शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

स्मार्ट कार्ड पास बनले विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनीना बसचा मोफत प्रवास आहे.तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जात आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान : परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत आणि शाळेतून घरी जाण्यासाठी मोफत बससेवा आणि काही विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास योजना सुरू केली आहे. आता विद्यार्थ्यांना यासाठी स्मार्ट कार्ड तयार करणे अनिवार्य केले आहे. मात्र आगारात गेल्यानंतर लगेच स्मार्ट कार्ड तयार होत नसल्याने आणि त्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. परिणामी ये-जा करण्याचा आर्थिक भूर्दंड बसत असल्याने बरेच विद्यार्थी शाळेत जात नाही. त्यामुळे स्मार्ट कार्ड पास विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखीचे झाले आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी शहरात शिकण्यासाठी येतात. मानवविकास योजनेतंर्गत विद्यार्थिनीना बसचा मोफत प्रवास आहे.तर इतर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास दिले जात आहे.गोंदिया येथे दररोज आमगाव, गोरेगाव, सालेकसा, देवरी, गोंदिया या पाच तालुक्यांतील विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी यावे लागते. स्मार्ट कार्ड बनविण्यासाठी एसटी महामंडळाने दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सकाळी ६ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ अशी वेळ निर्धारित करुन दिली आहे. स्मार्टकार्ड तयार करण्यासाठी एसटी महामंडळाचा एकुलता एक संगणक आहे. अनेकदा लिंक फेल असते. सकाळी सहा वाजतापासून या लहान लहान मुलांसोबत त्यांचे आई-वडील सुध्दा येतात. रोज जास्तीत जास्त ५० ते ६० स्मार्टकार्ड तयार केले जातात. गोंदिया विभागाच्या पासधारक विद्यार्थ्यांची संख्या पाच हजारावर आहे.विद्यार्थ्यांचे आई-वडील सुध्दा आपल्या पाल्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आपली कामे बाजूला ठेऊन त्यांच्यासोबत स्मार्ट कार्ड पास तयार करण्यासाठी गोंदिया येथे येतात. मात्र दिवसभर प्रतीक्षा करुन त्यांना पास न तयार करताच आल्या पावलीच परत जावे लागते. यामुळे त्यांचे दिवसभराचे श्रम सुध्दा वाया जात नसून त्यांना आर्थिक भूर्दंड सुध्दा सहन करावा लागत आहे.स्मार्ट कार्ड बनल्याशिवाय पास बनणार नाही म्हणून मुले शाळेला दांडी मारून शाळेत न जाता एसटी महामंडळाच्या कार्यालयासमोर ताटकळत उभी राहत असल्याचे चित्र दररोज येथील बस स्थानकावर पाहयला मिळत आहे. एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड बनण्यास जो विलंब होत आहे, तोपर्यंत पासची व्यवस्था करावी. अन्यथा विद्यार्थ्यांचे नुकसान होतच राहणार आहे.त्यामुळे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन योग्य उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Bus Driverबसचालक