शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

समाजात सामाजिक समता रूजवावी

By admin | Updated: April 10, 2017 01:15 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

अभिमन्यू काळे : सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभगोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रीतून समाजामध्ये समानता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रत्येकाने समाजात सामाजिक समता रूजविण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.सामाजिक न्याय भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या शुभारंभ शनिवार (दि.८) करण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.सप्ताहाचे उद्घाटन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले. अतिथी म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसूदन धारगावे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) दाभाडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे उपस्थित होते. काळे पुढे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी समाजात समतेचा संदेश रूजविला. त्यासाठी प्रत्येकाने आपल्याकडे आलेल्या व्यक्तीला समतेची वागणूक दिली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे असे सांगून ते पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व अभ्यासूवृत्तीने मन लावून अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. पुलकुंडवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी विशिष्ट ध्येय ठरवून शिक्षण घ्यावे. तरच स्वत:चे व सोबतच देशाचे नाव उज्ज्वल करता येईल. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलभूत अधिकाराची जाणीव असायला पाहिजे. जीवनात प्रत्येकाला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. प्रत्येक नागरिकामध्ये धीटपणा असायला हवा. पूर्वी जात, पंथ, भाषा यामध्ये समाज विखुरलेला होता. ब्रिटीश राजवटीला उलथवून लावण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना तयार केली. समाजामध्ये जाती, धर्म न पाळता, एक मानव समाज व भारतीय समाज म्हणून जगावे. आपण सर्व समान आहोत, ही प्रत्येकाची एकमेकाप्रती वागणूक असायला हवी. बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितले होते ते पूर्ण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. धारगावे म्हणाले, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. व्यक्तीमत्वाची परीक्षा जातीवरून न करता त्याच्या गुणवत्तेवरून करावी. बाबासाहेबांची अभ्यासूवृत्ती विद्यार्थ्यांनी अंगिकारली पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निव्वळ संख्या वाढू नये तर त्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.या वेळी पोलीस उपअधीक्षक दाभाडे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यामिनी लिल्हारे, रश्मी कामत व अशोक वाकले यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविकातून वानखेडे म्हणाले, अनुसूचित जाती व सर्वप्रकारचे पीडित, शोषित असलेल्यांना सामाजिक न्याय, आर्थिक व सामाजिक संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. अनुसूचित जाती, वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून विविध कल्याणकारी योजना राज्यभर राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच त्याचे उद्देश साध्य व्हावेत, यासाठी राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले.संचालन प्रदिप ढवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार यांनी मानले. कार्यक्रमास स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अंकेश केदार, खोडे, कळमकर, खरोले व लक्ष्मण खेडकर यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)