शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

समाज करतो नाईलाजाने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:01 IST

ओबीसींच्या संवैधानिक अधिकारांच्या संदर्भात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत प्रयत्नशील आहे. संवैधानिक तरतूद व अधिकारांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींची उदासीनता : ओबीसी संघर्ष कृती समितीचे आमदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : ओबीसींच्या संवैधानिक अधिकारांच्या संदर्भात ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ सतत प्रयत्नशील आहे. संवैधानिक तरतूद व अधिकारांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारचे वर्तन असंवैधानिक असल्यास या विरोधात सदनात व सडकेवर आवाज बुलंद करण्याचे काम आमदार, खासदार यांचे असूनसुद्धा, जबाबदार व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडीत नसल्यामुळे समाजाला नाईलाजाने आंदोलन करावे लागते, असे ओबीसी संघर्ष कृती समितीने आमदार विजय रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने समितीचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेत, प्रसिद्धी प्रमुख खेमेंद्र कटरे, कोषाध्यक्ष संजीव रहांगडाले, सी.पी. बिसेन, कार्यकारिणी सदस्य रवी भांडारकर, वाय.टी. कटरे, डी.आर. गिरीपुंजे, कमल कापसे, न.प. उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदारांच्या कार्यालयात जावून आ. रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात विविध मागण्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे.निवेदनात, केंद्रात व राज्यात वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांवरील अन्याय, ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना, ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी, एनटी विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती आणि शिक्षण प्रतिपूर्ती शुल्क, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, ओबीसी विद्यार्थ्यांची विदेशात उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती शुल्क पूर्ववत सुरू करावे, ओबीसींच्या केंद्रीय अनुसूचित पवार व लोधी जातींचा समावेश करण्यात यावा, या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.या वेळी समितीचे अध्यक्ष कटरे यांनी ओबीसी समाजावर कसा अन्याय होत आहे, हे उदाहरणासह आ. विजय रहांगडाले यांना सांगितले. तर वैद्यकीय प्रवेशाबाबत केंद्रीय कोट्यात २७ टक्के ऐवजी दोन टक्के जागा दिल्याने त्यातही महाराष्ट्रात एकही जागा न दिल्याने संकल्प गिरीपुंजे या विद्यार्थ्याने ५६५ गुण नीट परीक्षेत घेवूनही प्रवेश मिळालेला नाही, हे डी.आर. गिरीपुंजे यांनी आ. रहांगडाले यांच्या लक्षात आणून दिले.केंद्र शासनाच्या केंद्रीय आरक्षणानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी २७ टक्के आरक्षण ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. मात्र मागील काही वर्षांपासून केंद्र शासनाच्यावतीने हे आरक्षण दोन टक्क्यांवर आणण्यात आले आहे. तसेच ओबीसीच्या २५ टक्के जागा अनारक्षित खुल्या प्रवर्गासाठी वळविल्या आहेत. एससी प्रवर्गासाठी १५ व एसटी साठी ७ टक्के जागा आरक्षित करुन ७६ टक्के जागा केवळ खुल्या प्रवर्गासाठी ठेवलेल्या आहेत. यातही राज्यातील २२ शासकीय व अनुदानित महाविद्यालय तसेच केंद्र शासनाच्या यादीमधील १७७ महाविद्यालयांत ओबीसी विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी आरक्षणच ठेवले नाही. त्यामुळे विज्ञानात चांगले गुण घेवून बारावी उत्तीर्ण होवून नीटमध्ये सुद्धा चांगले गुण घेवून उत्तीर्ण होणाºया ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रकार केंद्र शासनाने सुरू केल्याचे दिसून येते. याबाबत समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. निषेधही नोंदविलेला असून आक्रमक पवित्रा यापुढे घेण्यात येईल, या बाबींवर चर्चा करण्यात आली.या वेळी आ. रहांगडाले यांनी निवेदनकर्त्यांचे म्हणणे ऐकून व समजून घेतले. तसेच तुमच्या या मागण्या रास्त असून याचा पाठपुरावा मी शासनाकडे, सदनात मांडणार व या न्याय हक्कासाठी मी सुद्धा तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही दिली. खरोखरच हा अन्याय दूर झाला पाहिजे. आज ओबीसींची मुले शिकत आहेत. त्यांचा वाटा त्यांना मिळालाच पाहिजे, असे आग्रही मतसुद्धा या वेळी त्यांनी बोलून दाखविले.