शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
4
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
5
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
6
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
7
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
8
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
9
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
10
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
11
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
12
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
13
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
14
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
15
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
16
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
17
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
18
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
19
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
20
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू

स्थायी समितीत गाजला लोकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:17 IST

उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईवर सदस्य आक्रमक : जुने पाईप विक्रीचा मुद्दा गाजला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर मंगळवारी (दि.१६) आयोजित जि.प.स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी लोकमतच्या वृत्ताचा दाखल देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत केवळ लोकमतचीच चर्चा होती.लोकसभा निवडणुकीनंतर मंगळवारी (दि.१६) जिल्हा परिषदेची पहिली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत पूर्व नियोजित पाणी टंचाई निवारण व व्यवस्थापनावर चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, यांत्रिकी विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेण्यात आले.सडक-अर्जुनी येथे नियमांना धाब्यावर बसवून जुने पाईप विक्री करण्यात आली. याबाबतची चौकशी करुन दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली. यावर लेखाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. एकंदरीत ही सभा पाणी टंचाईच्या मुद्दावर चांगलीच गाजली.लोकसभा निवडणुकीमुळे मागील महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीची सभा घेण्यात आली नव्हती. त्यानंतर मंगळवारी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. पाणी टंचाई निवारणासाठी उपाय योजनांच्या कामांवर चर्चा सुरु झाली. मात्र, चर्चेदरम्यान पाणी पुरवठा व यांत्रिकी विभागाकडून पाणी टंचाईच्या तिसºया व चौथ्या टप्प्याचा कसलाही आढावा सादर करण्यात आला नाही. विभागाकडे आढावा ही तयार नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनात आली. यावरुन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, पी.जी.कटरे, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर यांनी विभागाच्या अधिकाºयांवर चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, यंत्रणा जिल्ह्यातील पाणी टंचाईला घेवून गंभीर नसल्याचा आरोपही केला. चर्चेदरम्यान सदस्यांनी लोकमतने पाणी टंचाईच्या मुद्दावर प्रकाशित केलेल्या वृत्ताचा दाखल दिला. तसेच उन्हाळ्याला सुरूवात होवूनही पाणी टंचाईचा आराखडा तयार केला नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.मागील दोन वर्षांपासून देखभाल दुरुस्ती लेखा शिर्षका अंतर्गत बोअरवेलचे पाईप खरेदी करण्यात आले नाही. यंदाही मागणी पाहता बोअरवेल पाईप खरेदी करण्यात यावे, अशी विनंती सभागृहाच्या सदस्यांनी केली. तसा ठरावही घेण्यात आला. जिल्हा परिषद प्रशासनाकडे ३ हजार पाईप पडून आहेत. ते पाईप प्रत्येक तालुक्याला प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सडक-अर्जुनी येथील खंडविकास अधिकारी यांच्या मनमर्जी कारभारावर प्रश्न उपस्थित करीत मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित समितीच्या माध्यमातून जुन्या पाईपची विक्री व लिलाव केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.चौकशी समिती गठीतसडक-अर्जुनीच्या खंडविकास अधिकारी यांनी स्वत: अडीच तीन लाख रुपये किंमतीचे पाईप २३ हजारामध्ये लिलाव केले. हे नियमबाह्य कामे झाली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रश्नाला जि.प.सदस्य पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर यांनीही दुजोरा दिला. यावर लेखाअधिकारी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती स्थापित करुन प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही देण्यात आली.मनरेगाची कामे केव्हा सुरू करणारयानंतर जिल्ह्यात अद्यापही पर्याप्त प्रमाणात मग्रारोहयोची कामे सुरु झाली नाहीत. आजघडीला फक्त १७ हजार मजुराच्या हाताला काम मिळाले आहे. या मागचे कारण काय?असा प्रश्न पी.जी.कटरे व गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे यांनी उपस्थित केला. दरम्यान, लवकरात लवकर जास्तीत जास्त कामे सुरु करण्यात येतील अशी ग्वाही मुकाअच्या माध्यमातून देण्यात आली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद