शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

‘एचआर’मध्ये करा स्पेशलायझेशन

By admin | Updated: June 14, 2014 01:23 IST

एचआर म्हणजे मनुष्यबळ खाते. औद्योगिक क्रांतीनंतर फॅक्टरीज वाढल्या.

गोंदिया : एचआर म्हणजे मनुष्यबळ खाते. औद्योगिक क्रांतीनंतर फॅक्टरीज वाढल्या. त्यामुळे कामगारसंख्या वाढली. शेती कामगारांऐवजी औद्योगिक कामगारवर्ग शहरा-शहरातून वाढत गेला. त्याचप्रमाणे आॅफिस कर्मचारी वर्ग वाढत राहिला. अर्थातच त्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्या समाजकल्याणाची, सामाजिक सुरक्षेची जबाबदरी घेणे, ही कामे आपोआप निघाली. त्याकरिता पूर्वीचे फक्त नोकर भरती करणारे ‘पर्सनल खाते’ जाऊन एक सक्षम मनुष्यबळ खाते विकसित होऊ लागले, ज्यामध्ये नोकर भरती, कर्मचारी आरोग्य, आरोग्य विमा, अपघात-आपत्ती विमा अशी अनेक उपांगे विकसित झाली.सरकारी कंपन्यांमध्ये नवरत्न कंपन्या आहेत, बँका येतात आणि विविध क्षेत्रांत, भौगोलिक स्तरावर त्या कार्यरत आहेत. दुसरीकडे खासगी क्षेत्रात परदेशी भांडवल सहभागाने कार्यकक्षा रुंदावलेली आहे. कॉडा सेंटर्स, बीपीओज, केपीओज, विदेशी कंपन्या, बँका आणि अनेक प्रकारचे खासगी उद्योग याकरिता विविध शैक्षणिक गुणवत्तेचे व कौशल्ये असलेले मनुष्यबळ लागते. त्यांच्या नेमणुका, त्यांची देखभाल, त्यांच्या बदली-बढतीचे नियोजन व प्रत्यक्षात व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळ खाते सांभाळणारी कुशल टीम असण्याची किंवा त्यातील अनेक विभाग-उपविभाग कार्यक्षमतेने हाताळण्यासाठी कुशल अधिकाऱ्यांची गरज आहे.एचआरमधील नवीन कामेजॉब अ‍ॅनालिसिस, रिस्ट्रक्चरिंग अ‍ॅनालिसिस, स्किल्स डेव्हलपमेंट, एम्प्लॉई रिलेशन्स, रिक्रुटमेंट, स्पेशालिस्ट हायरिंग, बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, ट्रेनिंग, कॉम्पेन्सेशन यांसारखी नवीन कामे आता एचआर करू शकतात. ही सर्व कामे कार्यक्षमतेने करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचे कार्यक्षम मनुष्यबळ असायला हवे. कारण प्रभावी कंपनीसाठी परिणामकारक मनुष्यबळ धोरण असणे, हेदेखील व्यवस्थापनाचा एक प्राण समजले जाते.एमबीए या संकल्पनेचा गेल्या दोन-तीन दशकांत चांगलाच प्रभाव वाढलेला आहे. बिझनेस किंवा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन तसेच मार्केटिंग-फायनान्स अशी स्पेशलाइज्ड एमबीए आहेत. त्याप्रमाणे एचआरमध्ये स्पेशलायझेशन करण्याला महत्त्व आहे. कारण व्यापार-व्यवसाय वृद्धिंगत झाल्यावर त्यातील मनुष्यबळाचे व्यवस्थापन करण्यासाठी तितकीच अधिकारी व अनुभवसंपन्न माणसे असायला हवीत.एमबीए एचआर अभ्यासक्रमसहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंतचे एचआर विषयातील कोर्सेस आहेत. पदवीधर विद्यार्थी एचआरमध्ये डिप्लोमा मिळवू शकतात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाद्वारे पदविका/पदवी प्राप्त करू शकतात. डिप्लोमा इन एचआरएम हा एक वर्षाचा नियमित बॅचचा तर सण्डे बॅचचा कोर्स उपलब्ध आहे. टाटामधून दोन वर्षांचा मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट व इंडस्ट्रीयल रिलेशन्सही करता येतो. पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल रिलेशन्स याबरोबरीने सोशल सायन्स, बिहव्हिअरेल सायन्स, एचआर, कम्युनिकेशन, पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या विषयांचा अंतर्भाव असतो.