शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

मोदींची जादू चालणार की सोनियाजींचा चमत्कार

By admin | Updated: October 12, 2014 23:35 IST

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम दिवसावर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा गोंदियात झाल्या. यामुळे अंतिम टप्प्यात

गोंदिया : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम दिवसावर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रचारसभा गोंदियात झाल्या. यामुळे अंतिम टप्प्यात निवडणुकीत चुरस निर्माण झाली. विशेषत: सर्वांचे लक्ष लागलेल्या गोंदिया मतदार संघात कोण बाजी मारणार याची चर्चा लोक मोठ्या चवीने करताना दिसत आहेत. गोंदियात झालेली पंतप्रधान मोदींची सभा आणि शनिवारी झालेली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभेची तुलना करून लोक निकालाचा अंदाज बांधू लागले आहेत.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेले पोषक वातावरण पाहता भाजपची तिकीट पदरी पाडून घेण्यासाठी गोंदियाच नाही तर सर्वच ठिकाणी इच्छुकांची मोठी गर्दी होती. गोंदिया विधानसभा मतदार संघात गेल्या दोन-तीन वर्षात निर्माण झालेल्या पोषक वातावरणानंतर भाजपने ही जागा शिवसेनेच्या ताब्यातून हिसकावून घेण्याची तयारी आधीपासूनच केली होती. अशातच युती तुटली आणि तयारीत असलेल्या भाजपने युवा उमेदवार विनोद अग्रवाल यांना उमेदवारी देऊन तरुण वर्गाला कॅश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. शिवसेनेने परंपरागत पद्धतीने निवडणूक रिंगणात आपले अस्तित्व कायम ठेवले असले तरी गेल्या पाच वर्षातील जनसंपर्काचा अभाव शिवसेनेला या निवडणुकीत भोवत आहे. त्यामुळे मतदारांवरील सेनेची पकड ढिली झाल्याचे दिसून येत आहे. अशा वातावरणात प्रथमच विधानसभा लढत असलेल्या राजकुमार कुथे यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशोक (गप्पू) गुप्ता या नवख्या उमेदवाराला वेळेवर उमेदवारी दिल्याने त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. राकाँचे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी प्रचारात उतरून निवडणुकीत रंगत आणली असली तरी गुप्ता यांच्याकडे असलेला अनुभवाचा अभाव त्यांना किती मते मिळवून देईल हे सांगणे कठीण आहे. काँग्रेसतर्फे किल्ला लढवत असलेले गोपालदास अग्रवाल यांना यावेळी आघाडी तुटल्याचा फटका काही प्रमाणात बसू शकतो. पण १२ वर्षे विधान परिषद सदस्य आणि गेल्या १० वर्षांपासून विधानसभा सदस्य असलेले गोपालदास अग्रवाल हे आपला अनुभव आणि केलेल्या कामावर मतदारांकडून आशा ठेवून आहेत. परंतू राष्ट्रवादीची साथ नसल्यामुळे त्यांना एकाकीपणा किल्ला लढवावा लागत आहे.अंतिम टप्प्यात मोदी आणि सोनिया गांधींच्या प्रचारसभांमुळे मतदारांना विचार करण्यास भाग पाडले. लोकसभा निवडणुकीनंतर वाढलेले मोदींचे आकर्षण नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून आले. त्यांच्या सभेने एक प्रकारे भाजपच्या कार्यकर्त्याना रिचार्ज केले. त्यातच भाजपमधील दुसऱ्या गटाला सक्रिय करून त्यांनी कामी लावण्याची जबाबदारीही मोदींनी जाता जाता खा.नाना पटोले यांना दिल्यामुळे कमळ की पंजा अशी तुलना मतदार करताना दिसत आहेत. आतापर्यंत चौरंगी वाटत असलेली ही लढत शेवटच्या क्षणी दुहेरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)