शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

अनाथ वधू-वरांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिक संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:46 IST

जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-वरांच्या जीवनातील बुधवारी (दि.२६) लगीनगाठ पडली.

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार : सामाजिक न्याय दिनी झाले विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-वरांच्या जीवनातील बुधवारी (दि.२६) लगीनगाठ पडली.गोंदिया तालुक्यातील आसोली येथील रहिवासी बादल व एकता या दोन्ही वधूवरांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र सात आठ वर्षांपूर्वीच हरपले. या अनाथ वधू-वरांनी समाज संदेश देणारी लग्नपत्रिका तयार करुन समाजासमोर एक आदर्श ठेवला. लग्नपत्रिकेत प्रथमच मुलगा-मुलगी समान असून त्यांना समान लेखण्याचे आवाहन केले आहे. पुढे सेव्ह ट्रीच्या लोगोद्वारे झाडे व पाणी वाचविण्याचे आवाहन केले आहे. मानवाने नेत्रदान व रक्तदान करुन मदतीची परंपरा जोपासण्याचे तसेच स्वच्छ भारत अभियानाचा लोगोद्वारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.समाजसेवा, मूल्यशिक्षण, पर्यावरण यातून राष्ट्राचे रक्षण व मतदान हे कर्तव्य असून ते बजावण्याचे आवाहन केले आहे. सर्व शिक्षण मोहिमेच्या लोगोद्वारे शिक्षणाचे आवाहन करण्यात आले. देशाचे रक्षण करणारे जवान व पोषण करणारे किसान यांना मानवंदनापण लग्नपत्रिकेतून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे लग्नात येताना वधू-वरांसाठी भेटवस्तू न आणता अनाथ मुलांसाठी नोटबुक आणण्याचे आवाहन करुन शिक्षणाला पुरस्कृत करण्यात आले होते. सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून बादल व एकता अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकले. शिवाय विवाह सोहळ्यातून बादल व एकता यांनी जाती पातीचे बंध तोडा भारत जोडा भारत जोडा असा संदेश दिला आहे.कोण आहे बादलबादल बालकदास गजभिये हा गोंदिया तालुक्यातील आसोली येथील रहिवासी आहे.२०१३ मध्ये बादलवरील आईचे छत्र हरपले. यानंतर अंत्यत विपरित परिस्थितीत बुध्द विहारात अभ्यास करुन बादलने स्पर्धा परीक्षा उर्तीण केली. लोको पायलटच्या मेरिट लिस्टमध्ये त्याच नाव आले आहे. बादलची आई कॅन्सरशी झुंज देत होती.तिच्या उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा बादल व त्यांच्या दोन भावडांनी मिळेल ते काम करुन आईवर उपचार केले.मात्र नियतीने त्यांच्यावरील आईचे छत्र हिरावून घेतले.मात्र यानंतर बादलने न डगमगता सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांच्या मदतीने त्याने आपले ध्येय गाठले.त्यानंतर त्यांच्या पुढाकाराने तो आज सामाजिक न्यायदिनी विवाहबंधनात अडकला.विविध मान्यवरांची उपस्थितीबादल आणि एकता हे सामाजिक न्याय दिनी विवाहबंधनात अडकले. त्यांना आर्शीवाद देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता शाहू, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, जि.प.समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.हाश्मी, सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सविता बेदरकर, सेवानिवृत्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके उपस्थित होते.