शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहातून विवाह व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 21:42 IST

आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। हलबा-हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आदिवासी हलबा-हलबी समाज ईमानदार, मेहनती व संघटीत समाज असून तो एकत्रीतपणे सामाजीक कार्यांत अग्रणी भूमिका निभावतो. त्यात आदर्श विवाह समिती हलबा-हलबी समाजाच्या सामूहिक विवाहाची गौरवशाली परंपरा मागील २१ वर्षांपासून चालवित आहे. सामूहिक विवाह विवाहाच्या माध्यमातून नवयुगलांच्या परिवारांना आर्थिक मदत मिळत असतानाच समाजाला एकसुत्रात बांधण्याची संधीही मिळते. त्यामुळे समाजाच्या मजबुतीसाठी सामूहिक विवाहांतून विवाह व्हावे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.गोरेगाव येथे आदिवासी हलबा-हलबी समाज संघटनेच्यावतीने आयोजीत सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, सामूहिक विवाह सोहळ््यांचे आयोजन सर्व धर्म व जातींनी करावे. समृद्ध व गरीब सर्व युगल व त्यांच्या परिवारांनी सामाजीकतेला वाव देण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ््यांतच विवाह करण्याची परंपरा कायम करावी असे मत व्यक्त केले.याप्रसंगी माजी आमदार रामरतन राऊत, जी.आर.राणा, सीमा मडावी, भरत बहेकार, टोलसिंग पवार, माधुरी टेंभरे, किसन मानकर, अजमन रावते, झामसिंग बघेले, लिना बोपचे, बि.के.गावराणे, श्रावण राणा, अ‍ॅड.के.आर.शेंडे, प्रल्हाद भोयर, उषा मेंढे, शिवलाल गावड, तारण राऊत, आशिष बारेवार, पुरूषोत्तम कटरे, मनीराम मडावी, अमर वºहाडे, एस.एच.फुनसे, अर्चना राऊत, लक्ष्मीकांत बारेवार, डी.आर.गाते, पी.जी.कटरे, ओ.एस.जमदाळ, भोजराज चुलपार, डॉ.दिलीप लटये, विजय राणे, सुरेश रहांगडाले यांच्यासह मोठ्या संख्येत समाजबांधव उपस्थित होते.२७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’आदिवासी हलबा-हलबी समाजाच्यावतीने मागील २१ वर्षांपासून सामूहिक विवाह सोहळ््याची ही परंपरा सुरू आहे. यंदा या विवाह सोहळ््यात २७ जोडप्यांचे ‘शुभमंगल’ समाजबांधव व पाहुण्यांच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यात आले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल