शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

सामूहिक विवाहातून सामाजिक सद्भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 21:06 IST

सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : कोहळी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : सामूहिक विवाह सोहळे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. सामूहिक विवाह सोहळ््यातून पैसा व वेळेची बचत होते. शिवाय सामूहिक विवाह सोहळ््यातून सामाजिक सद्भावना निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.कोहळी समाजसेवा मंडळाच्यावतीने येथील सरस्वती विद्यालयात आयोजित सामूहिक विवाह सोहळ््यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार हेमकृष्ण कापगते होते. या वेळी व्यासपिठावर आमदार बाळा काशिवार, सेवानिवृत्त न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, भंडारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वसंत इंचिलवार, सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी मनोहर चंद्रीकापुरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स. माजी उपसभापती अ‍ॅड. पोमेश्वर रामटेके, कोहळी समाज अध्यक्ष नामदेव कापगते, सचिव मनोहर शहारे, लोकपाल गहाणे, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, डॉ. गजानन डोंगरवार कुंदा डोंगरवार, नागोजी परशुरामकर, उद्योगपती लुणकरन कुंभरे, कुसन शेंडे, प्रदीप मस्के, शंकर झोडे उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांनी, स्व. शामरावबापू कापगते यांनी १९८१ मध्ये निस्वार्थी भावनेने कोहळी समाज सामूहिक मेळाव्याला सुरुवात केली. सामूहिक विवाह सोहळ््यांमुळे समाजबांधवांच्या पैसा व वेळेची बचत होवून समाजाची उन्नती होते असे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, मागील २५ वर्षापासून नियोजित पत्रिकेत दिलेल्या वेळेनुसार लग्न लावण्याची परंपरा समाजाने कायम राखली आहे. शासनाने स्व.शामराव बापू कापगते यांना पद्मश्री किताबाने गौरवान्वित करावे अशी मागणी कोहळी समाज संघटनेने केली. याप्रसंगी अध्यक्ष नामदेव कापगते यांचा सत्कार करण्यात आला. संचालन आशिष कापगते व मोहन कापगते यांनी केले. मेळाव्यासाठी सर्व समाजबांधवांनी सहकार्य केले.११ जोडपी विवाहबद्धकोहळी समाजाच्यावतीने मागील २५ वर्षांपासून अविरत सामूहिक विवाह सोहळ््याचे आयोजन केले जात असून आतापर्यंत शेकडो जोडप्यांचे लग्न सोहळ्यात लावण्यात आले आहे. त्यानुसार, यंदाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात ११ जोडप्यांचे‘शुभमंगल’ लावण्यात आले.

टॅग्स :marriageलग्न