शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याकडून जबरीने लिहून मागितले समाधानपत्र

By admin | Updated: March 17, 2016 02:33 IST

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले.

कृषी पर्यवेक्षकाचे दबावतंत्र : माहिती अधिकाराची होतेय पायमल्लीकाचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा येथील शेतकऱ्याला कोणतीही माहिती न देता उलटसुलट माहिती सांगून कृषी पर्यवेक्षकाने दबावतंत्राने शेतकऱ्याचे समाधान झाल्याचे लिहून मागितले. ही धक्कादायक बाब समोर आली असून आजही त्यांना पुराव्याची गरज आहे, यावर शेतकरी ठाम आहेत.बरबसपुरा येथील रहिवासी माणिकराव यादोराव कटरे या शेतकऱ्याच्या शेतात कोणतीही पूर्वसूचना, मंजुरी किंवा स्वाक्षरी न घेता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भात खाचरचे काम करण्यात आले. या शिवारात शेतकऱ्याची पूर्व मंजुरी घेण्यात आली नाही. शेतात दोन ते तीन तास कामे करून शेताच्या बांध्यात बिघाड झाला. आपल्या शेतजमिनीतील काम व बिघाड झाल्याचे अनेक अर्ज माणिकराव कटरे या शेतकऱ्याने दिले. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांनी माहिती अधिकारी मंडळ कृषी अधिकारी तिरोडा यांना प्रपत्र-अ द्वारे स्वत:च्या गटात भात खाचर कामाची व लागून असलेल्या गटाची सविस्तर माहिती मागितली. परंतु याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. प्रभारी मंडळ कृषी अधिकारी कुवरलाल आर. रहांगडाले हे बरबसपुरा येथील माजी पोलीस पाटील बंशीलाल रहांगडाले यांच्या घरी येवून माणिकराव कटरे यांना बोलावून दबावतंत्राचा उपयोग केला. तसेच आपण माहिती मागितली ती पाहली, त्यावरून समाधान झाले, असे जबरन लिहून मागितल्याचे माणिकराम कटरे यांनी सांगितले. आपल्याला कोणतीही माहिती किंवा रेकार्ड दाखविण्यात आले नाही. आपल्या शेतासंबंधी आणि लगतच्या गटासंबंधी भात खाचर कामाचे रेकार्ड आपल्याला हवे आहेत, अशी ठाम भूमिका कटरे यांनी घेतल्याचे सांगितले. आपण समाधानकारक असल्याचे लिहून कसे दिले, असे कटरे यांना विचाऱ्यावर त्यांनी सांगितले की, अजून कामे पूर्ण झाली नाहीत. ती कामे करायची आहेत, असे बोलल्याने आपण लिहून दिले. तसेच रात्रीचे जागरण होते, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बरोबर नव्हती, असे ते म्हणाले. आपल्या गटासंबंधी माहिती मिळण्यावर आपण ठाम आहोत. कृषी पर्यवेक्षक के.आर. रहांगडाले यांनी माझ्याकडून समाधान झाल्याचे लिहून मागितले आणि ते मी दिले, ते मान्य करण्यात येवू नये. आपण मागितलेली माहिती पुराव्यानिशी आपल्याला हवी आहे. दिलेले लेखी पत्र रद्द समजण्यात यावे व तात्काळ माहिती देण्यात यावी, असेही कटरे म्हणाले. दबावतंत्राचा उपयोग करून आपल्याकडून जबरन समाधानपत्र लिहून घेण्याचे आले, याची तक्रार आपण वरिष्ठ कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला करणार. तसेच शेतीच्या कामात अपहार करण्यात आल्याचा आरोपही कटरे यांनी केला आहे. (वार्ताहर)