शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

समाजाला संतांच्या विचाराची गरज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, ...

साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म व समाज यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. संतांनी विवेकाची शिकवण दिली. त्यांचे विचार समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे समाजाने संतांच्या विचारांचे अनुसरण करावे ,असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सार्वजनिक विठ्ठल-रुखमाई सेवा समितीच्यावतीने लोटांगण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रामकथा व समाजप्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्‌घाटन माजी आमदार संजय पुराम तर दीप प्रज्वलन जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हा प्रतिनिधी वंदना काळे, भाजपा महिला सदस्य टीना चुटे, राकाँपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, सुनील अग्रवाल, प्रा.सागर काटेखाये, देवराम चुटे, संजय दोनोडे, राजू काळे, माधोराव बागडे, गोसावी आसोले, सेवानिवृत्त तलाठी भरतराम चिंधालोरे, देवराम खोटेले, सुरेश बोहरे, लखनलाल बागडे, प्रमिला बागडे, ममता चुटे, कांता शेंडे, शशीकला चिंधालोरे, अनुसया आसोले, मनिराम शेंडे, विद्या बागडे, संजय बागडे, भागवत बागडे, संतोष बागडे उपस्थित होते.

३ दिवसीय कार्यक्रमात रामकथा तसेच ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती’ विषयावर प्रभुदास महाराजाचे जाहीर कीर्तन पार पडले. गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. माजी आमदार पुराम यांनी, संतांनी समाजाला अध्यात्माचा अमोल ठेवा दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष रामलाल जिंदाकुर यांनी मांडले. संचालन राजेश चुटे यांनी केले. आभार जितेंद्र आसोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय बागडे, मोहन बागडे, भूमेश शेंडे, नवरत्न गायधने, लीलाधर कठाणे, गुरुदेव शेंडे तसेच बचत गट व विविध मंडळांच्या सदस्यांनी सहकार्य केले.