शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

भेदभाव विसरून पक्ष बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:06 IST

पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, ...

ठळक मुद्देसंजय पुराम : पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलेभारतीय जनता पक्षाच्या सालेकसा तालुका मंडळातील प्रमुख पदाधिकारी, बुथप्रमख, शक्तीकेंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख व प्रमुख महिला, आघाडी पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयाच्या सभागृहात घेण्यात आले. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक समन्वयक म्हणून काशीराम हुकरे व उमेश मेंढे तर पाहुणे म्हणून शंकर मडावी, माजी सभापती देवराज वडगाये, बाबुलाल उपराडे, खेमराज लिल्हारे, माजी जि.प. महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, तालुका महिला आघाडी प्रमुख कल्याणी कटरे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, जया डोये, माजी उपसभापती राजकुमार विश्वकर्मा, मनोज विश्वकर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. पदाधिकाºयांचे प्रशिक्षण वर्ग सत्रानुसार घेऊन वेगवेगळ्या विषयानुरुप पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.आ. पुराम यांनी, आजघडीला भारतीय जनता पक्ष देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशात पक्षाचे बळकटीकरण करुन जनसामान्यांच्या हितासाठी काम करावे. पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन समर्पित भावनेने काम केल्याशिवाय एवढे मोठे यश मिळणे शक्य नव्हते. भाजपाप्रति जनसामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचे सांगीतले.या वेळी पक्षात सतत कर्मठतेने कार्य करणारे अजय वशिष्ठ, गुणवंत बिसेन, इसराम बहेकार, सुनील अग्रवाल, आर.डी. रहांगडाले, संजू कटरे, रमसुला चुटे, मनोज बोपचे, दिनेश शर्मा, हेमराज सुलाखे तसेच अनेक आजी-माजी सरपंच, पं.स. , जि.प. सदस्य, गाव पातळीवरील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन राजेंद्र बडोले यांनी केले. आभार मनोज बोपचे यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपा