शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ३५ टक्के पीककर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:40 IST

यंदा खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ३५.२७ टक्के पीक कर्जाचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामात शेतकऱ्यांची कोंडी राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणांची खरेदी आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यास अडचण जावू नये, यासाठी शेतकऱ्यांना बँकाच्या माध्यमातून पीक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. मात्र यंदा खरीप हंगामाला सुरूवात झाली तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ ३५.२७ टक्के पीक कर्जाचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यात यंदा १ लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या कामात व्यस्त आहे. मृग नक्षत्राला सुरूवात झाली असून हवामान विभागाने सुध्दा यंदा दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा जोमाने कामाला लागला आहे. खरीप हंगामात पैशाची चणचण भासू नये यासाठी शेतकरी पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकेत जात आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून अजूनही शेतकऱ्यांची कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सुध्दा त्रस्त झाला आहे. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकºयांचे आधीच कंबरडे मोडले आहे. त्यातच कागदपत्रांच्या नावावर कोंडी केली जात असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे चित्र आहे. नाबार्ड आणि शासनाने यंदा जिल्ह्यातील जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना यंदा खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी आत्तापर्यंत जिल्हा बँकेने ७३ कोटी ७० लाख, राष्ट्रीयकृत बँकांनी ८ कोटी ७६ लाख आणि ग्रामीण बँकांनी १ कोटी २७ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. आत्तापर्यंत एकूण ९५ कोटी २२ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून त्याची टक्केवारी ३५.२७ टक्के आहे. यात सर्वाधिक ५६.९५ टक्के पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ८.३२ टक्के पीक कर्जाचे वाटप केले असून राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपाबाबत अद्यापही उदासीन असल्याचे चित्र आहे.

पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठणे कठीणचजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा बँकेला यंदा २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जून महिन्याला सुरूवात झाली असताना सर्व बँकांनी केवळ ३५ टक्के पीक कर्जाचे वाटप केले असल्याने उर्वरित ६५ टक्के उद्दिष्ट बँका पुढील दोन महिन्यात कसे गाठणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे यंदाही पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण होणे कठीण असल्याचे चित्र आहे.

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी