शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत तिरोडा तालुक्यात सहा शाळांना मंजुरी

By admin | Updated: May 31, 2014 00:00 IST

भारत सरकारने शिक्षणाचा अधिकार २00९ पासून लागू केला. तेव्हापासून प्राथमिक ९ ते ४ वर्ग असलेल्या शाळेत ५ वा वर्ग जोडला जाणार आणि उच्च प्राथमिक वर्ग १ ते ७ शाळेत ८ वा वर्ग जोडला जाणार

काचेवानी : भारत सरकारने शिक्षणाचा अधिकार २00९ पासून लागू केला. तेव्हापासून प्राथमिक ९ ते ४ वर्ग असलेल्या शाळेत ५ वा  वर्ग जोडला जाणार आणि उच्च प्राथमिक वर्ग १ ते ७ शाळेत ८ वा वर्ग जोडला जाणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षापासून होती. ती या वर्षी राज्य शासनाने पूर्ण केली आहे. तिरोडा तालुक्यात आर.टी.ई. अंतर्गत सहा शाळांना मंजुरी देण्यात आली. यात प्राथमिक दोन व उच्च प्राथमिक चार शाळांचा समावेश आहे. काही शाळांशी पक्षपात झाल्याचेही निर्दशनात आले आहे.आरटीई अंतर्गत तिरोडा तालुक्यात ज्या शाळांना जि.प. ने मंजुरी दिली आहे, त्यात चुरडी व मुरपार प्राथमिक शाळांना ५ वा वर्ग जुडणार आहे. तसेच घाटकुरोडा, भजेपार, चिरेखनी आणि गराडा या उच्च प्राथमिक शाळांना ८ वा वर्ग जुडणार आहे. आरटीई अंतर्गत वर्गाची बढती याच वर्षी शैक्षणिक सत्र २0१४-१५ पासून सुरु होणार आहे.आईटीई अंतर्गत बढती वर्गाची जोडणी करण्याकरिता शासनाच्या शिक्षण विभागाने अटी घातल्या होत्या. त्यात तीन कि मीच्या आत शासकीय किंवा खासगी हायस्कूलची व्यवस्था नसावी. अशा ठिकाणी प्राथमिक शाळेत वर्ग ५ वा आणि उच्च प्राथमिक शाळेत ८ वा वर्ग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.सहा शाळांना आरटीई अंतर्गत नवीन वर्ग उघडण्याची परवानगी देण्यात आली. यात शिक्षण विभागाने काही शाळांशी आणि गावांशी पक्षपात केल्याच्या तक्रारी निदर्शनात आल्या आहेत. शिक्षण विभगाने अलपुरी, चांदोरी (क) आणि बरबसपुरा या शाळांशी पक्षपात केल्याचा आरोप नागरिकांनी केलेला आहे.ठाणेगाव आणि तिरोडा येथे हायस्कूलची व्यवस्था असून गराडा व मलपुरी या शाळांचा ठाणेगाववरून अंतर सारखाच आहे. तिरोड्यावरून हे अंतर गराडापेक्षा मलपुरी दूर अंतरावर आहे. चांदोरी (बु) पासून हायस्कूलचे अंतर साडेतीन ते चार किमी आहे. बरबसपुरा या गावाला एकोडी आणि बेरडीपार येथे हायस्कूलची व्यवस्था असली तरी एकोडी हे गाव साडेतीन किमी आणि बेरडीपार हे गाव चार किमी अंतरावर असल्याने बरबसपुरा, चांदोरी (बु)., मलपुरी या शाळा सोडून आरटीई अंतर्गत वर्ग वाढवण्याची परवानगी दिली नसल्याने पालकांत नाराजी पसरली आहे.सुरवातीला आटीई अंतर्गत जितक्या प्राथमिक शाळा आहेत, त्यात वर्ग ५ वा जोडण्यात येणार आणि उच्च प्राथमिक शाळेला ८ वा वर्ग जोडण्यात येणार असल्याच्या चर्चेला उत आला होता. मात्र तीन किमीची अट घालून लाभार्थी शाळेला नवीन वर्ग उघडण्याची मंजुरी दिल्याने सर्व चर्चांंंना विराम लागला आहे. ज्या शाळेवर अन्याय व पक्षपात करण्यात आला, त्याबाबत काही पालकांनी, शिक्षकांनी आणि पदाधिकार्‍यांनी जि.प. शिक्षण विभागाला विचारणा केली. तेव्हा अंतराचे माप नव्याने करण्यात आले असून कोणत्या माध्यमातून सोडण्यात आले याची सविस्तर माहिती नाही. अंतराच्या अटीत बसत नसल्याने सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. खासगी शाळांना वाचविण्याकरिता हे प्रयत्न तर नाहीत ना,  अशी शंका पालकांनी व्यक्त केली आहे. वगळण्यात आलेल्या बरबसपुरा, चांदोरी (बु.) आणि मलपुरी या शाळांना तीन किमीच्या अटीनुसार आरटीआई अंतर्गत नवीन शाळा (वर्ग) उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी, शाळा व्यवस्थापन समित्याच्या पदाधिकार्‍यांनी केली आहे.  (वार्ताहर)