीपॉपशिवाय काहीच देत नाही. यामुळे या भागातील नागरिक शासनाप्रती नाराजी व्यक्त करीत आहेत.

या परिसरातील गावांची केशोरी ही प्रमुख बाजारपेठ आहे. येथे बँका, पोलीस स्टेशन, शाळा-महाविद्यालय आणि सर्व विभागाचे कार्यालय, सोई- सुविधा उपलब्ध आहेत. येथील मीरची अख्ख्या महाराष्ट्रात परिचित आहे. लागूनच इटियाडोह धरण, प्रतापगड, बंगाली, तिबेटियन वसाहतसारखी पर्यटनस्थळे आहेत. केशोरीला नवीन तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणून परिसरातील ४५ गावांच्या ग्रामपंचायत ठरावानिशी भौगौलिक परिसर दर्शन, नकाशासह फाइल शासनाकडे सादर करून सर्वपक्षीय संघर्ष समितीचा लढा सुरू आहे. दरवर्षी नागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात केशोरी तालुका निर्मितीचा मुद्दा घेऊन मागणी केली जाते. परंतु या अधिवेशनात केशोरी तालुका निर्मितीचा मुद्दाच चर्चेत येत नसल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असते.

यावरून केशोरी तालुका निर्मितीसाठी जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांचे नेतृत्व कमी पडत असावे, अशी शंका निर्माण होते. मागील पंचवर्षिक काळातील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्या वेळचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात येथील सर्वपक्षीय संघर्ष समितीने निवेदन घेऊन केशोरी तालुका निर्मिती फाइल सादर करुन मागणी करण्यात आली होती. परंतु त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. अनेकदा संघर्ष समितीकडून प्रयत्न केले जात आहेत. या जिल्ह्याचे आताचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी-मोरगाव येथे २७ रोजी जनता दरबार आयोजित करून तालुक्यातील अडचणी जाणून घेतल्या. त्यामध्येसुध्दा केशोरी तालुका निर्मिती करण्याचे निवेदन सादर करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मंत्रिमंडळातील पालकमंत्री देशमुख यांनी ज्या आत्मीयतेने जनता दरबार भरवून परिसरातील मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासित केले आहे. त्याप्रमाणे या मागासलेल्या परिसराचा विकास करून गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाची दखल घेऊन केशोरीला नवीन तालुक्याचा दर्जा देऊन सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम द्यावा, अशी या परिसरातील नागरिकांची मागणी आहे.