शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मोदींची जादू चालणार की सोनियाजींचा चमत्कार

By admin | Updated: October 12, 2014 23:35 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम दिवसावर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा गोंदियात झाल्या. यामुळे अंतिम टप्प्यात

गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम दिवसावर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा गोंदियात झाल्या. यामुळे अंतिम टप्प्यात निवडणुकीत चुरस निर्माण झाली. विशेषत: सर्वांचे लक्ष लागलेल्या गोंदिया मतदार संघात कोण बाजी मारणार याची चर्चा लोक मोठ्या चवीने करताना दिसत आहेत. गोंदियात झालेली पंतप्रधान मोदींची सभा आणि शनिवारी झालेली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभेची तुलना करून लोक निकालाचा अंदाज बांधू लागले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेले पोषक वातावरण पाहता भाजपची तिकीट पदरी पाडून घेण्यासाठी गोंदियाच नाही तर सर्वच ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी होती. गोंदिया विधानसभा मतदार संघात गेल्या दोन-तीन वर्षात निर्माण झालेल्या पोषक वातावरणानंतर भाजपने ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावून घेण्याची तयारी आधीपासूनच केली होती. अशातच युती तुटली आणि तयारीत असलेल्या भाजपने युवा उमेदवार विनोद अग्रवाल यांना उमेदवारी देऊन तरुण वर्गाला कॅश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शिवसेनेने परंपरागत पद्धतीने निवडणूक रिंगणात आपले अस्तित्व कायम ठेवले असले तरी गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव शिवसेनेला या निवडणुकीत भोवत आहे. त्यामुळे मतदारांवरील सेनेची पकड ढिली झाल्याचे दिसून येत आहे. अशा वातावरणात प्रथमच विधानसभा लढत असलेल्या राजकुमार कुथे यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक (गप्पू) गुप्ता या नवख्या उमेदवाराला वेळेवर उमेदवारी दिल्याने त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. राकाँचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रचारात उतरून निवडणुकीत रंगत आणली असली तरी गुप्ता यांच्याकडे असलेला अनुभवाचा अभाव त्यांना किती मते मिळवून देईल हे सांगणे कठीण आहे. काँग्रेसतर्फे किल्ला लढवत असलेले गोपालदास अग्रवाल यांना यावेळी आघाडी तुटल्याचा फटका काही प्रमाणात बसू शकतो. पण १२ वर्षे विधान परिषद सदस्य आणि गेल्या १० वर्षांपासून विधानसभा सदस्य असलेले गोपालदास अग्रवाल हे आपला अनुभव आणि केलेल्या कामावर मतदारांकडून आशा ठेवून आहेत. परंतू राष्ट्रवादीची साथ नसल्यामुळे त्यांना एकाकीपणा किल्ला लढवावा लागत आहे.अंतिम टप्प्यात मोदी आणि सोनिया गांधींच्या प्रचारसभांमुळे मतदारांना विचार करण्यास भाग पाडले. लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले मोदींचे आकर्षण नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून आले. त्यांच्या सभेने एक प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्याना रिचार्ज केले. त्यातच भाजपमधील दुसऱ्या गटाला सक्रिय करून त्यांनी कामी लावण्याची जबाबदारीही मोदींनी जाता जाता खा.नाना पटोले यांना दिल्यामुळे कमळ की पंजा अशी तुलना मतदार करताना दिसत आहेत. आतापर्यंत चौरंगी वाटत असलेली ही लढत शेवटच्या क्षणी दुहेरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)