शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

शहरात जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील.

ठळक मुद्दे२२ पर्यंत जनता कर्फ्यू : शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसला

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षितता बाळगण्यासाठी नगरातील स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटन, अधिकारी-कर्मचारी व अनेक सेवाभावी नागरीकांनी नगर परिषदेकडे जनता कर्फ्यू लावण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. यावर नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी तातडीने निर्णय घेऊन सर्वानुमते १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान ५ दिवस जनता कर्फ्यु लावण्याची घोषणा केली. त्यानुसार, शहरात शुक्रवारी (दि.१८) सकाळपासून शहरातील सर्व दुकानदारांनी स्वत:ची दुकाने बंद ठेवीत जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद दिला.शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील. फळ, भाजी, किराणा दुकाने ३ ते ६ वाजतापर्यंत सुरू राहतील. दुध विक्रेत्यांनी सकाळी ९ वाजतापर्यंतच दुध विकावयाचे आहे.जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याने पोलीस ठाणे, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना सहकायार्साठी निवेदन देण्यात आले आहे. नगराध्यक्ष बारेवार यांनी शहरवासीयांना कोरोनाच्या नियमानुसार सुरक्षित राहुन आपली जबाबदारी पार पाडण्यास कळविले आहे.शहरात सॅनिटायझर फवारणी जनता कर्फ्यू लावण्यापूर्वीच करण्यात आली. शहरातील सतर्कतेचा फायदा म्हणजे जिल्ह्यात सगळीकडे कोरोनाचे रुग्णात वाढत आहे. पण शहरात आता रुग्ण आढळताच पुन्हा जनता व नगराध्यक्ष सतर्क होऊन तातडीचे उपाय करीत आहेत.सडक-अर्जुनी येथे रविवारपासून जनता कर्फ्यूशहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नगर पंचायत, व्यापारी व शहरवासीयांच्या संयुक्त बैठकीत शहरात रविवारपासून (दि.२०) गुरूवारपर्यंत (दि.२४) म्हणजेच ५ दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आजची गरज लक्षात घेता नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, विविध सेवाभावी संस्था आणि काही गावकऱ्यांच्या विनंतीवरून एक सभा घेवून काही अटी-शर्ती ठरवून हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. यांतर्गत फक्त दवाखाने व मेडीकल स्टोर्स सुरू राहतील. तसेच डेली निड्स व दुग्ध विक्रेत्यांना सकाळी ९ वाजतापर्यंत दुकान सुरु ठेवता येईल. किराणा, भाजीपाला, फळे व कृषी केंद्रांना सकाळी ९ ते १ वाजतापर्यंत व्यवसाय सुरु ठेवता येणार आहे.कुऱ्हाडीतही ३ दिवस बंदतालुक्यातील कुऱ्हांडी येथे १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ३ दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारी पहिल्या दिवशी गावात बंदला स्वयस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. तसेच बंददरम्यान गाव सॉनीटाईज करण्यात आले. येथील दुकानदारांनी जनता कर्फ्यूला प्रतीसाद देत स्वत:ची दुकाने बंद ठेवली. बंदसाठी कुऱ्हाडी येथील सरपंच अल्का पारधी, उपसरपंच आनंद कटरे, ग्राम विकास अधिकारी एस.सी. रहांगङाले, सदस्य नितीन धमगाये, रविंद्र लांजेवार, पोलिस पाटील हेमराज सोनवाने, मोहन मरसकोल्हे, लिपीक छगनलाल अग्रेल, अमोल पडोळे, मंगेश रहांगडाले सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या