शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

वर्षभरात सहा हजार वृक्षांची कत्तल

By admin | Updated: April 13, 2016 01:55 IST

वाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली.

नरेश रहिले गोंदियावाढत्या ग्लोबल वार्मिंगच्या समस्येमुळे शासनाने पर्यावरण ग्राम संतुलित योजना अंमलात आणली. त्या माध्यमातून एकीकडे झाडे लावली जात आहेत, तर दुसरीकडे वनातील झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. वर्षाकाठी २५ हजारांच्या वर झाडांची अवैधरित्या कत्तल होत आहे. मात्र वनविभागाकडून अधिकृतपणे कत्तल झालेल्या झााडांची संख्या कमी दाखविली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत ६ हजारच्या घरात विविध झाडांची कत्तल झाल्याची अधिकृत नोंद वनविभागाने घेतली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील या अवैध वृक्षकटाईवर कोण आळा घालणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात १२ वनक्षेत्र आहेत. यापैकी देवरी, सडक-अर्जुनी व चिचगड या तीन वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त अवैध वृक्षतोड करण्यात आली आहे. गोंदिया वनक्षेत्रांतर्गत २९८ झाडांची कत्तल करण्यात आली. तिरोडा ५६८, गोरेगाव ३३९, आमगाव १३४, सालेकसा ४३८, देवरी (उत्तर) ६७०, देवरी (दक्षिण) ४०६, चिचगड ६७७, सडक-अर्जुनी ६८२, नवेगावबांध ६६३, गोठणगाव २५८, अर्जुनी-मोरगाव ५५७ झाडांची कत्तल करण्यात आली. वर्षभरात जिल्ह्यातील ५ हजार ६९० वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे वनविभाग सांगते. परंतु मोठ्या प्रमाणात कत्तल झालेल्या वृक्षांची नोंदच वनविभाग घेत नाही. नागरिकांच्या लक्षात येणाऱ्या झाडांची कत्तल झाल्यास आणि त्याची तक्रार आली तरच चौकशी करून त्याच झाडांची कत्तल झाली असे वनविभाग नोंद करते. परंतु अनेक ठिकाणची झाडे कापल्यानंतरही त्या झाडांची तक्रार वनविभागात नोंदविली जात नाही. त्या वनाची राखन करणारा वनपाल, वनरक्षक ते प्रकरण आपला हलगर्जीपणा दाखवेल असे म्हणून अनेक कत्तल झालेल्या वृक्षांची माहिती वनविभागाला देत नाही. वनाधिकारी व वनमाफियांच्या संगणमताने वृक्षतोड सुरूच आहे. गोंदिया शहरात येणारा माल पकडण्यासाठी काही वर्षापूर्वी वनविभागाने वनउपज तपासणी नाके तयार केले होते. परंतु अनेक वनउपज तपासणी नाके बंद करण्यात आले. याचाच अर्थ चोरीची लाकडे पकडण्यात येऊ नये यासाठी वनविभागानेच हे वनउपज तपासणी नाके बंद केल्याचे दिसून येते. १०२३ सागवान झाडांची कत्तलसागवानाच्या लाकडांची अधिक किंमत असल्याने वर्षभरात जिल्ह्यातील १०२३ सागाच्या झाडांची अवैध कत्तल झाली आहे. त्यातही देवरी व सडक-अर्जुनी तालुका आघाडीवर आहे. गोंदिया वनविभागात ३९, तिरोडा ६८, गोरेगाव ११६, आमगाव ३८, सालेकसा ११५, देवरी (उत्तर) १२७, देवरी (दक्षीण) ४५, चिचगड ४८, सडक-अर्जुनी १६०, नवेगावबांध ११२, गोठणगाव ३४, अर्जुनी-मोरगाव १२१ सागवानाच्या झाडांची कत्तल करण्यात आली. त्या झाडांची किंमत १० लाख ४० हजार ५१७ रूपये सांगितली जाते. दाखल तक्रारीचे प्रमाण ५० टक्केजंगलातील लाकडे चोरीला गेल्याची तक्रार वनविभागाकडे केली तरी चोरट्यांकडून तो माल हस्तगत करण्याचे धाडस वनाधिकारी करीत नसल्याने चोरीला गेलेल्या मालाची जप्ती करण्याचे प्रमाण फक्त ५० टक्के आहे. गोंदिया वनविभागातील ८९ हजार ३२ रूपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र २९.७७ टक्केच वसुली झाली आहे. तिरोडा वनविभागातील एक लाख ५४ हजार १९० रूपयांचा माल चोरीला गेला, तर ३९.२८ टक्के वसुली झाली आहे. गोरेगाव वनविभागातील एक लाख ८४ हजार ५८३ रूपयांचा माल चोरी गेला असताना ५८.१३ टक्के वसुली झाली आहे. आमगाव वनविभागातील ६२ हजार ४९१ रूपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद आहे. मात्र १८.८२ टक्के वसुली झाली आहे. सालेकसा वनविभागातील ३ लाख ३० हजार ६७४ रूपयांच्या चोरीच्या मालाची ६५.८९ टक्के वसुली झाली आहे. देवरी (उत्तर) वनविभागातील २ लाख ७२ हजार २६५ रूपयांचा माल चोरीला गेला, मात्र ५७.९४ टक्के वसुली झाली आहे. देवरी (दक्षिण) वनविभागातील एक लाख ६५ हजार १०८ रूपयांचा माल चोरी गेला असताना केवळ ४२.१८ टक्के वसुली झाली आहे. चिचगड वनविभागातील २ लाख ३१ हजार ३२० रूपयांच्या मालाच्या चोरीपैकी ६०.८९ टक्के मालाची वसुली झाली आहे. सडक-अर्जुनी वनविभागातील ३ लाख ५४ हजार २५८ रूपयांचा मालापैकी ३८.८७ टक्के वसुली झाली आहे. नवेगावबांध वनविभागातील दोन लाख २ हजार ९०७ रूपयांचा मालापैकी ६०.४४ टक्के वसुली झाली आहे. गोठणगाव वनविभागातील एक लाख ७२ हजार ९०६ रूपयांचा माल चोरीला गेला, तिथे ४६.५५ टक्के वसुली झाली आहे. अर्जुनी-मोरगाव वनविभागातील एक लाख ५५ हजार ५४८ रूपयांचा माल चोरी गेला असताना केवळ २८.४९ टक्के वसुली झाली आहे. जिल्ह्यातील वनविभागाचे वसुलीचे प्रमाण ४९.५७ टक्के आहे.