शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

शेतकऱ्याकडून जबरीने लिहून मागितले समाधानपत्र

By admin | Updated: March 17, 2016 02:33 IST

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले.

कृषी पर्यवेक्षकाचे दबावतंत्र : माहिती अधिकाराची होतेय पायमल्लीकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले. ही धक्कादायक बाब समोर आली असून आजही त्यांना पुराव्याची गरज आहे, यावर शेतकरी ठाम आहेत.बरबसपुरा येथील रहिवासी माणिकराव यादोराव कटरे या शेतकऱ्याच्या शेतात कोणतीही पूर्वसूचना, मंजुरी किंवा स्वाक्षरी न घेता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भात खाचरचे काम करण्यात आले. या शिवारात शेतकऱ्याची पूर्व मंजुरी घेण्यात आली नाही. शेतात दोन ते तीन तास कामे करून शेताच्या बांध्यात बिघाड झाला. आपल्या शेतजमिनीतील काम व बिघाड झाल्याचे अनेक अर्ज माणिकराव कटरे या शेतकऱ्याने दिले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी माहिती अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा यांना प्रपत्र-अ द्वारे स्वत:च्या गटात भात खाचर कामाची व लागून असलेल्या गटाची सविस्तर माहिती मागितली. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. प्रभारी मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल आर. रहांगडाले हे बरबसपुरा येथील माजी पोलीस पाटील बंशीलाल रहांगडाले यांच्या घरी येवून माणिकराव कटरे यांना बोलावून दबावतंत्राचा उपयोग केला. तसेच आपण माहिती मागितली ती पाहली, त्यावरून समाधान झाले, असे जबरन लिहून मागितल्याचे माणिकराम कटरे यांनी सांगितले. आपल्याला कोणतीही माहिती किंवा रेकार्ड दाखविण्यात आले नाही. आपल्या शेतासंबंधी आणि लगतच्या गटासंबंधी भात खाचर कामाचे रेकार्ड आपल्याला हवे आहेत, अशी ठाम भूमिका कटरे यांनी घेतल्याचे सांगितले. आपण समाधानकारक असल्याचे लिहून कसे दिले, असे कटरे यांना विचाऱ्यावर त्यांनी सांगितले की, अजून कामे पूर्ण झाली नाहीत. ती कामे करायची आहेत, असे बोलल्याने आपण लिहून दिले. तसेच रात्रीचे जागरण होते, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बरोबर नव्हती, असे ते म्हणाले. आपल्या गटासंबंधी माहिती मिळण्यावर आपण ठाम आहोत. कृषी पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले यांनी माझ्याकडून समाधान झाल्याचे लिहून मागितले आणि ते मी दिले, ते मान्य करण्यात येवू नये. आपण मागितलेली माहिती पुराव्यानिशी आपल्याला हवी आहे. दिलेले लेखी पत्र रद्द समजण्यात यावे व तात्काळ माहिती देण्यात यावी, असेही कटरे म्हणाले. दबावतंत्राचा उपयोग करून आपल्याकडून जबरन समाधानपत्र लिहून घेण्याचे आले, याची तक्रार आपण वरिष्ठ कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला करणार. तसेच शेतीच्या कामात अपहार करण्यात आल्याचा आरोपही कटरे यांनी केला आहे. (वार्ताहर)