शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

अनेक पालेभाज्यांतून मिळतेय ‘स्लो पॉयझन’

By admin | Updated: June 11, 2014 00:08 IST

पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या

रावणवाडी : पालेभाज्यांचा विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी तसेच अपायकारक किटकांना पळवून लावण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे पालेभाज्यातील पोषक घटकांवर या किटकनाशकांचा दुष्परिणाम होवून पालेभाज्यांची पौष्टीकता पूर्णत: संपुष्टात येत आहे. अशा पालेभाज्यांचा आहारात उपयोग केल्याने एकप्रकारे ‘स्लो पॉयझन’च नागरिक ग्रहण करीत आहेत.किटकनाशक औषधांची फवारणी पालेभाज्यांवर केले जाते. त्यामुळे त्या पालेभाज्यातील विषारी घटक सेवनातून शरीरात प्रवेश करतात. यातून संपूर्ण शरीरच स्लो-पॉयझनच्या विळख्यात सापडले आहे. पिकाचे भरघोष उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यामार्फत पिकावर नाना प्रकारच्या विषारी किटकनाशकांची फवारणी केली जाते. परंतु किटकनाशक औषधीच्या अति वापरामुळे किटकनाशक शरीरात भिनू लागले आहे. भाजीपाल्यातील जीवनसत्त्व व मानवी शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक नाश पावतात. किटकनाशकांच्या फवारणीमुळे संपूर्ण भालेभाज्या विषारी बनल्या आहेत. शेतकरी पालेभाज्यावरील रोगांचा नायनाट करण्यासाठी व भरघोष उत्पन्न मिळविण्यासाठी स्वत:च्या मनाप्रमाणे वाट्टेल त्या किटकनाशक औषधीची फवारणी मोठ्या प्रमाणात करतात. एखादी किटकनाशक किती प्रभावी आहे, त्यापासून किती फायदे आहेत, त्यामुळे त्या रोगावर नेमक्या याच औषधाची फवारणी करावी, अशी माहिती दर्शविणाऱ्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिरातीचे मोठाले फॅन्सी होर्डिंग्स, फलक व वॉल पेंटिंग ठिकठिकाणी लागलेल्या आढळतात. मात्र या कंपन्यांच्या जाहिरातीमागील सत्यता कुणीच जाणून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. सद्यस्थितीत बाजारात बोगस कंपन्यांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झालेला आहे. मात्र हा गंभीर प्रकार समजून घेण्यासाठी शासनाची तपास यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. बोगस कंपनीच्या घातक किटकनाशकाबद्दल जनतेत जाणीव निर्माण करून देण्याची आता गरज आहे. कृषी कार्यालयाकडून वेळोवेळी मेळाव्यांचे आयोजन केले जात नाही. अधिकारी व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणती औषध किती वेळा व किती प्रमाणात वापरावी याची जाणीव नाही. औषध उत्पादकही त्या औषधांना विषारी करतात. शेतकरी अशा औषधांची फवारी पिकावर करतात. असा प्रकार चोहीकडे सुरू आहे. शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देवून रासायनिक खताचा व विषारी किटकनाशकांचा भरमसाठ उपयोग करीत आहेत. हा प्रकार पालेभाज्यांसाठी व इतर पिकांसाठी अत्यंत घातक असून मानवी आरोग्यावर थेट परिणाम करीत आहेत. अशा पालेभाज्यांची भाजी बाजारात राजरोसपणे खरेदी-विक्री व उपयोग केला जात आहे. नागरिकही हिरव्या पालेभाज्या पौष्टीक असतात म्हणून मोठ्या आवडीने खरेदी करतात. मात्र कृषी विभागाला सक्रिय करण्याची आज गरज आहे. (वार्ताहर)