शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
5
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
6
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
7
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
8
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
9
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
10
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
11
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
12
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
13
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
14
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
15
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
16
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
17
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
18
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
19
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
20
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला

१ लाख ९१ हजार हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 21:34 IST

मृग नक्षत्र यंदा पूर्णपणे कोरडा गेला असून अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टर मधील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जून महिना संपत येत असताना सुध्दा वरुण राजाने दर्शन न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाऊस लांबल्याने बळीराजा चिंतातूर : दमदार पावसाची प्रतीक्षा, उत्पादनात घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्र यंदा पूर्णपणे कोरडा गेला असून अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार हेक्टर मधील पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. जून महिना संपत येत असताना सुध्दा वरुण राजाने दर्शन न दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून असल्याचे चित्र आहे.कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने खते, बियाणांचे नियोजन केले आहे. दरवर्षी जिल्ह्यातील शेतकरी मृगाचा दमदार पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरूवात करतात. लवकर पेरणी केल्यास पऱ्हे लवकर येऊन लवकर रोवणी करण्यास मदत होते. त्याचा उत्पादन वाढीवर सुध्दा परिणाम होत असतो. त्यामुळे मृगाचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी करण्यासाठी लगबग सुरू असते. मात्र यंदा मृग नक्षत्र पूर्ण कोरडा गेला असून मान्सून अद्यापही सक्रीय झालेला नाही. त्यामुळे पावसाबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे. तर काही शेतकरी धूळ पेरणी करून जोखीम पत्थकारण्याच्या तयारीत आहेत. मात्र धूळ पेरणीसाठी सुध्दा जमिनीत थोडाफार ओलावा व ढेकले फुटण्याची गरज आहे. मात्र अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने ढेकले फुटले नसून धूळ पेरणी केल्यास ती सुध्दा वाया जाण्याची शक्यता आहे. तर कृषी विभागाने दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करु नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आठ दहा दिवस पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणीची कामे पूर्णपणे ठप्प आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी पाणी करून थोड्याफार प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. मात्र असे शेतकरी केवळ मोजकेच आहे.जून महिन्यातील पुन्हा दहा दिवस शिल्लक असून या कालावधीत पाऊस न झाल्यास पेरण्या लांबून त्याचा उत्पादनावर सुध्दा परिणाम होण्याची शक्यता आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते यामुळे आठ ते दहा टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.मशागतीची कामे पूर्णशेतकऱ्यांनी मृग नक्षत्राला सुरूवात होण्यापूर्वीच शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करुन ठेवली आहे. तर दमदार पाऊस होताच पेरणीला सुरूवात करता यावी यासाठी खते, बियाणे खरेदी करुन ठेवले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे लागल्या आहेत.कृषी केंद्रांवर शुकशुकाटजून महिना संपत येत असला तरी वरुन राजाने अद्यापही दर्शन दिले नाही. त्यामुळे पेरणीच्या कामाला अद्यापही वेग आलेला नाही. परिणामी खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी दिसून येत नसून शुकशुकाट असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.मजुरांना रोजगाराची प्रतीक्षाखरीप हंगामाला सुरूवात झाल्यानंतर पेरणीच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांच्या हाताला काम मिळत असते. मात्र यंदा पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. तर लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामे सुध्दा यावर्षी उन्हाळ्यात उपलब्ध झाली नाही. त्यामुळे कामाच्या शोधात मजुरांना इतरत्र भटकंती करावी लागली.शेतकºयांनी पेरणीसाठी घाई करु नये, जोपर्यंत दमदार पाऊस होवून जमिनीत चार ते पाच इंचापर्यंत ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये. हवामान खात्याने येत्या आठ दहा दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला असून शेतकºयांनी पेरणीसाठी प्रतीक्षा करावी.- नंदकिशोर नयनवाड, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया.

टॅग्स :Rainपाऊस