शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

समाजच समाजाला बदलू शकतो

By admin | Updated: January 24, 2016 01:40 IST

शासन राजकारण आणि सामाजिक क्षेत्रासंबंधात जेवढे संवेदनशील पाहिजे तेवढे दिसत नाही.

नितीन गडकरी : राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोपगोंदिया : शासन राजकारण आणि सामाजिक क्षेत्रासंबंधात जेवढे संवेदनशील पाहिजे तेवढे दिसत नाही. शासनातून समाज घडणार नाही तर समाजच समाजाला घडवू शकतो, असे उद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.चौथ्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचा समारोप व बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे खा.नाना पटोले, संमेलनाध्यक्ष मुक्ताताई पुणतांबेकर, ‘जय मल्हार’ टीव्ही मालिकेचा नायक देवदत्त नागे, आ.गोपालदास अग्रवाल, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि.प. उपाध्यक्ष तथा संमेलनाच्या स्वागताध्यक्ष रचना गहाणे आदी उपस्थित होते. महात्मा गांधींनी व्यसनमुक्तीची जी चळवळ चालविली ती आजही चालविण्याची गरज आहे. समाजाचे स्वास्थ चांगले रहावे यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव होणे ही चांगली बाब आहे. समाजात परिवर्तन आणायचे असेल तर समाजमनाने एकत्र येऊन कार्य केले पाहिजे, असे आवाहन यावेळी ना.गडकरी यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून केले.प्रास्ताविकात पालकमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, तरूणांमध्ये व्यसनाधिनता आहे. देशाला बलशाली करायचे असेल तर व्यसनमुक्त समाजाची निर्मिती होणे अपेक्षित आहे. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. यावेळी राज्यातील विविध संस्था आणि व्यक्तींना व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिव्यक्ती १५ हजार तर संस्थेला ३० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाबा युवा वर्गा मोठ्या संख्येने होता. (तालुका प्रतिनिधी)पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची नावेव्यसनमुक्त पुरस्कार मिळालेल्यांमध्ये मुंबई येथील तुळशीदास विश्वनाथ भोईटे, सुरेश जयसिंग हेडंबा, पुणे येथील दत्ता श्रीखंडे, डॉ.दत्ता कोहीणकर, समिंतराव हंबीर, सुरेश मेकला, कोल्हापूर ज्ञानदेव पाटील, नाशिक चंद्रशेखर नामपूरकर, धुळे सुभाष कुळकर्णी, अहमदनगर हमीद सय्यद, गौरव बिडवे, धीरज शर्मा, जळगाव मुकूंद गोसावी, अमरावती विद्यासागर धर्माधिकारी, महादेवराव बडनेरकर, बुलढाणा वासुदेव देशपांडे, शुभानराव देशमुख, ईश्वर मगर, वाशिम खंडेराव मुंढे, यवतमाळ चंद्रबोधी धायवटे, अकोला अशोक रामटेके, नागपूर रवींद्र भुसारी, भूपेंद्र गणवीर, विनोद गजघाटे, गोंदियातील हिदायत शेख, बोधानंद रोडगे, अपूर्व मेठी, बळीराम वाघाये, गडचिरोलीचे दत्तात्रेय कुंभरे, संदीप पाटील, भंडारा ब्रह्मदास हुमने, चंद्रपूर अनिरूध्द वनकर, केशवराव शेंडे, लक्ष्मीकांत धानोरकर, औरंगाबादच्या मंदाकिनी चौकडे, सुचिता देशपांडे, परभणी ज्ञानोबा मुंढे, बीडच्या राहीबाई धुमाळ, जालना बंडू जाधव, हिंगोली दत्तात्रेय दंडे, जगन जाधव, कैलास कनसे यांचा समावेश होता.पुरस्कार मिळालेल्या संस्थांची नावेसंस्थांमध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिध्दार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय डॉ. डी.एन. रोड फोर्ट मुंबई, सलाम मुंबई फाऊंडेशन मुंबई, दि. आॅरचिड स्कूल बानेर पुणे, बजाज इलेक्ट्रीकल्स लिमिटेड सिरूर पुणे, नवजीवन विद्या विकास मंडळ नगाव धुळे, विश्वरचना ग्रामीण विकास संस्था केकाटपूर अमरावती, संत गाडगेबाबा बहुउद्देशिय संस्था पारस अकोला, वर्ल्ड रिन्युअल स्पीरीक्चुअल ट्रस्ट उमरेड नागपूर, अंबुजा सिमेंट फाऊंडेशन चंद्रपूर व डोंगर तुकाई ग्रामविकास प्रतिष्ठान नाथनगर परभणी यांचा समावेश आहे.