शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ्या होत होत्या. मात्र मागील महिनाभरापासून बससेवा ठप्प असल्याने या दोन्ही आगारांचे दररोजचे ९ लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एसटी महामंडळाचे जोपर्यंत विलीनीकरण केले जात नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा गोंदिया आणि तिरोडा आगारात संप सुरूच असल्याने एसटीचे चाके रुतलेलीच आहेत. संपामुळे या दोन्ही आगारांच्या दररोजच्या ४१३ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी मागील महिनाभरापासून त्यांच्या मागण्यांना घेऊन संप सुरू केला आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना ४५ टक्के पगारवाढ दिल्यानंतरसुध्दा कर्मचारी एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे काही तुरळक आगार वगळता इतर ठिकाणी एसटीची सेवा बंद आहे. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा हे दोन आगार असून या दोन्ही एकूण १२० बसेस आहेत. तर ३४५ वर कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे या दोन्ही आगारांतून एकही बस धावली नाही. या आगारातून दररोज एसटीच्या दररोज ४१३ बसफेऱ्या होत होत्या. मात्र मागील महिनाभरापासून बससेवा ठप्प असल्याने या दोन्ही आगारांचे दररोजचे ९ लाख रुपयांचे नुकसान होत आहे. तर महिनाभरापासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चातसुध्दा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

खासगी वाहनांचे वाढले बुकिंग -तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे लग्न सोहळ्याला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला होता. त्यातच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुुळे लग्न सोहळे लवकर आटोपले जात आहेत. एसटीची सेवा बंद असल्याने खासगी वाहनांचे बुकिंग वाढल्याचे चित्र आहे.ग्रामीण भागातील नागरिकांचा पायी प्रवास - जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची मदार ही बऱ्याच प्रमाणात एसटीवर अवलंबून असते. मात्र बसेस बंद असल्याने आणि प्रवासाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना आठ ते दहा किमीचा प्रवास पायीच करावा लागत आहे. तर काळी-पिवळी वाहनचालकांनी तिकिटाचे दर वाढविल्याने याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान - मागील महिनाभरापासून बससेवा बंद असल्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे. खासगी वाहनाने नियमित प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर आज होणार कारवाई- संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिल्यानंतरही ते कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर सोमवारी निलबंनाची कारवाई केली जाणार असल्याचे विभागीय नियंत्रकांनी सांगितले.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप