शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिरेखनी येथील पाणीपुरवठा योजना सुरळीत करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. ...

तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. तिरोडा-खैरलांजी मार्गावरील चिरेखनीचे प्रवेशद्वार ते तिरोडा तहसील कार्यालयापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी खा. सुनील मेंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनातून ग्रामपंचायत चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल १५ वर्षांपासून बंद आहे. काचेवानी, खैरबोडी, पालडोंगरी, जमुनिया, चिरेखनी या चार गावांसाठी ही योजना तयार करण्यात आली. या गावांसाठी पिण्याचा पाण्याचा स्रोत म्हणून ही एकमेव योजना आहे. पण, ही योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तसेच तिरोडा-खैरलांजी मार्गाची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर सर्वाधिक वर्दळ असून, रस्ता खराब असल्याने अपघातांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी या रस्त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल माध्यमांवर टाकला. चिरेखनी येथील गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरी अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य घनश्याम पारधी, नितेश कटरे, संजू पारधी यांचा समावेश होता.

.........

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चिरेखनी येथील विहिरी, बोअरवेल, आदी संपूर्ण जलस्रोतामधून खारट पाणी येत असून, ते पाणी पिण्यायोग्य नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गावाबाहेर १ ते २ कि.मी. पायी जावे लागते. गावामध्ये पाणी टाकी असूनही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे, तर दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांचे आराेग्य धोक्यात आले आहे.

....