शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भेदभाव विसरून पक्ष बळकट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:06 IST

पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, ...

ठळक मुद्देसंजय पुराम : पदाधिकाऱ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : पक्ष जेवढा बळकट होईल तेवढेच शासनाला बळ मिळेल आणि शासन आवश्यक ते सर्व निर्णय घेऊ शकेल. याचा पक्षासह सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळेल. म्हणून पदाधिकाऱ्यांनी आपसांतील मतभेद विसरुन पक्षाला बळकट ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याला महत्व द्यावे, असे आवाहन आ. संजय पुराम यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केलेभारतीय जनता पक्षाच्या सालेकसा तालुका मंडळातील प्रमुख पदाधिकारी, बुथप्रमख, शक्तीकेंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख व प्रमुख महिला, आघाडी पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालयाच्या सभागृहात घेण्यात आले. यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.उद्घाटन आ. संजय पुराम यांच्या हस्ते, भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. मार्गदर्शक समन्वयक म्हणून काशीराम हुकरे व उमेश मेंढे तर पाहुणे म्हणून शंकर मडावी, माजी सभापती देवराज वडगाये, बाबुलाल उपराडे, खेमराज लिल्हारे, माजी जि.प. महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, तालुका महिला आघाडी प्रमुख कल्याणी कटरे, पं.स. सदस्य प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, जया डोये, माजी उपसभापती राजकुमार विश्वकर्मा, मनोज विश्वकर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. पदाधिकाºयांचे प्रशिक्षण वर्ग सत्रानुसार घेऊन वेगवेगळ्या विषयानुरुप पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.आ. पुराम यांनी, आजघडीला भारतीय जनता पक्ष देशाचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात पक्षाचा झपाट्याने विस्तार होत आहे. अशात पक्षाचे बळकटीकरण करुन जनसामान्यांच्या हितासाठी काम करावे. पक्ष कार्यकर्त्यांनी मतभेद विसरुन समर्पित भावनेने काम केल्याशिवाय एवढे मोठे यश मिळणे शक्य नव्हते. भाजपाप्रति जनसामान्यांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा विश्वास टिकवून ठेवण्याची जबाबदारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर असल्याचे सांगीतले.या वेळी पक्षात सतत कर्मठतेने कार्य करणारे अजय वशिष्ठ, गुणवंत बिसेन, इसराम बहेकार, सुनील अग्रवाल, आर.डी. रहांगडाले, संजू कटरे, रमसुला चुटे, मनोज बोपचे, दिनेश शर्मा, हेमराज सुलाखे तसेच अनेक आजी-माजी सरपंच, पं.स. , जि.प. सदस्य, गाव पातळीवरील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन राजेंद्र बडोले यांनी केले. आभार मनोज बोपचे यांनी मानले.

टॅग्स :BJPभाजपा