शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

शहरात जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील.

ठळक मुद्दे२२ पर्यंत जनता कर्फ्यू : शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसला

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षितता बाळगण्यासाठी नगरातील स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटन, अधिकारी-कर्मचारी व अनेक सेवाभावी नागरीकांनी नगर परिषदेकडे जनता कर्फ्यू लावण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. यावर नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी तातडीने निर्णय घेऊन सर्वानुमते १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान ५ दिवस जनता कर्फ्यु लावण्याची घोषणा केली. त्यानुसार, शहरात शुक्रवारी (दि.१८) सकाळपासून शहरातील सर्व दुकानदारांनी स्वत:ची दुकाने बंद ठेवीत जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद दिला.शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील. फळ, भाजी, किराणा दुकाने ३ ते ६ वाजतापर्यंत सुरू राहतील. दुध विक्रेत्यांनी सकाळी ९ वाजतापर्यंतच दुध विकावयाचे आहे.जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याने पोलीस ठाणे, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना सहकायार्साठी निवेदन देण्यात आले आहे. नगराध्यक्ष बारेवार यांनी शहरवासीयांना कोरोनाच्या नियमानुसार सुरक्षित राहुन आपली जबाबदारी पार पाडण्यास कळविले आहे.शहरात सॅनिटायझर फवारणी जनता कर्फ्यू लावण्यापूर्वीच करण्यात आली. शहरातील सतर्कतेचा फायदा म्हणजे जिल्ह्यात सगळीकडे कोरोनाचे रुग्णात वाढत आहे. पण शहरात आता रुग्ण आढळताच पुन्हा जनता व नगराध्यक्ष सतर्क होऊन तातडीचे उपाय करीत आहेत.सडक-अर्जुनी येथे रविवारपासून जनता कर्फ्यूशहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नगर पंचायत, व्यापारी व शहरवासीयांच्या संयुक्त बैठकीत शहरात रविवारपासून (दि.२०) गुरूवारपर्यंत (दि.२४) म्हणजेच ५ दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आजची गरज लक्षात घेता नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, विविध सेवाभावी संस्था आणि काही गावकऱ्यांच्या विनंतीवरून एक सभा घेवून काही अटी-शर्ती ठरवून हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. यांतर्गत फक्त दवाखाने व मेडीकल स्टोर्स सुरू राहतील. तसेच डेली निड्स व दुग्ध विक्रेत्यांना सकाळी ९ वाजतापर्यंत दुकान सुरु ठेवता येईल. किराणा, भाजीपाला, फळे व कृषी केंद्रांना सकाळी ९ ते १ वाजतापर्यंत व्यवसाय सुरु ठेवता येणार आहे.कुऱ्हाडीतही ३ दिवस बंदतालुक्यातील कुऱ्हांडी येथे १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ३ दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारी पहिल्या दिवशी गावात बंदला स्वयस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. तसेच बंददरम्यान गाव सॉनीटाईज करण्यात आले. येथील दुकानदारांनी जनता कर्फ्यूला प्रतीसाद देत स्वत:ची दुकाने बंद ठेवली. बंदसाठी कुऱ्हाडी येथील सरपंच अल्का पारधी, उपसरपंच आनंद कटरे, ग्राम विकास अधिकारी एस.सी. रहांगङाले, सदस्य नितीन धमगाये, रविंद्र लांजेवार, पोलिस पाटील हेमराज सोनवाने, मोहन मरसकोल्हे, लिपीक छगनलाल अग्रेल, अमोल पडोळे, मंगेश रहांगडाले सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या