शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 21:23 IST

जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा या तीन तालुक्यांना वादळ व पावसाने झोडपले आहे.

ठळक मुद्देतीन तालुक्यांना फटका : सर्वाधिक नुक सान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा या तीन तालुक्यांना वादळ व पावसाने झोडपले आहे. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार यात सर्वाधीक नुकसान अर्जुनी-मोरगाव तालुक्यात नोंदविण्यात आले आहे.सुर्य आग ओकून सर्वांना भाजून सोडत असताना गुरूवारी (दि.२) अचानकच जिल्ह्यात चक्रीवादळ व पावसाने हजेरी लावून चांगलेच झोडपून काढले. या चक्रीवादळ व पावसाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील राजोली, भरनोली व गोठणगाव परिसरात कहरच केला. सायंकाळी वादळ वारा व गारपीटीसह बरसलेल्या पावसाने मालमत्तेचे नुकसान केले असतानाच उन्हाळी धानालाही झोडपले. या चक्रीवादळ व पावसाने अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १४५ घर व गोठे पडले असून यात चार लाख ३५ हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वादळ व पावसाने अर्जुनी-मोरगावसह देवरी व सालेकसा तालुक्यालाही झोडपले. देवरी तालुक्यात वादळी वारा व पावसाने ४३ घरांचे अंशत: नुकसान झाले असून त्याची एक लाख ५६ हजार ५०० रूपये एवढी नोंद करण्यात आली आहे. तर सालेकसा तालुक्यात वादळाने एक घर पूर्णत: पडले असून ३७ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यात चार लाख १५ हजार रूपयांच्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. अशाप्रकारे गुरूवारच्या वादळ व पावसाने जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस