शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कामांमध्ये येतोय स्मार्टफोनचा व्यत्यय

By admin | Updated: January 15, 2015 22:55 IST

सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात.

गोंदिया : सरकारी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सगळेच स्मार्टफोनचा मोठया प्रमाणात वापर करतात. समोर काम पडले असताना ते स्मार्टफोनवर मित्रांसोबत शेअर करताना दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामात व्यत्यय येत असल्याने त्यांची डोकेदुखी वाढत आहे.वैयक्तिक कारणांसाठी कामाच्या वेळेत होत असलेल्या सोशल मीडिया वापराचा कामावर, त्या संस्थेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे तसेच त्या व्यक्तीची क्रयशक्ती घटत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले. शहरातील सरकारी कार्यालयांमध्येही स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे नागरिकांच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याचे दररोजच्या चित्रातून दिसून येते. फेसबूक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा वापर आज विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच करताना दिसतात. यात तरूणवर्ग व महिलाही मोठ्या संख्येत आहेत. स्मार्टफोनमधील नवीन अ‍ॅप्स वापरता येत नाही असे क्वचितच सापडतील. स्मार्टफोन महत्त्वाचे आणि आपल्या दैनंदिन कामात येणारे साधन बनले असले तरी याच स्मार्टफोनमुळे नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई येत असल्याचे चित्र आहे. हेच कारण आहे की, शहरातील सरकारी कार्यालयांत काम करणारे कर्मचारीही सोशल मीडियापासून स्वत:चा बचाव करू शकलेले नाहीत. जवळपास ७० टक्के कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन आहेत. सोशल मीडियावर स्मार्टफोनच्या माध्यमातून अपडेट राहणे सहज शक्य होते. विविध कार्यालयांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी कामाच्या वेळेत स्मार्टफोनचा वापर करताना आढळत असल्याने कार्यालयीन वेळेचा उपयोग खासगी कामांसाठी करणे किती योग्य आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)