शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

शिक्षण विभागाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:32 IST

शिक्षण विभागाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे.

ठळक मुद्देइंग्रजी शिक्षणाकडे कल : जि.प. शाळांतील पटसंख्येला गळती, शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शिक्षण विभागाच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी शासनाचा कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. निधी खर्च करुनही सडक-अर्जुनी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याची बाब पुढे आली आहे.सडक-अर्जुनी तालुक्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या तुकडीच्या ३६ शाळा आहेत. वर्ग १ ते ४ च्या तुकडीचे ७७ शाळा आहेत तर वर्ग १ ते ८ च्या तुकडीचे ४ शाळा तालुक्यात पहावयास मिळतात. एकूण ११७ शाळांमध्ये ७ हजार ९५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्याच्या केजी १, केजी २ व सीबीएससीच्या शाळांमुळे पालकांचा कल आता इंग्रजी शिक्षणाकडे वळला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड, सडक-अर्जुनी, डोंगरगाव डेपो, डव्वा, पांढरी, कोकणा-जमी, खजरी येथील बहुतेक पालक आता दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी गोंदिया, साकोली, गोरेगाव, नागपूर, भंडारा आदी शहरांच्या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवित आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सध्या विद्यार्थी संख्या फारच कमी होत आहे. त्यात २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १४ शाळा तर १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या १८ शाळा सडक अर्जुनी तालुक्यात आहेत. १० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेत जि.प.कडून दोन शिक्षक देवून लाखोंचा खर्च केला जातो. पण त्या कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेचा दर्जा पाहिजे तसा गुणवत्ता देणारा दिसून येत नाही. तालुक्यात काही शाळेत तर दोन शिक्षकांचा वर्ग आहे. पण मुले कमी असल्यामुळे एक शिक्षक तीन दिवस तर दुसरा शिक्षक उर्वरित दिवस शाळा चालवून शैक्षणिक वेळ काढण्याचा प्रकार सुरू आहे. कमी मुलांची पटसंख्या असलेल्या शाळेचा दर्जा चांगलाच उंचावला पाहिजे, पण तसे होत नाही. कुणीही अंगाला लावून घेत नसल्यामुळे जि.प. शाळेचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे.डिजिटल शाळेमुळे विद्यार्थ्यांना कलागुण, कौशल्य चांगले अवगत होवून खेळीमेळीच्या वातावरणात चांगले शिक्षण होईल, अशी शासनाची संकल्पना होती. तालुक्यातील बहुतेक शाळांचे डिजिटल शाळेत रुपांतर करण्यात आले. काही शाळेतील डिजिटल साहित्य शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. काही शाळेत वीज जोडणी नसल्यामुळे संच बंद पडल्याचे चित्र दिसत आहे. बहुतेक शाळांचे शिक्षक गोंदिया, भंडारा, जवाहरनगर, अर्जुनी-मोरगाव, देवरी, गोरेगाव, लाखांदूर येथून ये-जा करतात. मागील एका वर्षापूर्वी तर काही हुशार शिक्षकांनी अपडाऊन करण्याच्या सोयीसाठी तालुक्यातील रस्त्यावरच्या शाळा बदली करुन घेतल्याचे दिसते. सडक-अर्जुनी, कोहमारा बसस्थानकावर कर्मचाºयांची गर्दी दिसून येते.