शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

समाजाला संतांच्या विचाराची गरज ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, ...

साखरीटोला : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला नेहमीच संतांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने साहित्यातून प्रबोधित केले आहे. संतांच्या माध्यमातून धर्म, अध्यात्म व समाज यांची सांगड घालण्याचा प्रयत्न झाला. संतांनी विवेकाची शिकवण दिली. त्यांचे विचार समाजाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे समाजाने संतांच्या विचारांचे अनुसरण करावे ,असे प्रतिपादन आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

तालुक्यातील ग्राम हेटीटोला येथील सार्वजनिक विठ्ठल-रुखमाई सेवा समितीच्यावतीने लोटांगण महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रामकथा व समाजप्रबोधन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्‌घाटन माजी आमदार संजय पुराम तर दीप प्रज्वलन जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस कमिटीच्या महिला जिल्हा प्रतिनिधी वंदना काळे, भाजपा महिला सदस्य टीना चुटे, राकाँपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, सुनील अग्रवाल, प्रा.सागर काटेखाये, देवराम चुटे, संजय दोनोडे, राजू काळे, माधोराव बागडे, गोसावी आसोले, सेवानिवृत्त तलाठी भरतराम चिंधालोरे, देवराम खोटेले, सुरेश बोहरे, लखनलाल बागडे, प्रमिला बागडे, ममता चुटे, कांता शेंडे, शशीकला चिंधालोरे, अनुसया आसोले, मनिराम शेंडे, विद्या बागडे, संजय बागडे, भागवत बागडे, संतोष बागडे उपस्थित होते.

३ दिवसीय कार्यक्रमात रामकथा तसेच ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती’ विषयावर प्रभुदास महाराजाचे जाहीर कीर्तन पार पडले. गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. माजी आमदार पुराम यांनी, संतांनी समाजाला अध्यात्माचा अमोल ठेवा दिल्याचे सांगितले. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष रामलाल जिंदाकुर यांनी मांडले. संचालन राजेश चुटे यांनी केले. आभार जितेंद्र आसोले यांनी मानले. कार्यक्रमासाठी संजय बागडे, मोहन बागडे, भूमेश शेंडे, नवरत्न गायधने, लीलाधर कठाणे, गुरुदेव शेंडे तसेच बचत गट व विविध मंडळांच्या सदस्यांनी सहकार्य केले.