शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
3
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
4
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
6
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
8
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
9
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
12
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
13
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
14
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
15
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
16
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
17
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
18
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
19
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
20
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...

अनेक पालेभाज्यांतून मिळतेय ‘स्लो पॉयझन’

By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST

पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या

रावणवाडी : पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या किटकनाशकांचा दुष्परिणाम होवून पालेभाज्यांची पौष्टीकता पूर्णत: संपुष्टात येत आहे. अशा पालेभाज्यांचा आहारात उपयोग केल्याने एकप्रकारे ‘स्लो पॉयझन’च नागरिक ग्रहण करीत आहेत.किटकनाशक औषधांची फवारणी पालेभाज्यांवर केले जाते. त्यामुळे त्या पालेभाज्यातील विषारी घटक सेवनातून शरीरात प्रवेश करतात. यातून संपूर्ण शरीरच स्लो-पॉयझनच्या विळख्यात सापडले आहे. पिकाचे भरघोष उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यामार्फत पिकावर नाना प्रकारच्या विषारी किटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु किटकनाशक औषधीच्या अति वापरामुळे किटकनाशक शरीरात भिनू लागले आहे. भाजीपाल्यातील जीवनसत्त्व व मानवी शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक नाश पावतात. किटकनाशकांच्या फवारणीमुळे संपूर्ण भालेभाज्या विषारी बनल्या आहेत. शेतकरी पालेभाज्यावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी व भरघोष उत्पन्न मिळविण्यासाठी स्वत:च्या मनाप्रमाणे वाट्टेल त्या किटकनाशक औषधीची फवारणी मोठ्या प्रमाणात करतात. एखादी किटकनाशक किती प्रभावी आहे, त्यापासून किती फायदे आहेत, त्यामुळे त्या रोगावर नेमक्या याच औषधाची फवारणी करावी, अशी माहिती दर्शविणाऱ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे मोठाले फॅन्सी होर्डिंग्स, फलक व वॉल पेंटिंग ठिकठिकाणी लागलेल्या आढळतात. मात्र या कंपन्यांच्या जाहिरातीमागील सत्यता कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. सद्यस्थितीत बाजारात बोगस कंपन्यांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. मात्र हा गंभीर प्रकार समजून घेण्यासाठी शासनाची तपास यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. बोगस कंपनीच्या घातक किटकनाशकाबद्दल जनतेत जाणीव निर्माण करून देण्याची आता गरज आहे. कृषी कार्यालयाकडून वेळोवेळी मेळाव्यांचे आयोजन केले जात नाही. अधिकारी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती औषध किती वेळा व किती प्रमाणात वापरावी याची जाणीव नाही. औषध उत्पादकही त्या औषधांना विषारी करतात. शेतकरी अशा औषधांची फवारी पिकावर करतात. असा प्रकार चोहीकडे सुरू आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देवून रासायनिक खताचा व विषारी किटकनाशकांचा भरमसाठ उपयोग करीत आहेत. हा प्रकार पालेभाज्यांसाठी व इतर पिकांसाठी अत्यंत घातक असून मानवी आरोग्यावर थेट परिणाम करीत आहेत. अशा पालेभाज्यांची भाजी बाजारात राजरोसपणे खरेदी-विक्री व उपयोग केला जात आहे. नागरिकही हिरव्या पालेभाज्या पौष्टीक असतात म्हणून मोठ्या आवडीने खरेदी करतात. मात्र कृषी विभागाला सक्रिय करण्याची आज गरज आहे. (वार्ताहर)