शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

अनेक पालेभाज्यांतून मिळतेय ‘स्लो पॉयझन’

By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST

पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या

रावणवाडी : पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या किटकनाशकांचा दुष्परिणाम होवून पालेभाज्यांची पौष्टीकता पूर्णत: संपुष्टात येत आहे. अशा पालेभाज्यांचा आहारात उपयोग केल्याने एकप्रकारे ‘स्लो पॉयझन’च नागरिक ग्रहण करीत आहेत.किटकनाशक औषधांची फवारणी पालेभाज्यांवर केले जाते. त्यामुळे त्या पालेभाज्यातील विषारी घटक सेवनातून शरीरात प्रवेश करतात. यातून संपूर्ण शरीरच स्लो-पॉयझनच्या विळख्यात सापडले आहे. पिकाचे भरघोष उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यामार्फत पिकावर नाना प्रकारच्या विषारी किटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु किटकनाशक औषधीच्या अति वापरामुळे किटकनाशक शरीरात भिनू लागले आहे. भाजीपाल्यातील जीवनसत्त्व व मानवी शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक नाश पावतात. किटकनाशकांच्या फवारणीमुळे संपूर्ण भालेभाज्या विषारी बनल्या आहेत. शेतकरी पालेभाज्यावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी व भरघोष उत्पन्न मिळविण्यासाठी स्वत:च्या मनाप्रमाणे वाट्टेल त्या किटकनाशक औषधीची फवारणी मोठ्या प्रमाणात करतात. एखादी किटकनाशक किती प्रभावी आहे, त्यापासून किती फायदे आहेत, त्यामुळे त्या रोगावर नेमक्या याच औषधाची फवारणी करावी, अशी माहिती दर्शविणाऱ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे मोठाले फॅन्सी होर्डिंग्स, फलक व वॉल पेंटिंग ठिकठिकाणी लागलेल्या आढळतात. मात्र या कंपन्यांच्या जाहिरातीमागील सत्यता कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. सद्यस्थितीत बाजारात बोगस कंपन्यांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. मात्र हा गंभीर प्रकार समजून घेण्यासाठी शासनाची तपास यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. बोगस कंपनीच्या घातक किटकनाशकाबद्दल जनतेत जाणीव निर्माण करून देण्याची आता गरज आहे. कृषी कार्यालयाकडून वेळोवेळी मेळाव्यांचे आयोजन केले जात नाही. अधिकारी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती औषध किती वेळा व किती प्रमाणात वापरावी याची जाणीव नाही. औषध उत्पादकही त्या औषधांना विषारी करतात. शेतकरी अशा औषधांची फवारी पिकावर करतात. असा प्रकार चोहीकडे सुरू आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देवून रासायनिक खताचा व विषारी किटकनाशकांचा भरमसाठ उपयोग करीत आहेत. हा प्रकार पालेभाज्यांसाठी व इतर पिकांसाठी अत्यंत घातक असून मानवी आरोग्यावर थेट परिणाम करीत आहेत. अशा पालेभाज्यांची भाजी बाजारात राजरोसपणे खरेदी-विक्री व उपयोग केला जात आहे. नागरिकही हिरव्या पालेभाज्या पौष्टीक असतात म्हणून मोठ्या आवडीने खरेदी करतात. मात्र कृषी विभागाला सक्रिय करण्याची आज गरज आहे. (वार्ताहर)