शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

सामूहिक विवाहातून सामाजिक सद्भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:06 IST

सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : कोहळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.कोहळी समाजसेवा मंडळाच्यावतीने येथील सरस्वती विद्यालयात आयोजित सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हेमकृष्ण कापगते होते. या वेळी व्यासपिठावर आमदार बाळा काशिवार, सेवानिवृत्त न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत इंचिलवार, सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. माजी उपसभापती अ‍ॅड. पोमेश्वर रामटेके, कोहळी समाज अध्यक्ष नामदेव कापगते, सचिव मनोहर शहारे, लोकपाल गहाणे, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, डॉ. गजानन डोंगरवार कुंदा डोंगरवार, नागोजी परशुरामकर, उद्योगपती लुणकरन कुंभरे, कुसन शेंडे, प्रदीप मस्के, शंकर झोडे उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांनी, स्व. शामरावबापू कापगते यांनी १९८१ मध्ये निस्वार्थी भावनेने कोहळी समाज सामूहिक मेळाव्याला सुरुवात केली. सामूहिक विवाह सोहळ््यांमुळे समाजबांधवांच्या पैसा व वेळेची बचत होवून समाजाची उन्नती होते असे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, मागील २५ वर्षापासून नियोजित पत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार लग्न लावण्याची परंपरा समाजाने कायम राखली आहे. शासनाने स्व.शामराव बापू कापगते यांना पद्मश्री किताबाने गौरवान्वित करावे अशी मागणी कोहळी समाज संघटनेने केली. याप्रसंगी अध्यक्ष नामदेव कापगते यांचा सत्कार करण्यात आला. संचालन आशिष कापगते व मोहन कापगते यांनी केले. मेळाव्यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.११ जोडपी विवाहबद्धकोहळी समाजाच्यावतीने मागील २५ वर्षांपासून अविरत सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जात असून आतापर्यंत शेकडो जोडप्यांचे लग्न सोहळ्यात लावण्यात आले आहे. त्यानुसार, यंदाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे‘शुभमंगल’ लावण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न