शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

एसटी आणि रेल्वेत वाढत आहे प्रवाशांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील सुमारे दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागील सुमारे दोन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊनमध्ये आता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शिथिलता देण्यात आली आहे. सोमवारपासून (दि.७) जिल्ह्यात अनलॉकची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रवासी सेवाही सुरू झाली आहे. जिल्ह्यात कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव व अनलॉकमुळे आता नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. परिणामी नागरिक आता आपल्या कामांसाठी घराबाहेर पडत असताना दिसत आहे. यामुळे आता एसटी आणि रेल्वेने प्रवासही त्यांनी सुरू केला असल्याने एसटी आणि रेल्वेत वर्दळ होऊ लागली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात नागरिकांना प्रवासासाठी एसटी व रेल्वे मार्ग हे दोघेही सोयीस्कर पडत असल्याने नागरिक आपल्या सोयीने प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मात्र एसटीच्या फेऱ्या आता हळ‌ूवार वाढत असून शुकशुकाट असलेल्या बस स्थानकावर व रेल्वे स्थानकावरही नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे.

-----------------------------

- जिल्ह्यात रोज एसटीच्या फेऱ्या- ५०

- रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या - ३००- ५००

- धावणाऱ्या रेल्वेंची संख्या- ३७

- प्रवासी - दोन हजार

-----------------------

एसटीत नागपूर मार्गावर गर्दी

गोंदिया आगारासाठी नागपूर मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावर बाराही महिने प्रवासी राहतात. कारण, एसटीने नागपूरला जाताना भंडारा जिल्हा पडत असून पूर्वी गोंदिया जिल्हा भंडारातच येत असल्याने आजही कित्येक विभागांच्या कार्यालयांचा कारभार आजही तेथूनच चालत आहे. पुढे नागपूर येथे शिक्षण, उपचार, खरेदी तसेच मुख्य कार्यालय असल्याने कामकाजासाठी नागपूरला ये-जा असतेच.

---------------------------

रेल्वेच्या मुंबई मार्गावर गर्दी

राज्याचा संपूर्ण कारभारच मुंबई येथून चालत असल्याने शासकीय अधिकारी-कर्मचारी म्हणा, येथील व्यापारी किंवा नेते मंडळी यांना मुंबई गाठावीच लागते. शासकीय कामकाजासाठी अधिकाऱ्यांचे दौरे नेहमीच सुरू असतात. तर गोंदिया शहराला मिनी मुंबई म्हटले जात असून मोठी बाजारपेठ असल्याने व्यापारी व्यवसाय व खरेदीसाठी मुंबईला ये-जा करत असतात.

---------------------------

प्रवासी कोट

मागील सुमारे दोन महिन्यांपासून कामकाज ठप्प पडले होते. आता मात्र कोरोना नियंत्रणात आल्याने त्यातच अनलॉक झाल्याने कामकाज सुरू करावे लागेल. त्यामुळे एसटीने आता प्रवास सुरू केला आहे.

- घनशाम दमाहे (बस प्रवासी)

--------------------

लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प पडला आहे. प्रवास करता येत नसल्याने चांगलेच नुकसान झाले आहे. मात्र आता घरी बसून राहणे शक्य नसल्याने व शासनाने शिथिलता दिल्याने आता कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे कामानिमित्त प्रवास करावा लागत आहे.

- कुवरलाल पटले (बस प्रवासी)

--------------------------------

नोकरीनिमित्त आम्हाला अपडाऊन करावे लागते. लॉकडाऊनमध्ये रेल्वे बंद असल्याने दुचाकीने प्रवास करावा लागत होता. मात्र ते परवडणारे नाही. आता रेल्वे सुरू झाल्याने आमची सोय झाली आहे.

- राजेश शहारे (रेल्वे प्रवासी)

----------------------------------

रेल्वे बंद असल्याने आता खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. ते सुरक्षित नसून खिशाला परवडणारेही नाही. आता कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असून रेल्वे सुरू झाल्याने प्रवासाची सुविधा झाली आहे.

- अरूण उपासे (रेल्वे प्रवासी)

--------------------------------------

कोट

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याने आता शिथिलता मिळाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. परिणामी बसस्थानकातच उभ्या असलेल्या एसटी आता धावू लागल्या आहेत. अत्यावश्यक कामे शिवाय आता सामान्य नागरिकही आपल्या कामाला लागले असून त्यांचा प्रवास सुरू झाला आहे.

- संजना पटले

आगार प्रमुख, गोंदिया.

---------------------------------

कोट

रेल्वेने १ जूनपासून काही लोकल गाड्या सुरु केल्या आहे. तर हावडा मुंबई मार्गावरच्या नियमित गाड्या सुरु आहे. मागील तीन चार दिवसांपासून रेल्वेच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. अनलॉक झाल्यानंतर आता पुन्हा प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने नियोजन सुरु आहे.

- ए.के.राय, जनसंपर्क अधिकारी.