शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

हिरवी झेंडी मिळताच उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

१३ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत आणि नगरपंचायतीमधील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीनंतर पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १ डिसेंबरपासून सुरुवात झाली. पण मागील दोन दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाले नव्हते. त्यामागील कारणे म्हणजे, अद्याप एकाही प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. शुक्रवारपर्यंत सर्वच पक्षांच्या मुलाखतीचे सत्र पूर्ण झाले. यात बऱ्याच जणांना पक्षांनी हिरवी झेंडी दिली, तर काहींचे नाव शनिवारी (दि. ४) जाहीर होणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज  दाखल  करण्यास शनिवारपासून वेग येण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. स्थानिक राजकारणावर कोणत्या पक्षाची किती पकड आहे, हे सांगणारी ही निवडणूक आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून अनेकांनी विधानसभा, लोकसभा गाठली आहे. त्यामुळे ही निवडणूक तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेच्या ५३, पंचायत समितीच्या १०६ आणि नगर पंचायतच्या ५१ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १३ डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत आणि नगरपंचायतीमधील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीनंतर पुढील वर्षी विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे यावेळेच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरस पाहायला मिळणार आहे. आपल्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून यावे यासाठी तगड्या उमेदवारांचा शोध पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळेच उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता शेवटचे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. काही उमेदवारांना पक्षांनी हिरवी झेंडी दिली असून, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही उमेदवार शनिवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. 

 बंडखोरीची शक्यता बळावली- सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. एकाच जागेसाठी पक्षात इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यात यश आले नाही तर बंडखोरीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात याद्या जाहीर करण्याचे नियोजन केल्याचे बोलल्या जाते. उमेदवारीवरून अनेकांची भ्रमनिराशा होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सर्वच पक्षांत बंडखोरी झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 

असंतुष्टांना संतुष्ट करणार शिवसेना - सर्वच पक्षात उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वांचेच समाधान करणे राजकीय पक्षांना सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता अधिक आहे. शिवसेनेने सुद्धा या निवडणुकीत तगडे उमेदवार देण्याची तयारी केली आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामधील असंतुष्ट सदस्यांना उमेदवारी देऊन संतुष्ट करण्याची तयारी ठेवल्याची चर्चा आहे.

प्रमुख क्षेत्रांकडे नजरा - जिल्हा परिषद निवडणुकीत काही क्षेत्रांत काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यात फुलचूर, नागरा, कामठा, अंजारो, एकोडी, सुकडी डाकराम, वडेगाव, डव्वा, गोठणगाव या क्षेत्रांतील उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या क्षेत्रांतून दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सर्व जिल्हावासीयांच्या नजरा याकडे लागल्या आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक