शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

वाढती रुग्णसंख्या विचारात घेता ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट शासनाने मंजूर केले होते. यासाठी ५० लाख रुपयांचा निधीसुध्दा मंजूर केला होता. मात्र अद्यापही हा प्लांट सुरू करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा महिन्याचा कालावधी लोटूनही आणि संदर्भात वेळाेवेळी पाठपुरावा करूनसुद्धा हा प्लांट सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून आरोग्य विभागाने याची अद्यापही गांभीर्याने दखल घेतली नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी केली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  जिल्ह्यात दररोज सहाशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरची क्षमतादेखील आता पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णसंख्येची वाढ कायम असल्याने जिल्ह्यात अजून बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मेडिकलमधील मंजूर ऑक्सिजन जनरेशन प्लांट त्वरित सुरू करून रुग्णांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन प्लांट शासनाने मंजूर केले होते. यासाठी ५० लाख रुपयांचा निधीसुध्दा मंजूर केला होता. मात्र अद्यापही हा प्लांट सुरू करण्यात आला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. सहा महिन्याचा कालावधी लोटूनही आणि संदर्भात वेळाेवेळी पाठपुरावा करूनसुद्धा हा प्लांट सुरू करण्यास दिरंगाई केली जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून आरोग्य विभागाने याची अद्यापही गांभीर्याने दखल घेतली नाही. यामुळे जिल्ह्यात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा सवाल देखील माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दररोज गंभीर होत चालली आहे. दररोज ६०० ते ७०० रुग्णांची भर पडत असल्याने आता रुग्णातील बेडदेखील अपुरे पडत आहे. औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र यानंतरही जिल्हा व आरोग्य प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. हा सर्व प्रकारच धक्कादायक असून यामुळे जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींवर माजी आ. अग्रवाल यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावर देशमुख यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे व ७ दिवसात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे आश्वासन अग्रवाल यांना दिले.  

ऑक्सिजन प्लांट झाले असते तर५० ते ६० जणांचे प्राण वाचविणे झाले असते शक्यमागील वर्षी शासनाने मेडिकलमध्ये मंजूर केलेला ऑक्सिजन प्लांट वेळेत सुरू झाला असता तर जिल्ह्यातील ५० ते ६० रुग्णांचे जीव वाचविणे शक्य झाले असते. ऑक्सिजनसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळी आली नसती. तसेच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला नसता. मात्र प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईचे परिणाम आता रुग्णांना भोगावे लागत असल्याचा आरोप माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी केला आहे. 

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची कल्पना असताना आणि ऑक्सिजन प्लांटसाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर असतानासुध्दा तो सुरू करण्याकडे यंत्रणेने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठाेर कारवाई करून रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑक्सिजन प्लांट त्वरित सुरू करण्याची गरज आहे. - गोपालदास अग्रवाल, माजी आमदार

 

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcorona virusकोरोना वायरस बातम्या