शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

स्थायी समितीत गाजला लोकमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 21:17 IST

उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईवर सदस्य आक्रमक : जुने पाईप विक्रीचा मुद्दा गाजला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला मात्र जि.प.पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्याची पाळी आली आहे. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर मंगळवारी (दि.१६) आयोजित जि.प.स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्यांनी लोकमतच्या वृत्ताचा दाखल देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे स्थायी समितीच्या सभेत केवळ लोकमतचीच चर्चा होती.लोकसभा निवडणुकीनंतर मंगळवारी (दि.१६) जिल्हा परिषदेची पहिली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. या सभेत पूर्व नियोजित पाणी टंचाई निवारण व व्यवस्थापनावर चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, यांत्रिकी विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेण्यात आले.सडक-अर्जुनी येथे नियमांना धाब्यावर बसवून जुने पाईप विक्री करण्यात आली. याबाबतची चौकशी करुन दोषी अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली. यावर लेखाधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले. एकंदरीत ही सभा पाणी टंचाईच्या मुद्दावर चांगलीच गाजली.लोकसभा निवडणुकीमुळे मागील महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या कोणत्याही समितीची सभा घेण्यात आली नव्हती. त्यानंतर मंगळवारी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. पाणी टंचाई निवारणासाठी उपाय योजनांच्या कामांवर चर्चा सुरु झाली. मात्र, चर्चेदरम्यान पाणी पुरवठा व यांत्रिकी विभागाकडून पाणी टंचाईच्या तिसºया व चौथ्या टप्प्याचा कसलाही आढावा सादर करण्यात आला नाही. विभागाकडे आढावा ही तयार नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनात आली. यावरुन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, पी.जी.कटरे, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर यांनी विभागाच्या अधिकाºयांवर चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, यंत्रणा जिल्ह्यातील पाणी टंचाईला घेवून गंभीर नसल्याचा आरोपही केला. चर्चेदरम्यान सदस्यांनी लोकमतने पाणी टंचाईच्या मुद्दावर प्रकाशित केलेल्या वृत्ताचा दाखल दिला. तसेच उन्हाळ्याला सुरूवात होवूनही पाणी टंचाईचा आराखडा तयार केला नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.मागील दोन वर्षांपासून देखभाल दुरुस्ती लेखा शिर्षका अंतर्गत बोअरवेलचे पाईप खरेदी करण्यात आले नाही. यंदाही मागणी पाहता बोअरवेल पाईप खरेदी करण्यात यावे, अशी विनंती सभागृहाच्या सदस्यांनी केली. तसा ठरावही घेण्यात आला. जिल्हा परिषद प्रशासनाकडे ३ हजार पाईप पडून आहेत. ते पाईप प्रत्येक तालुक्याला प्रमाणात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सडक-अर्जुनी येथील खंडविकास अधिकारी यांच्या मनमर्जी कारभारावर प्रश्न उपस्थित करीत मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापित समितीच्या माध्यमातून जुन्या पाईपची विक्री व लिलाव केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला.चौकशी समिती गठीतसडक-अर्जुनीच्या खंडविकास अधिकारी यांनी स्वत: अडीच तीन लाख रुपये किंमतीचे पाईप २३ हजारामध्ये लिलाव केले. हे नियमबाह्य कामे झाली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. या प्रश्नाला जि.प.सदस्य पी.जी.कटरे, राजलक्ष्मी तुरकर यांनीही दुजोरा दिला. यावर लेखाअधिकारी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती स्थापित करुन प्रकरणाची चौकशी करण्याची ग्वाही देण्यात आली.मनरेगाची कामे केव्हा सुरू करणारयानंतर जिल्ह्यात अद्यापही पर्याप्त प्रमाणात मग्रारोहयोची कामे सुरु झाली नाहीत. आजघडीला फक्त १७ हजार मजुराच्या हाताला काम मिळाले आहे. या मागचे कारण काय?असा प्रश्न पी.जी.कटरे व गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे यांनी उपस्थित केला. दरम्यान, लवकरात लवकर जास्तीत जास्त कामे सुरु करण्यात येतील अशी ग्वाही मुकाअच्या माध्यमातून देण्यात आली.

टॅग्स :zpजिल्हा परिषद