शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
11
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
12
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
13
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
14
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
15
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
16
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
17
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
18
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
19
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
20
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

चिरेखनी येथील पाणीपुरवठा योजना सुरळीत करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. ...

तिरोडा : तालुक्यातील चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १५ वर्षांपासून बंद आहे. ही योजना त्वरित सुरू करण्यात यावी. तिरोडा-खैरलांजी मार्गावरील चिरेखनीचे प्रवेशद्वार ते तिरोडा तहसील कार्यालयापर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे या रस्त्याचे त्वरित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी खा. सुनील मेंढे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यावेळी दिलेल्या निवेदनातून ग्रामपंचायत चिरेखनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तब्बल १५ वर्षांपासून बंद आहे. काचेवानी, खैरबोडी, पालडोंगरी, जमुनिया, चिरेखनी या चार गावांसाठी ही योजना तयार करण्यात आली. या गावांसाठी पिण्याचा पाण्याचा स्रोत म्हणून ही एकमेव योजना आहे. पण, ही योजना बंद असल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तसेच तिरोडा-खैरलांजी मार्गाची सुद्धा अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर सर्वाधिक वर्दळ असून, रस्ता खराब असल्याने अपघातांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पण, त्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी या रस्त्याचा व्हिडिओ तयार करून सोशल माध्यमांवर टाकला. चिरेखनी येथील गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरी अद्याप रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या दोन्ही समस्या मार्गी लावण्याची मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य घनश्याम पारधी, नितेश कटरे, संजू पारधी यांचा समावेश होता.

.........

दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चिरेखनी येथील विहिरी, बोअरवेल, आदी संपूर्ण जलस्रोतामधून खारट पाणी येत असून, ते पाणी पिण्यायोग्य नाही. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना गावाबाहेर १ ते २ कि.मी. पायी जावे लागते. गावामध्ये पाणी टाकी असूनही पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष आहे, तर दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांचे आराेग्य धोक्यात आले आहे.

....