शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शेतकऱ्याकडून जबरीने लिहून मागितले समाधानपत्र

By admin | Updated: March 17, 2016 02:33 IST

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले.

कृषी पर्यवेक्षकाचे दबावतंत्र : माहिती अधिकाराची होतेय पायमल्लीकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले. ही धक्कादायक बाब समोर आली असून आजही त्यांना पुराव्याची गरज आहे, यावर शेतकरी ठाम आहेत.बरबसपुरा येथील रहिवासी माणिकराव यादोराव कटरे या शेतकऱ्याच्या शेतात कोणतीही पूर्वसूचना, मंजुरी किंवा स्वाक्षरी न घेता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भात खाचरचे काम करण्यात आले. या शिवारात शेतकऱ्याची पूर्व मंजुरी घेण्यात आली नाही. शेतात दोन ते तीन तास कामे करून शेताच्या बांध्यात बिघाड झाला. आपल्या शेतजमिनीतील काम व बिघाड झाल्याचे अनेक अर्ज माणिकराव कटरे या शेतकऱ्याने दिले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी माहिती अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा यांना प्रपत्र-अ द्वारे स्वत:च्या गटात भात खाचर कामाची व लागून असलेल्या गटाची सविस्तर माहिती मागितली. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. प्रभारी मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल आर. रहांगडाले हे बरबसपुरा येथील माजी पोलीस पाटील बंशीलाल रहांगडाले यांच्या घरी येवून माणिकराव कटरे यांना बोलावून दबावतंत्राचा उपयोग केला. तसेच आपण माहिती मागितली ती पाहली, त्यावरून समाधान झाले, असे जबरन लिहून मागितल्याचे माणिकराम कटरे यांनी सांगितले. आपल्याला कोणतीही माहिती किंवा रेकार्ड दाखविण्यात आले नाही. आपल्या शेतासंबंधी आणि लगतच्या गटासंबंधी भात खाचर कामाचे रेकार्ड आपल्याला हवे आहेत, अशी ठाम भूमिका कटरे यांनी घेतल्याचे सांगितले. आपण समाधानकारक असल्याचे लिहून कसे दिले, असे कटरे यांना विचाऱ्यावर त्यांनी सांगितले की, अजून कामे पूर्ण झाली नाहीत. ती कामे करायची आहेत, असे बोलल्याने आपण लिहून दिले. तसेच रात्रीचे जागरण होते, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बरोबर नव्हती, असे ते म्हणाले. आपल्या गटासंबंधी माहिती मिळण्यावर आपण ठाम आहोत. कृषी पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले यांनी माझ्याकडून समाधान झाल्याचे लिहून मागितले आणि ते मी दिले, ते मान्य करण्यात येवू नये. आपण मागितलेली माहिती पुराव्यानिशी आपल्याला हवी आहे. दिलेले लेखी पत्र रद्द समजण्यात यावे व तात्काळ माहिती देण्यात यावी, असेही कटरे म्हणाले. दबावतंत्राचा उपयोग करून आपल्याकडून जबरन समाधानपत्र लिहून घेण्याचे आले, याची तक्रार आपण वरिष्ठ कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला करणार. तसेच शेतीच्या कामात अपहार करण्यात आल्याचा आरोपही कटरे यांनी केला आहे. (वार्ताहर)