शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

पुलासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By admin | Updated: February 13, 2016 01:13 IST

विहीरगाव-बुराड्या ते भुगाव-मेंढा दरम्यानच्या चुलबंद नदीवर चार वर्षापुर्वी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले.

व्यथा विहीरगाव-भूगाव मार्गाची : जिल्हा परिषद अध्यक्षांची आंदोलनात हजेरीसानगडी : विहीरगाव-बुराड्या ते भुगाव-मेंढा दरम्यानच्या चुलबंद नदीवर चार वर्षापुर्वी पूलाचे बांधकाम पूर्ण झाले. पूलाच्या दोन्ही बाजूला शेती आहे. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या संबंधाने समाधानकारक मोबदल्याची शासनाची भूमिका न दिल्याने सदर शेती पोच मार्गासाठी अधिग्रहीत झाली नाही. चार वर्षांपूर्वी तयार झालेला पूल पोच मार्गाविना असल्याने शोभेची वास्तू म्हणून उभी आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले.दोन्ही तिरावर पोच मार्ग तयार न झाल्याने ऐलतिरावरून पैलतिरावर पायी अथवा वाहनाने पूलावरून परिसरातील नागरिकांना आवागमन करता येत नाही. भुगाव-मेंढा, विहीरगाव, कोलारी, मुरमाडी आदी गावातील नागरिकांनी कित्येकदा पोचमार्ग तयार करण्यासाठी संबंधित अधिकारी, आमदार, खासदार यांना प्रत्यक्षात निवेदन दिले. तब्बल चार वर्षाचा कालावधी लोटला पण याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून रास्ता रोको आंदोलन केले.सध्या ऐलतिरावरून पैलतिरावरील गावाकडे जाण्यासाठी पूल तयार आहे. पण पुलापर्यंत जाण्यासाठी पोच मार्ग नाही. तात्पुरती हंगामी सोय म्हणून नदीतून कच्चा रपटा मार्ग तयार करून आवागमन करावे लागत आहे. या मार्गावरील विहीरगाव बुराड्या गोपालपूरी म्हणून तर भुगाव मेंढा विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षी भुगाव, पंढरपुरला भव्यदिव्य संत सोहळा भरत असून लाखो लोकांची उपस्थिती असते. हा मार्ग सानगडी-विहीरगाव, भुगाव-मुरमाडी, पिंपळगाव-लाखनी-भंडारा असा जोडलेला आहे.या मार्गावरील नागरिकांचे भविष्यातील सोई सुविधा विचारात घेवून तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने चुलबंद नदीवरील पुलाचे बांधकाम झाले. त्यानंतर निवडणुका झाल्या. सत्ता परिवर्तन झाले. पूर्वसत्तेतील पुलासंबंधीच्या उर्वरित कामाला पूर्णत्व देण्यासाठी सध्याचे सत्तेमधील सरकार अपयशी ठरत आहे. परिणामी परिसरातील जनता स्वहिताचा लढा लढण्यासाठी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलनास प्रवृत्त झाले.या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, जिल्हा परिषद सदस्य रेखा वासनिक, विहीरगावचे सरपंच हरीभाऊ बनकर, भुगावचे सरपंच दुधराम बारस्कर, तंमुस अध्यक्ष श्रीराम राऊत, तंमुस अध्यक्ष मनोहर ईटवले, अशोक शहारे, आनंदराव बारस्कर, बाळकृष्ण सावरकर, दुर्याेधन बारस्कर, हंसराज बारस्कर, तेजराम कोचे, मनोहर नगरकर, सुभाष सावकर, मुरली बनकर, उपसरपंच माया चौबे, वैशाली सिंदीमेश्राम, वासुदेव सिंदीमेश्राम, प्रभू खंडाळकर, भुगाव व विहीरगाव येथील ग्रामपंचायत सदस्यगण व परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी नेतृत्व केले.आंदोलनाला साकोली येथील नायब तहसीलदार खोत, लाखनी येथील नायब तहसीलदार मारवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राऊत यांनी भेट देवून एक ते दीड महिन्यात पावसाळ्यापूर्वी या पोचमार्गाचे बांधकाम पूर्ण करू, असे आश्वासन दिले. यावेळी शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी पालांदूरचे सहायक पोलीस निरीक्षक एच.एम. सय्यद व साकोलीचे पोलीस निरीक्षक घुसर यांचे सहकारी उपस्थित होते. (वार्ताहर)