शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

शहरात जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील.

ठळक मुद्दे२२ पर्यंत जनता कर्फ्यू : शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसला

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षितता बाळगण्यासाठी नगरातील स्वयंसेवी संस्था, व्यापारी संघटन, अधिकारी-कर्मचारी व अनेक सेवाभावी नागरीकांनी नगर परिषदेकडे जनता कर्फ्यू लावण्यासाठी प्रस्ताव मांडला होता. यावर नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी तातडीने निर्णय घेऊन सर्वानुमते १८ ते २२ सप्टेंबर दरम्यान ५ दिवस जनता कर्फ्यु लावण्याची घोषणा केली. त्यानुसार, शहरात शुक्रवारी (दि.१८) सकाळपासून शहरातील सर्व दुकानदारांनी स्वत:ची दुकाने बंद ठेवीत जनता कर्फ्यूला स्वयंस्फुर्त प्रतिसाद दिला.शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शहरवासीयांनी सुरक्षितता म्हणून जनता कर्फ्यू लावण्याची मागणी केली होती. शहरवासीयांची मागणी लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्यात आला. नगरवासीयांना जनता कर्फ्यूयशस्वी करण्यासाठी बुधवारी (दि.१६) दवंडीद्वारे सुचित करण्यात आले होते. १८ ते २२ सप्टेंबरपर्यंत असलेल्या या जनता कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सेवा कोरोनाच्या अटी शर्तींंचे पालन करुन सुरू राहील. फळ, भाजी, किराणा दुकाने ३ ते ६ वाजतापर्यंत सुरू राहतील. दुध विक्रेत्यांनी सकाळी ९ वाजतापर्यंतच दुध विकावयाचे आहे.जनता कर्फ्यूचा निर्णय सर्वांच्या हिताचा असल्याने पोलीस ठाणे, तहसीलदार व खंडविकास अधिकाऱ्यांना सहकायार्साठी निवेदन देण्यात आले आहे. नगराध्यक्ष बारेवार यांनी शहरवासीयांना कोरोनाच्या नियमानुसार सुरक्षित राहुन आपली जबाबदारी पार पाडण्यास कळविले आहे.शहरात सॅनिटायझर फवारणी जनता कर्फ्यू लावण्यापूर्वीच करण्यात आली. शहरातील सतर्कतेचा फायदा म्हणजे जिल्ह्यात सगळीकडे कोरोनाचे रुग्णात वाढत आहे. पण शहरात आता रुग्ण आढळताच पुन्हा जनता व नगराध्यक्ष सतर्क होऊन तातडीचे उपाय करीत आहेत.सडक-अर्जुनी येथे रविवारपासून जनता कर्फ्यूशहरात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता नगर पंचायत, व्यापारी व शहरवासीयांच्या संयुक्त बैठकीत शहरात रविवारपासून (दि.२०) गुरूवारपर्यंत (दि.२४) म्हणजेच ५ दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला. आजची गरज लक्षात घेता नगर पंचायतचे पदाधिकारी, व्यापारी, विविध सेवाभावी संस्था आणि काही गावकऱ्यांच्या विनंतीवरून एक सभा घेवून काही अटी-शर्ती ठरवून हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. यांतर्गत फक्त दवाखाने व मेडीकल स्टोर्स सुरू राहतील. तसेच डेली निड्स व दुग्ध विक्रेत्यांना सकाळी ९ वाजतापर्यंत दुकान सुरु ठेवता येईल. किराणा, भाजीपाला, फळे व कृषी केंद्रांना सकाळी ९ ते १ वाजतापर्यंत व्यवसाय सुरु ठेवता येणार आहे.कुऱ्हाडीतही ३ दिवस बंदतालुक्यातील कुऱ्हांडी येथे १८ ते २० सप्टेंबर दरम्यान ३ दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारी पहिल्या दिवशी गावात बंदला स्वयस्फुर्त प्रतिसाद दिसून आला. तसेच बंददरम्यान गाव सॉनीटाईज करण्यात आले. येथील दुकानदारांनी जनता कर्फ्यूला प्रतीसाद देत स्वत:ची दुकाने बंद ठेवली. बंदसाठी कुऱ्हाडी येथील सरपंच अल्का पारधी, उपसरपंच आनंद कटरे, ग्राम विकास अधिकारी एस.सी. रहांगङाले, सदस्य नितीन धमगाये, रविंद्र लांजेवार, पोलिस पाटील हेमराज सोनवाने, मोहन मरसकोल्हे, लिपीक छगनलाल अग्रेल, अमोल पडोळे, मंगेश रहांगडाले सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या