शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

निलंबनाच्या कारवाईनंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऐन दिवाळीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांना घेवून मागील १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. महांमडळ आणि न्यायालयाच्या निर्देशानंतरही कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने महामंडळाने गोंदिया आणि तिरोडा आगारातील २० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. पण यानंतरही संपकरी कर्मचाऱ्यांनी माघार घेतली नसून ते आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण हीच मुख्य मागणी पूर्ण केली नाही. यावर कर्मचारी संतापले असून त्यांनी संप सुरूच ठेवला आहे, तर या संपात ३१ ऑक्टोबरपासून गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण फेऱ्या रद्द आहेत.ऐन सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. यामुळे त्यांना काळीपिवळी व इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावे लागत आहे.  रेल्वे गाड्यात वाढली वेटिंग - मागील १३ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने बसेस पूर्णपणे ठप्प आहेत. तर दिवाळी आणि भाऊबीजनिमित्त बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. बसेस अभावी रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चारशे ते पाचशेपर्यंत वेटिंग लिस्ट आहे. आरक्षित डब्ब्यांमध्ये सुद्धा प्रवाशांची गर्दी वाढली असून आरक्षण करून जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी लोकल पॅसेंजर सुरू नाही- रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी वाढली असली तरी रेल्वे विभागाने केवळ विशेष गाड्याच सुरू ठेवून प्रवाशांची लूट कायम ठेवली आहे. लोकल आणि पँसेजर गाड्या सुरू करण्यासंदर्भात अद्यापही कुठला निर्णय रेल्वे विभागाने घेतला नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.खासगी वाहनांना सुगीचे दिवस - बसेस पूर्णपणे बंद असल्याने काळीपिवळी, खासगी ट्रॅव्हल्समधील गर्दीत वाढ झाली आहे. त्यांनी या संधीचा फायदा घेत तिकीट दरात सुद्धा ५० ते १०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे खासगी वाहनांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. याचा फटका मात्र प्रवाशांना बसत असल्याने मेघराज मेश्राम, दिवाकर चुटे, देवीदास मोहुर्ले या प्रवाशांनी यावर नाराजी व्यक्त केली.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप