शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

समाजाला संतांच्या विचाराची गरज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, ...

साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म व समाज यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. संतांनी विवेकाची शिकवण दिली. त्यांचे विचार समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे समाजाने संतांच्या विचारांचे अनुसरण करावे ,असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सार्वजनिक विठ्ठल-रुखमाई सेवा समितीच्यावतीने लोटांगण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रामकथा व समाजप्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्‌घाटन माजी आमदार संजय पुराम तर दीप प्रज्वलन जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हा प्रतिनिधी वंदना काळे, भाजपा महिला सदस्य टीना चुटे, राकाँपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, सुनील अग्रवाल, प्रा.सागर काटेखाये, देवराम चुटे, संजय दोनोडे, राजू काळे, माधोराव बागडे, गोसावी आसोले, सेवानिवृत्त तलाठी भरतराम चिंधालोरे, देवराम खोटेले, सुरेश बोहरे, लखनलाल बागडे, प्रमिला बागडे, ममता चुटे, कांता शेंडे, शशीकला चिंधालोरे, अनुसया आसोले, मनिराम शेंडे, विद्या बागडे, संजय बागडे, भागवत बागडे, संतोष बागडे उपस्थित होते.

३ दिवसीय कार्यक्रमात रामकथा तसेच ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती’ विषयावर प्रभुदास महाराजाचे जाहीर कीर्तन पार पडले. गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. माजी आमदार पुराम यांनी, संतांनी समाजाला अध्यात्माचा अमोल ठेवा दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष रामलाल जिंदाकुर यांनी मांडले. संचालन राजेश चुटे यांनी केले. आभार जितेंद्र आसोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय बागडे, मोहन बागडे, भूमेश शेंडे, नवरत्न गायधने, लीलाधर कठाणे, गुरुदेव शेंडे तसेच बचत गट व विविध मंडळांच्या सदस्यांनी सहकार्य केले.